
पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. लोकल अर्ध्यातासापासून एकाच जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे चर्चगेटवरुन विरारला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
विक्रोळी पश्चिम येथील इस्लामपुरा या ठिकाणी असलेल्या जिओ आणि एअरटेलच्या इंटरनेट टॉवरला आग
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल
अग्निशमन दलाचे नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
यात कुठलीही जीवितहानी नाही
ही आग कशी लागली याची अद्याप माहिती समोर आली नसून पोलीस व अग्निशमन दल याचा तपास करत आहे
बीडच्या धारूर तालुक्यातील तेलगाव येथील ३३ केव्ही सबस्टेशनच्या ट्रांसफार्मरमध्ये मोठा आवाज होऊन ट्रान्सफॉर्मरला आग
आगीत ट्रान्सफॉर्मर जळून खाक
अवजारांचे लाखो रुपयांचे नुकसान
आग विझवण्यासाठी सुंदरराव सोळुंके येथील कारखान्याचे अग्निशामक दल प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली नाही.
त्यामुळे वडवणी तेलगाव येथील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
- नाशकात आणखी एका फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे.
- कालच्या दिवशी द्वारका परिसरात मध्यरात्री लागली होती फर्निचर दुकानाला आग
- संभाजीनगर रोडवरील शिवाय फर्निचरला लागली भीषण आग
- आगीमुळे हवेत आगीसह धुराचे लोळ
- आग कोणत्या कारणांमुळे लागली कारण अस्पष्ट
- अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू
- आगीची घटना पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी
भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडले काँग्रेसचे बॅनर
पुण्यात भाजप काँग्रेस आंदोलनामुळे वातावरण चिघळलं होतं
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो असणारा पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी फाडला
दोन्ही पक्षाकडून एकमेकांच्या कार्यालयाच्या जवळ काही वेळापूर्वी आंदोलन करण्यात आली होती.
पुणे मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
सलग तीन दिवस सुट्या आल्याने वाहतूक कोंडी
10 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
यवतमाळच्या वणी येथे वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडाक्याचे ऊन तापले असताना अचानक आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तापमानाचा पारा 43 शी ओलांडली असून कडक उन्हामुळे घराबाहेर निघणेही अवघड ठरत आहे, अशात आलेल्या अवकाळी पावसामुळे काहीसा गारवा निर्माण झाला.
काँग्रेस आंदोलकांना डीपी रोडवर रोखलंय. भाजप कार्यालयापासून काही अंतरावर आंदोलन केलं जात आहे.
दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे सोलापूरकरांची लाहीलाही होत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा येथील आमदार अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यात एक कोटी दहा लाखांची ऑनलाईन फसवणूक झालीय. चोराखळी येथील धाराशिव कारखान्याचे बाबासाहेब कचरू वाडेकर यांची फसवणूक झालीय. बँक खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करायला लावत फसवणूक करण्यात आली. कारखान्याचे एमडी अमर पाटील असल्याचं भासवत फसवणूक करण्यात आलीय.
वर्सोवा विधानसभा विधानसभा मतदारसंघात आक्रमक मनसैनिकांनी हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी केली. मनसैनिकांनी हिंदी सक्ती अध्यादेश कागद फाडून अध्यादेशाची होळी केली. हिंदी सक्तीचा शासन आदेश रद्द न झाल्यास उत्तर भारतीय नेत्यांना मुंबईत फिरू देणार नसल्याचा मनसेचा इशारा. मनसेकडून अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेने आंदोलन केले. मनसैनिकांची राज्य शासन व केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
भाजप काँग्रेसविरोधात काँग्रेसभवन समोर आंदोलन करणार आहे. काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस कार्यकर्ते जमायला सुरुवात झालीय. काँग्रेस भवन बाहेर देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अडवली लोकल ट्रेन
खडकी रेल्वे स्थानकात अडवली लोकल ट्रेन
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रेल्वे रोको
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
लोणावळ्याहून निघालेली लोकल ट्रेन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अडवली
जालन्यातील सुभाष नगर येथे कंपनीच्या कार्यालय आणि घरावर छापे
जालना येथे जीएसटी पथकाकडून छापेमारी सुरू असून शहरातील नामांकित कंत्राटदाराच्या कार्यालयावर गेल्या तीन दिवसापासून ही छापेमारी होत असल्याची माहिती आहे. मुंबईच्या जीएसटी पथकाकडून ही छापेमारी सुरु आहे
कंपनीने घेतलेलं कंत्राट आणि इतर फर्मसोबत केलेल्या व्यवहाराबाबत संशय असल्याची माहिती असून याबाबत तपासणी होत आहे. दरम्यान, जिएसटी पथकाकडून कमालीची गुप्तता पाळली जातेय
चंद्रपूर शहरातील विश्रामगृहासमोर असलेल्या एका भंगार दुकानाला आग लागून लाखोंचं नुकसान झालं आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हे भंगार दुकान रेल्वे मार्गालगत असल्याने मोठी हानी होऊ शकली असती. शिवाय या ठिकाणी गॅस सिलेंडर पण होते. त्याचा स्फोट झाला नाही. त्यामुळे हानीचे स्वरूप मर्यादित राहिले.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा मागितला अभिप्राय
ससून रुग्णालयाच्या अहवालातील मुद्द्यांवरून पोलिस संभ्रमात
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी, असे पोलिसांनी ससूनला कळवले आहे
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात "मेडिकल निगलिजन्स" या बाबतची टिप्पणी ससून रुग्णालयाने अहवालात मांडली नसून त्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडावी असे देखील पत्रात नमूद
अहवालात ठोस निष्कर्ष आढळून न आल्यामुळे तूर्तास मंगेशकर रुग्णालयाला दिलासा
वैद्यकीय समितीचा नवीन आणि सुधारित अहवाल कधी येणार याकडे लक्ष
बोगद्यात येण्या-जाण्यासाठी एकच अरुंद मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झाले होते
कात्रज घाटात दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना, या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला
जवळपास २ ते अडीच तास या मार्गावर या बंद पडलेल्या एस टी बसमुळे, वाहतूक कोंडी झाली होती
राज्य सरकारच्या शालेय शिक्षणात हिंदी सक्ती करण्यात आल्याने याविरोधात मनसे आक्रमक झालेय.
आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे विद्यार्थी सेने तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी राज्य सरकारच्या शासन निर्णयाची होळी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय.
हिंदीची सक्ती करत पुढचा मुख्यमंत्री भैय्या करण्याचा डाव दिल्लीश्वरांचा दिसतोय आणि याला मनसे तीव्र विरोध करेल अशी प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केलेय.
नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सादर केलेल्या आरोपपत्रानंतर काॅग्रेस पक्षाने देशात आंदोलन केली.
त्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणुन भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज नांदेड शहरातील आयटीय चौकात तिव्र निषेध आंदोलन करण्यात आलय.
या आंदोलनात कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत काळ फासुण आंदोलन करण्यात आल.
तसेच कॉंग्रेस पक्ष भ्रष्ट पक्ष असून काॅग्रेसने 2 हजार कोटीचा घोटाळा केलाय. असा आरोप देखील भाजपकडून करण्यात आलाय.
- महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या विरोधात आंदोलन
- राज्य सरकार मराठी द्रोही असल्याचा मनसेचा आरोप
- राज्य सरकारने जो शासन निर्णय जाहीर केला आहे त्याविरोधात मनविसे आक्रमक आंदोलन करून या शासननिर्णय प्रतींची होळी करणार
- बालगंधर्व चौकात होत आहे आंदोलन
- १९ एप्रिल ते ०३ मे पर्यंत शहरात मनाई आदेश लागू
- शहरात झालेला हिंसाचार, राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निर्णय
- मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन, रास्ता रोको अथवा निदर्शनं करता येणार नाही
- मनाई काळात स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास मनाई
- मनाई कालावधीत प्रतीकात्मक चित्रं, पुतळ्याचे दहन, घोषणा देणं , आक्षेपार्ह वक्तव्य करण्यास देखील सक्त मनाई
- विना परवानगी मोर्चे, आंदोलनांना मनाई
सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेवरती बडतर्फेची कारवाई करण्यात आली आहे
रणजीत काढलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आले आहे
न्यायालयात हजर करण्याच्या अगोदर रंजीत असल्याची बीड जिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकी तपासणी करण्यात आली आहे
वैद्यकीय तपासणी करून रणजीत कासलेला स्थानिक गुन्हे शाखा शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत
ग्रामीण भागातील अनेक विद्युत रोहित्रांची अवस्था दयनीय झालेली आहे. इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथील काळे वस्तीवरील एका विद्युत रोहित्राला अक्षरशा आग लागण्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मागील अनेक दिवसापासून रोहित्राला फ्युज नव्हत्या,केबल व इतर साहित्य खराब झालेले होत.
शेतकरी वारंवार महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नवीन साहित्य टाकण्याची मागणी करत होते, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज सकाळी मात्र या रोहित्राला आग लागून ते जळून खाक झाले.
दोन लाखांची हळद चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ
पोलिसांनी शोध घ्यावा अन्यथा जीवाचे बरंवाईट करणार शेतकऱ्याने दुःख व्यक्त करत केली मागणी
- काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन
- नाशिकच्या रेड क्रॉस सिग्नल आंदोलन
- सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन
- भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करावी या, मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आक्रमक
- काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे जाणाऱ्या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड
- पोलिसांवर दगडफेक प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी...
- MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख याला ही नाशिक पोलिसांनी दगडफेक प्रकरणी केली अटक...
- गुन्हा दाखलमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार पक्षासह आता MIM च्या शहराध्यक्ष गुन्हा...
सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासल्याचे नवनवीन व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाले
यामध्ये निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासल्याने पोलीस खात्यावरती आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले आहेत
त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच्या बोगस एन्काऊंटरची ऑफर आल्याचे खळबळ जनक दावा रंजीत कासलेने केला होता
रणजीत कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत त्याच्यावरती बडतर्फेची कार्यवाही करण्यात आली आहे
- CNG पुरवठा करणाऱ्या MNGL च्या मनमानी कारभाराला कंटाळून नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनचा निर्णय
- २६ एप्रिलपासून CNG विक्री बंद ठेवण्याचा इशारा
- नाशिक जिल्ह्यात CNG पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यानं CNG पंपचालक आणि ग्राहक त्रस्त
- MNGL कडून सुरळीत पुरवठा होत नसल्यानं पंप चालकांसह ग्राहकांना मनस्ताप
- ३ - ४ तास रांगा लावून CNG भरण्याची ग्राहकांवर वेळ
- CNG च्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे CNG पंपावर भांडणं आणि वादावादीचे प्रकार
- दररोजच्या भांडणं आणि वादावादीमुळे CNG पंप चालक त्रस्त
- CNG चा पुरवठा सुरळीत करण्याची पंप चालकांची मागणी
- दिवसातून किमान १० तास सुरळीत CNG चा पुरवठा करण्याची पेट्रोल डीलर असोसिएशनची मागणी
- २५ एप्रिलपर्यंत CNG पुरवठा सुरळीत न झाल्यास २६ एप्रिलपासून CNG विक्री बंद करण्याचा इशारा
सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटक पर्यटन स्थळावर आपल्या खाजगी वाहनाने जाण्यास निघाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वेळेवर वाहतूक कोंडी झाली आहे.
खंडाळा घाट परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
आज गुड फ्रायडे च्या सुट्टीला जोडूनच शनिवार व रविवार आल्याने या सलग तीन दिवस सुट्ट्यांच्या निमित्ताने पर्यटन स्थळावर जाण्याचा चंग बांधत मोठ्या प्रमाणात पर्यटक खाजगी वाहनातून घराबाहेर पडले आहेत..
वाहतूक कोंडी पासून सुटका मिळावी या करता पहाटेच पर्यटक घराबाहेर पडले मात्र मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांना खंडाळा ते खोपोली दरम्यान वाहतूक कोंडी मध्ये अडकून पळावे लागेल आहे.
भुसावळ शहराला लागू तापी नदीचं मोठं पात्र आहे.
तापी नदीच्या माध्यमातून भुसावळ शहरासह परिसरातील इतर गावांचा पाण्याचा प्रश्न दूर होतो.
मात्र या तापी नदी पात्रात सर्रासपणे सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर तापी नदी पात्रातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.
कुठल्याही प्रकाराची प्रक्रिया न करता हे सांडपाणी तापी नदीपात्रात सोडल्यानंतर भुसावळ तालुक्यातील साकेगाव शहर इतर गावं तसेच एमआयडीसी परिसरातील उद्योगांना सर्रासपणे पाणीपुरवठा केला जातो.
त्यामुळे एकीकडे पाणी टंचाईचा संकट असताना दुसरीकडे सर्रासपणे दूषित पाणी नदीपात्रात सोडल्याने याचा मोठा फटका संबंधित गावांना बसत असल्याचे समोर आले आहे.
नांदेडच्या देगलूर शहरातील रोहित्राला आग लागून डीपी जळला आहे.
रोहित्रा मध्ये ऑइल नसल्यामुळे आणि वाढत्या तापमानामुळे हे आग लागल्याची माहिती आहे.
रोहित्रामधून ऑइल गळती होत असतानाही महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धार मागणीसाठी बंदची हाक...
शेख महंमद महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्यांकडून जीर्णोद्धारास आडकाठीचा आरोप...
ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच...
रात्री आंदोलनस्थळी किर्तनाचा कार्यक्रम...
जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत ठिय्या आणि बंद आंदोलनावर ग्रामस्थ ठाम...
प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी
धाराशिव शहरातील कत्तलखान्यात होणारी गोवंश हत्या बंद करावी या प्रमुख मागणीसाठी उपोषण सुरू
पुणे आणि धाराशिव मधील गोरक्षकांचे धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये उपोषण
धाराशिव मधील कत्तलखान्यात गोवंश हत्या करून हे मांस हैदराबादसह इतर शहरात पाठविले जात असल्याचा गोरक्षकांचा आरोप
पोलीस अधीक्षक यांना कत्तलखान्यामध्ये गोहत्या होत असल्याची माहिती देऊनही कारवाई न झाल्याने उपोषण सुरू
पोलीस प्रशासन,खासदार,आमदार यांनी त्वरित लक्ष घालून कत्तलखाने बंद करावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे
रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील सर्व्हेअर विशाल रसाळ याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. रायगड ACB पथकाने माणगाव ST स्टँड येथे सापळा रचून ही कारवाई केली.
धाराशिव शहरातील कत्तलखान्यात सुरू असलेल्या गोवंश हत्येच्या विरोधात गोरक्षकांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, उपोषणकर्त्यांनी कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे.
या बसची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे.
सर्व बस संबंधित कंपनीकडे माघारी पाठविण्यात आल्या
बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गांवर सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला
हडपसर, नतावाडी, शेवाळवाडीसह अन्य डेपोंमधून या बसचे संचलन सुरू होते.
मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या बस सेवेतून काढून टाकण्यात आल्या
लाखवड या गावातील ग्रामीण मार्ग क्रमांक 139 या मुख्य रस्त्याच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी मंजूर करून दिलेला होता.
परंतु गावातील काही लोकांनीच या रस्त्याला विरोध करत या रस्त्याचे काम बंद पाडले.
आज एकनाथ शिंदे यांना या रस्त्यावरच्या कामाचे बाबत निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ त्यांच्या दरे गावी आले होते.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट एसपी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन करूनच या रस्त्याचे काम बंद पाडणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मोझरी गावातुन निघाली मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांच्या पथकांची शोभायात्रा..
ग्रामजयंतीच्या निमित्ताने मोझरी गावात विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन...
रविवारी महाकाला व काल्याचे कीर्तन.
संचालक मंडळाच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच राज्य शासनाने राज्यातील २१ जिल्ह्यांत ६५ नवीन बाजार समित्या मंजूर केल्या आहेत.
यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मंजूर करण्यात आली आहे.
सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून,या बाजार समितीचे कार्यक्षेत्र उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर हे दोन तालुके आणि सोलापूर शहर हद्दवाढ भागातील १५ विकास संस्थांचा समावेश आहे.
या बाजार समितीची निवडणूक सुरू असतानाच राज्य शासनाने राज्यातील २१ जिल्ह्यांत नवीन ६५ बाजार समित्यांना मंजुरी दिली आहे.
यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती मंजूर करण्यात आली आहे.राज्यात अगोदर ३०५ बाजार समिती आणि ६२५ उपबाजार कार्यरत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आज हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावात दाखल होणार आहेत,
शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या सात महिला मजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने मृत्यू झाला होता या महिलांच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत
दरम्यान राज्य शासनाने घोषणा करून देखील या महिलांच्या कुटुंबीयांना मदत मिळत नसल्याच्या तक्रारी आंबेडकर यांच्याकडे नातेवाईकांनी केल्या होत्या
या संदर्भात सुजात आंबेडकर प्रशासनाला जाब देखील विचारणार आहेत
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री,घटना समितीचे सदस्य व अमरावतीचे सुपुत्र डॉ. पंजाबराव देशमुख यांचं नाव अमरावती विमानतळाला देण्याची मागणी अमरावती जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांनी केली,
90 टक्के लोकांची भूमिका आहे की डॉ.पंजाबराव देशमुख यांचे नाव मिळालं पाहिजे मला विश्वास आहे की पंजाबराव देशमुख यांचे नाव अमरावती विमानतळाला मिळेल तर गुलाबराव महाराज यांचं नावं मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला देण्यात यावे
या लायब्ररीमध्ये गुलाबराव महाराज गेले होते तिथे कसे पुस्तकालावे तसं त्यांना सांगितलं होतं, अमरावती मंत्राला नाव देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे,
अमरावती जिल्हा हा पंजाबराव देशमुख यांचा म्हणून ओळखला जातो तर विमानतळाला पंजाबराव देशमुख यांचे नाव नाही दिलं तर जनताच सरकारला उत्तर देणार आहे. कारण 90 टक्के लोकांची इच्छा आहे असा इशारा मनसेचे पप्पू पाटील यांनी दिला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी सुट्टीसाठी आले आहेत.
नेहमीप्रमाणे गावी आल्यानंतर त्यांनी गावात केलेल्या शेतीची पाहणी केली.
जनावरांच्या गोठ्यात जाऊन जनावरांना चारा खाऊ घातला.
गावी आल्यानंतर प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे हे शेतीत रंगलेले आपल्याला पाहायला मिळाले आहेत.
तसेच यावेळी सुद्धा सफरचंद,आंबा,बांबू अशा अनेक झाडांची त्यांनी लागवड केलेली असल्याने सध्याच्या या उन्हाळ्यामध्ये झाडांची काय परिस्थिती आहे त्याचे त्यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी केली
जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथील ग्रामपंचायती प्रत्येक कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्या विरोधात ग्रामपंचायती समोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरु केले आहे..
घरकुल योजनेचा लाभ भूमिहीनाना सोडून श्रीमंत व्यक्तींना देणे, गावातील विकास कामे फक्त कागदावर पूर्ण व त्याची लाखो रुपयाची बिले काढून मोकळे, अश्या मनमानी कारभरा विरोधात जळगावजामोद तहसीलदाराकडे अनेक तक्रारी केल्या गेल्या
मात्र अद्याप कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायती समोरच आमरण उपोषण सुरु केले आहे..
जो पर्यंत ग्रामसेवका वर कारवाई होत नाही तोपर्यन उपोषण सोडणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्याने दिला आहे
येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा याञेत एसटी महामंडळाच्या धाराशिव विभाग कार्यालयाला ४० लाखांवर उत्पन्न मिळाले आहे.
येडेश्वरी याञेसाठी १३० बसच्या १ हजार ९७१ फेऱ्या झाल्या असुन यामध्ये १ लाख ९ हजार १२३ महीला व पुरुषांनी प्रवास केलाय येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने ज्यादा बसचे नियोजन करण्यात आले होते
भाविकांना योग्य सेवा मिळावी कोणतीही गैरसोय होवु नये यासाठी जिल्ह्यातील सर्वच आगारातून ज्यादा बस सुरू केल्या होत्या.
पार्ट टाइम जॉब देण्याच्या नावाखाली तब्बल सहा लाख 32 हजारांनी फसवणूक केल्याची घटना यवतमाळ शहरातील उमरसरा परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात निशांत लाभणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रिया सनियाल या तरुणीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणाऱ्या तरुणीची शोध पोलिस घेताहेत.
अकोल्यातल्या मुर्तिजापूरात दुर्मीळ पांढऱ्या चिमणीचं दर्शन झालंये..
मूर्तिजापूरातील राजुरा घाटे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या परिसरात ही दुर्मीळ पांढऱ्या रंगाची चिमणी दिसून आलीये..
या दुर्मीळ पक्ष्याचे निरीक्षण शाळेतील पक्षीमित्र मनोज लेखनार यांनी केले.
लेखनार हे गेले चार वर्षे शालेयमध्ये चिमणी संवर्धनाचे कार्य करत आहेत. दरम्यान, ही पांढरी चिमणी अर्थातच 'अल्बिनो हाऊस स्पॅरो' असून, तिच्या शरीरातील मेलॅनिन या रंगद्रव्याचा पूर्ण अभाव असल्याने ती पूर्णतः पांढरी दिसतेये..
अकोलेकरांना आता तब्बल पाच दिवसानंतर पाणीपुरवठा होणारेय.
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी झाल्याने महापालिकेने हा निर्णय घेतलाय.
10 दिवसांपूर्वी अकोला शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत होताय. गेल्याच आठवड्यात महापालिकेने चार दिवसानंतर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अंमलात आणला होताय.
मात्र, दिवसेंदिवस कमी होणारी पाणी पातळी पाहता महापालिकेने काल 16 एप्रिलपासून तब्बल 5 दिवसानंतर अकोलेकरांना पाणी देण्याचा निर्णय घेतलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.