Maharashtra Politics: ठाकरे गटाकडून पुन्हा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक; ठाकरेंचं फडणवीसप्रेम कशासाठी?

Maharashtra Politics: निवडणुकीत फडणवीसांना टोकाचा विरोध करणाऱ्या ठाकरेंचं आता फडणवीस प्रेम उफाळून आलंय. मात्र ठाकरेंनी का केलंय फडणवीसांचं कौतूक? आणि ठाकरेंचं फडणवीस प्रेम कशासाठी? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Thackeray Group Praised Fadnavis
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये निर्माण झालेले टोकाचे मतभेद आता संपल्याचा चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारण ठरलं ठाकरेंच्या मुखपत्रातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल..तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर उधळलेली स्तुतीसुमनं..फिक्सर पीएंची नियुक्ती न करण्याची भूमिका फडणवीसांनी घेतल्यामुळे त्यांचं गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊतांनी कौतुक केलं. आता तर थेट मुखपत्रातूनही फडणवीसांचं गुणागाण ठाकरेंच्या मुखपत्रातून सुरू झालंय. नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात

ठाकरेंच्या मुखपत्रात नेमकं काय म्हटलंय?

शिंदेंचं राज्य फिक्सिंगमधून अवतरलं

राज्यात फिक्सर आणि दलालांचं उदंड पीक

दलालांचं पीक कापण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन

पिकावरच्या दाढीवाल्या खोडकिड्यामुळे दलालांचं पीक कापणं सोपं नाही

मला हलक्यात घेऊ नका म्हणणाऱ्या दाढीवाल्या खोडकिड्याचा फिक्सर अडवावा लागेल

तर फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करताना संजय राऊतांनी मात्र साफसफाईची सुरुवात मंत्रिमंडळाच्या आतून करण्याची मागणी केलीय. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आणि फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे आणि फडणवीसांच्या अनेकदा गाठीभेठी झाल्या. त्य़ामुळे दोघांमधील दुरावा कमी होतो की काय याची नांदी सुरू झाली होती. आणि त्याच्यावरच आता कळस चढवल्याचं दिसतंय. ठाकरे - फडणवीसांच्या कधी कधी भेटगाठी झाल्या ते पाहूयात.

17 डिसेंबर

मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेऊन केलं अभिनंदन

20 डिसेंबर

आदित्य ठाकरेंनी अधिवेशनादरम्यान फडणवीसांची भेट घेतली

3 जानेवारी

गडचिरोलीतील विकासकामांच्या उदघाटनानंतर अभिनंदन देवाभाऊ म्हणत ठाकरेंच्या मुखपत्रातून कारवाईबाबत कौतुक

9 जानेवारी

वैयक्तिक कारणासाठी आदित्य ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट

20 फेब्रुवारी

सिडको भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समिती स्थापन केल्याने राऊतांकडून फडणवीसांचं स्वागत

महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात कुरघोडीचं राजकारण रंगलंय.. तर मविआतही ठाकरे अस्वस्थ असल्याची चर्चा रंगलीय. त्यामुळे शत्रूचा शत्रू मित्र या सूत्रानुसार ठाकरे पुन्हा फडणवीसांशी जवळीक साधत असल्याची चर्चा आहे. मात्र यातून काही नवी समीकरणं जुळणार का? याबाबत राज्याला उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com