Maharashtra Live News Update: धाराशिवात मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२५, आजपासून नवरात्रोउत्सव, देशात जीएसटी रिफॉर्म सुरू, ५ आणि १८ असे दोनच स्लॅब राहणार, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

Dharashiv : धाराशिवात मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

धाराशिव जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

पावसामुळे उद्या शाळेला सुट्टी असणार

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी

जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीत असल्याने शाळांना सुट्टी जाईल

शिक्षण विभागाने काढले सुट्टीचे पत्रक

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा नांदेड दौरा पुढे ढकलला

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा उद्याचा नांदेड दौरा पुढे ढकलला

23 ते 24 सप्टेंबर दरम्यान विविध विभाग अंतर्गत सुरू असलेल्या कामाचा होता पाहणी दौरा.

हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केल्याने दौरा पुढे ढकलल्याचे देण्यात आले कारण

Akola : अकोल्यातील पारस गावात आई तुळजा भवानीची प्रतिष्ठापना

अकोल्यातील पारस हे औष्णिक विद्युत केंद्रामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं गावं आज भक्तीरसात न्हाऊन निघालंय. निमित्त होतंय आई तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवानिमित्याच. आज पारस गावात तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या मंदिरातून आणलेली मशाल अर्थातच अखंड ज्योतीची गांवात नगर प्रदक्षिणा करण्यात आलीय. यावेळी हजारो संख्येने भक्त देवीच्या उत्सवात सहभागी झाले. गावातील बहुसंख्येने असलेल्या लांडे कुटूंबियांनी देवीची आधीच गावात आई तुळजा भवानी प्रतिष्ठापना केली आहे.. आज घटस्थापनासाठी मदुराईच्या मीनाक्षी मंदिराचे पुजारी अमित शुक्ला उपस्थित होतेय

अनवाणी पायाने शेताच्या बांधावर जावून आमदार अब्दुल सत्तारांनी केली नुकसानीची पाहणी

सोयगाव मतदारसंघातील बनोटी, आमठाणा व इतर मंडळात पुन्हा झालेल्या अतिवृष्टी व सातत्याच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार आज सिल्लोड - सोयगाव दौऱ्यावर होते. आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड - सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीची तसेच उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला.

परभणी शहरासह जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

परभणी शहरासह जिल्हा भरात दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय मागच्या एक तासापासून परभणी पूर्णा गंगाखेड सोनपेठ मानवत सेलू तालुक्यातील १ तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.काल रात्रीही असच पाऊस शहरासह जिल्ह्यात झाला होता आजही त्याच पद्धतीने पाऊस सुरू आहे त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे तर ग्रामीण भागातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

शिंदे गावातील पुरात अडकलेल्या नागरिकांचं धोकादायक स्थितीतून रेस्क्यू

हिंगोलीच्या वसमत तालुक्यात अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे, यामुळे पुन्हा एकदा शेतीचं प्रचंड नुकसान झाल आहे तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्याने शेतातील 25 ते 30 शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले आहेत.

अतिउत्साहीपणा नडला! कळंब बीचवर पर्यटकांची गाडी भरतीच्या पाण्यात अडकली

भरती येत असताना किनाऱ्यावर रपेट मारण्यासाठी या पर्यटकांनी आपली स्कार्पिओ गाडी किनाऱ्यावर उतरवली. मात्र गाडी वाळूमध्ये अडकली आणि भरतीचे पाणी वाढल्याने या पर्यटकांच्या उत्साहावर विर्जन आले.

त्यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने मदत करून गाडी कशीबशी बाहेर काढली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र पर्यटकांचा हा अतिउत्साहपणा जीवावर देखील बेतला असता.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने हिवरा नदीत घेतली उडी,पाचोऱ्यामधील धक्कादायक घटना

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने हिवरा नदीत घेतली उडी, पाचोरा शहरातील पुलावरून नदीत उडी टाकली, नदीत उडी का मारली याचे कारण अस्पष्ट, व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय.

पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल १२ किलो गांजा जप्त

तब्बल १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणात दोन आरोपींना केली अटक करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारभावानुसार किंमत तब्बल ५ लाख रुपये इतकी आहे.

आज सकाळी संशयित हालचालींवरुन पोलिसांनी सापळा रचून गांजाचा साठा जप्त केला आहे.

Nanded : नांदेड शहरात पावसाला सुरुवात

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नांदेड शहरासह काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे.काल रात्री पावसाने नांदेड जिल्ह्याला झोडपले.आज पुन्हा नांदेडमध्ये पावसाने हजेरी लावलीय.पुढील तीन दिवस हवामान खात्याच्या वतीने नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Pune : ट्रकच्या टायर खाली चिरडून निष्पाप महिलेचा बळी

पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या आर एम सी ट्रकच्या टायर खाली चिरडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काही वेळापूर्वी काळेवाडी येथील डी मार्ट समोर ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. महिला आपल्या घरी किराणा सामान घेऊन जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या आर एम सी ट्रक चालकाने तिला आपल्या वाहनाच्या चाकाखाली चिरडलं आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक पोलिसांनी डंपर ट्रक चालक आणि आर एम सी ट्रक चालक यांना वाहतूक करण्यासाठी एक वेळ मर्यादा आखून दिली आहे. मात्र डंपर ट्रक चालक तसेच आरएमसी ट्रक चालक नियमबाह्य वेळेत वाहतूक करत असल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे.

ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी काळेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. तसेच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आरएमसी ट्रक चालकाला काळेवाडी पोलिसांनी सध्या ताब्यात घेतला आहे.

Pune : परराज्यातुन येवुन केबल चोरी करणा-या टोळी अटकेत

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत चेंबरमधुन बी.एस.एन.एल. ऑफीसची अंन्डर ग्राऊंन्ड असेलली फिनोलॅक्स कंपनीची २०० मीटर लांबीची काळया रंगाची व त्यामध्ये कॉपर असलेली केबल ही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करुन नेली म्हणुन फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी हे संगमवाडी पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांचा शोध घेवुन आरोपी नामे १) नसरुल बिलाल मोहम्मद, वय २३ वर्ष, रा.१५७ हरिजन कॅम्प मंडावली फाजलपुर, लक्ष्मी नगर, नवी दिल्ली २) संजीव कुमार श्रीसेवाराम वर्मा, वय ३७ वर्ष, रा. साऊथ गणेशनगर नवी दिल्ली ३) फईम अहमद शरीफ अहमद शेख, वय ४२ वर्ष, रा. कलवड वस्ती, लोहगाव पुणे ४) वारीस फकीर मोहम्मद, वय ३५ वर्ष, रा. हरिजन कॅम्प मंडावली, फाजलपुर लक्ष्मी नगर, नवी दिल्ली यांना ताब्यात घेण्यात आले.

Akola : तरूणाने साडी नेसत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात केलं सडा-सारवण

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील टाकळी निमकर्दा गावातील अक्षय साबळे या तरुणाच्या गांधीगिरीची सध्या चांगली चर्चा सुरूये. टाकळी गावात गेल्या दोन वर्षापासून ईगल इन्फ्रा या कंपनीने पाणीपुरवठा योजनेसाठी रस्ते खोदून ठेवलेयेत. मात्र, गेल्या दोन वर्षापासून धड या गावातील पाईपलाईनचे काम पूर्ण झालं, ना रस्त्याची दुरुस्ती. या खोदलेल्या रस्त्यांमुळे ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांना चिखलाच्या साम्राज्यत राहावं लागतंय.

याच विरोधात आज गावातील अक्षय साबळे या तरुणाने अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या कार्यालयात गांधीगिरी आंदोलन केलंय. अक्षय थेट साडी नेसत महिलेच्या वेषात नेहरुपार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात आलाय. येथे त्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा निषेध करीत सडा सारवण आंदोलन केलंय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वेळखाऊ धोरणामुळे कंपनी मग्रुरी करत असल्याचा आरोप या तरुणाने केलाय. ईगल इन्फ्रा ही कंपनी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याची कंपनी आहे.

कानगाव मध्ये कांद्याच्या बाजारभावासाठी शेतकऱ्यांचे अर्ध नग्न आंदोलन

कानगाव येथील शेतकरी धरणे आंदोलनाचा आज पाचवा दिवस. कांद्याला 35 रुपये हमीभाव मिळवा संपूर्ण कर्जमाफी व्हावी. यासहित इतर मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे कानगाव तालुका दौंड या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शेतकरी आक्रमक झालेला दिसून आला.शेतकऱ्यांनी आज अर्धं नग्न होत घोषणा देत शासनाचा निषेध व्यक्त केला.कष्टकरी शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला बाजार भाव नाही व पावसाने सुद्धा कहर केला आहे. त्याचप्रमाणे वखारीतीला कांदा खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून शेतकरी आता आक्रमक झाला आहे. कारण शासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्याकडे नाही. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे शेतीमालाच्या बाजारभावावरती अवलंबून असते. शेतीला बाजार भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना मुलांची शिक्षणाची फी,कर्ज, दवाखाना खर्च व शेतीसाठी नवीन भांडवला साठी पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आर्थिक आणीबाणी तयार झाली आहे.यासाठी शासनाने त्वरित योग्य पावले उचलली नाही तर शेतकऱ्यांच्यात आक्रोश होऊन राज्य व्यापी मोठे आंदोलन उभे राहील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे शासनाने वेळीच शेतकऱ्यांच्या मागण्याकडे व कर्जमुक्ती कडे लक्ष देणे गरजेचे आहे.आज झालेल्या अर्ध नग्न आंदोलनामध्ये इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raigad: रायगडच्या कर्जतमध्ये खासदार सुनील तटकरे यांचा सपत्नीक नागरी सत्कार

रायगडच्या कर्जतमध्ये रविवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, रूपाली चाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्कार कार्यक्रमादरम्यान शिवसेना सहसर्पक प्रमुख सुनिल पाटील, उत्तर रायगड भाजप महिला अध्यक्षा अश्विनी पाटील, भाजप कर्जत शहर अध्यक्ष राहुल जाधव याच्यासह असंख्य शिवसेना भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश झाला.

Kolhapur: भरधाव कारने महिला आणि शाळकरी मुलाला उडवले

कोल्हापुरात भरधाव कारने महिला आणि शाळकरी मुलाला उडवले

फुलेवाडी रिंगरोड बोंद्रेनगर येथील घटना

रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या महिला आणि मुलाला उडवल्याने महिला गंभीर जखमी

घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद

Dhule: खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरा देवी मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात

आज घटस्थापनेसोबतच शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, धुळ्यातील पांझरा नदीकाठी वसलेल्या खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या प्राचीन मंदिरात आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या तसेच जिल्ह्याबाहेरील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघावयास मिळाले आहे, मानाच्या आरतीचा लाभ घेण्यासाठी महिला आणि पुरुषांनी मोठी गर्दी केली होती, देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारुन गेला होता.

यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी, राळेगाव, घाटंजी आणि आर्णी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला असून आधीच शेत शिवारात पाणीच पाणी असल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती असताना पुन्हा मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून भीती व्यक्त केली जात आहे.

मुंब्रातील गावदेवी बायपास येथे कंटेनरखाली येऊन ३ मुलांचा मृत्यू

मुंब्रा येथील गावदेवी बायपास येथे मोठ्या कंटेनर खाली येऊन तीन स्थानिक मुलांचा जीव गेला. बाईकवर हे मुले आपल्या कामानिमित्त बाहेर चालली होती त्यावेळेस अपघात घडला. मुंब्रा पोलीस स्टेशन मुंब्रा फायर ब्रिगेड व आपत्ती व्यवस्थापन कक्ष व ॲम्बुलन्स यांना त्वरित बोलून मदत कार्य सुरू केले आहे. ठाण्यातून शिळफाटा या ठिकाणी जाताना सदर अपघात झाला आहे.

Ahilyanagar: अंत्यविधीसाठी जागा मिळत नसल्यानं मृतदेह तहसील कार्यालयासमोर आणत आंदोलन

अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील पाटेवाडी या गावांमध्ये 65 वर्षे वय असलेल्या बेबी पवार या आदिवासी वृद्ध महिलेचा रविवारी मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर दोन दिवस झाले असून अंत्यविधीसाठी जागा मिळत नसल्यामुळे मृतदेह तहसील कार्यालया समोर आणला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातच टिकाव खोरे घेऊन त्या ठिकाणी खड्डा घेऊन अंत्यविधी करण्याचा इशारा देत आंदोलन सुरू केले आहे. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी मृतदेह यापूर्वी ज्या ठिकाणी अंत्यविधीची जी जागा होती त्या सरकारी जागेमध्ये घेऊन गेले असताना काही ग्रामस्थांनी अंत्यविधी करण्यासाठी विरोध केला. यानंतर आदिवासी बांधवांनी प्रशासनाला कळूनही त्यांनी दखल घेतली नाही म्हणून आज अखेर मृतदेह घेऊन सर्व आदिवासी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तहसील कार्यालय बाहेर आंदोलन सुरू केले आहे.

Jalna: धनगर नेते दिपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस

धनगर नेते दिपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस, अद्याप सरकारकडून संवाद नाही...

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू आहे आमरण उपोषण....

राज्यातील धनगर समाजातील नेत्यांनी धनगर आरक्षणावर बोलावं दिपक बोऱ्हाडे यांचा आवाहन...

Beed: बीड जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने आणि गावांचा संपर्क तुटला

बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री ढगफुटी झाली आष्टी पाटोदा शिरूर बीड या भागांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सिंदफना नदीला महापूर आला आणि नदीकाठचे अनेक गावं पाण्याखाली गेली असून संपूर्ण शेतामध्ये तलावाचा स्वरूप आला आहे बीड मधील साक्षर पिंपरी धारवंटा उकडपिंपरी कमळेश्वर धानोरा धारवंटा शिरापूर गात या गावांमध्ये पाणी शिरलंय.

Chhatrapati Sambhajinagar: रुद्रेश्वर लेणी डोंगरावरील दरड कोसळली

सोयगाव तालुक्यात रात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे, सोयगाव पासून जवळच असलेल्या रुद्रेश्वर लेणी परिसरात पावसाचा जोर जास्तच असल्याने रुद्रेश्वर लेणीच्या धबधब्यावरील पाण्याचा प्रवाह वाढल्याने लेणी जवळील दरड कोसळली आहे यामुळे लेणीला देखील धोखा निर्माण झाला आहे

Buldhana: बुलढाणा ते चिखली रस्ता वाहतुकीसाठी बंद ..

बुलढाणा तालुक्यातील पाडळी, दत्तपूर, गिरडा या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे .. नदीकाठावरील शेती खरडून गेली .. येळगाव धरण 100 टक्के भरले असल्यामुळे आणि या धरणपरिक्षेत्रात पाऊस झाल्यामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आलेला आहे.. त्यामुळे चिखली ते बुलढाणा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय .. नदीचे पाणी आणखी वाढत असल्यामुळे नदीकाठचे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.. तर सिंदखेडराजा, लोणार तालुक्यामध्ये सुद्धा पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची आहे..

Chandrakant Patil: उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले तर काँग्रेस बाहेर पडेल - चंद्रकांतदादा पाटील

उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलताना ते दोघे एकत्र आले तर काँग्रेस बाहेर पडेल अस भाकीत मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रायगडमध्ये केल आहे. युती होते तेंव्हा जागा न मिळालेले नेते कार्यकर्ते डिसटर्ब होतात. तेथे व्होटबँक तुटायला सुरुवात होत असल्याचे मत चंद्रकांतदादांनी मांडल आहे. यांना कोणाला बाकी कुठे इंट्रेस नाही, मुंबई. हे सगळ मुंबईसाठी चलल आहे. विकासामुळे मुंबई, महाराष्ट्राची जनता महायुती बद्दल कन्व्हीन्स आहे त्यामुळे काही झाल तरी फरक पडणार नाही असा विश्वास चंद्रकांतदादांनी व्यक्त केला आहे.

Latur: लातूरमध्ये तहसीलदाराच्या दालनातच शेतकऱ्याचा आत्महत्याची प्रयत्न

अतिवृष्टीची बोगस यादी बनवणाऱ्या अधिकार्‍यावर कारवाई करा, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना पिक विमा द्या. मागणीसाठी लातूरच्या अहमदपूर मध्ये शेतकरी आक्रमक झाले आहेत. अहमदपूर तहसीलदारांच्या दालनात चक्क निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी फाशी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान वेळीच नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने हा अनर्थ टाळला आहे. मात्र अतिवृष्टी आणि पिक विमा, या विषयाला धरून शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे. अतिवृष्टीची बोगस यादी बनवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी शेतकरी अहमदपूर तहसील कार्यालयात गेले होते.

Pachora: पाचोरा शहरासह परिसरात मुसळधार पावसाचा हाहाकार

पाचोरा शहरातील जनता वसाहत बहिरम नगर यासह अन्य भागात नागरिकांच्या घरात शिरले पाणी

नदीचे पाणी घरात शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान..

पालकमंत्री गुलाबराव पाटील आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार किशोर पाटील यांनी केली पाहणी...

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा गाळण भारत नाचनखेडा याचा इतर गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती

दोन्ही मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाचे पाहणी करून तात्काळ मदत करण्याचे दिले आश्वासन...

संपूर्ण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदार किशोर पाटील यांची मागणी...

Pune News: बंडू आंदेकर टोळीच्या अवैध हॉर्डिंग आणि बांधकामावर पोलिसांचा हातोडा

बंडू आंदेकर टोळीच्या अवैध हॉर्डिंग आणि बांधकामावर पुणे पोलिसांचा हातोडा...

नाना पेठेतलं अतिक्रमण पाडायला सुरूवात....

पुणे पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

नाना पेठेत पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात

Dharashiv: परंडा तालुक्यात १३१ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले

देवगाव 34 नरसाळी 22 वडनेर 25 ढगपिंपरी 13 रुई चार दुधी 13 खासगाव कुंभार वस्ती 20

एकूण 131 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले

हेलिकॉप्टर च्या साह्याने आता देवगाव व नरसाळी येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू

लाखी बाकी येथील नागरिक रेस्क्यू करून बाहेर काढले

अहिल्यानगर व पुणे येथील एन आर एफ ची टीम संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात दाखल होणार

धाराशिव जिल्हा प्रशासनाची माहिती

परंडा तालुक्यातील गावात पुर; ४८ लोक अडकले, NDRF ला पाचारण

भुम आणि परंडा तालुक्यातील वडनेर, ढगपिंपरी, रुई, देवगाव, नरसाळे वस्ती गावात ४८ लोक अडकले.

NDRF ला पाचारण करण्यात आलंय. नाशिकवरून आर्मीचे हेलिकॉप्टर त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू केले आहे.

लाख गावात १२ लोक अडकले होते, त्यांना धाराशिव जिल्हा टीमने सुरक्षित स्थळी हलविले.

Nashik: भुजबळांच्या हस्ते घटस्थापना होऊन देवीचे घेतले दर्शन

नाशिकच्या येवला तालुक्यातील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती असे त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा मातेचा नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून नवरात्री उत्सवानिमित्त मंदिरापुढे रमेशगिरी महाराज ,मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येऊन महापूजा,आरती करण्यात आली. घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेलाच.. सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शनाकरता भाविकांची गर्दी बघायला मिळाली.यावेळी मंत्री छगन भुजबळांनी देखील जगदंबा मातेचे दर्शन घेतले. सर्वांना सुखी समाधानी ठेव देशावरची व राज्यावरची संकटी दूर करा असे साकडे भुजबळांनी देवीकडे घातले...

पुढील दोन दिवसात काढणीसाठी आलेली पिके काढून घ्यावीत, तज्ज्ञांनी सांगितलं

पुढील दोन ते तीन दिवसात जी पिकं काढायला आलेली आहेत अशी पिके शेतकऱ्यांनी काढून घ्यावीत

महाराष्ट्रात पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता...

25,26,27 सप्टेंबरला महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

25,26,27 सप्टेंबरला महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसह सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता....

Paithan: पैठण तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार

पैठण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नेहमी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला असून, हातात आलेले कापसाचे पीक पाण्याखाली गेले आहे. कापसाच्या बोंड्यांवर पाणी साचल्याने ती सडायला लागली असून, "पांढरे सोने" म्हणून ओळखले जाणारे कापूस शेतकऱ्यांसाठी आता मोठी चिंता ठरत आहे.

Jalna Rain: जालन्यात पावसाचा कहर, दहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी

जालन्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. जालना जिल्ह्यातील दहा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक सेवली महसूल मंडळामध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर रात्री 3 वाजेपासून ते सकाळी 7 वाजेदरम्यान जालना जिल्ह्यात सरासरी 29 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 10 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे, रात्री झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाल असून अनेक भागांमध्ये सोयाबीन आणि कपाशी पिके पाण्याखाली गेली आहे.

या महसूल मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी

जालना शहर 76 मिमी, सेवली 111 मिमी, रामनगर 76 मिमी, पाचनवडगाव 76 मिमी, जामखेड 68 मिमी, रोहिलगड 65 मिमी, सुखापुरी 67 मिमी, बदनापूर 65 मिमी, शेलगाव 65 मिमी, रोशनगाव 66 मिमी,

Virar: देवीची मूर्ती आणायला गेलेल्या भक्ताचा भीषण अपघात; टँकरची धडक

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात

देवीची मूर्ती आणण्यासाठी गेलेल्या भक्ताला पाण्याच्या टँकरची धडक

टँकरच्या चकाखाली तरुण सापडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

मनसेने आक्रमक भूमिका घेत महामार्गाला जोडणारा रस्ता केला पूर्णपणे बंद

महामार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी

मनसेचे वैभव खेडेकर यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश

मनसेचे वैभव खेडेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा उद्या मुंबईत पक्षप्रवेश

दुपारी तीन वाजता नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

नितेश राणे आणि नारायण राणे देखील हजर राहण्याची शक्यता

मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी शहरातील काही प्रमुख पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी यांचा उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश

आज दुपारी चार वाजता मनसेचे पदाधिकारी रत्नागिरी शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत भाजपा प्रवेशासाठी मुंबईच्या दिशेने निघणार

रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आज खेडमध्ये मुक्काम

उद्या सकाळी वैभव खेडेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी मुंबईच्या दिशेने होणार एकत्रित रवाना

Chhatrapati Sambhaji Nagar: अंबादास दानवे यांनी अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर व जळगाव येथे भर पावसात माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची आज पाहणी केली. मागील चार-पाच दिवसांपासून वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने येथील टोमॅटो, मका, कपाशी, तूर व अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. शेतातील उभ पिकं सडायला लागली असल्याने शासनाने तातडीने पंचनामेचे आदेश देऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

चांदणी नदीला पुर; लोकांनी घराच्या पत्र्यावर घेतला आसरा

परंडा तालुक्यातील देवगाव येथे पुराच्या पाण्यामुळे लोकांनी घराच्या पत्रावर जात घेतला आसरा

पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी ज्येष्ठ नागरिकासह महिला गावकरी पत्र्यावर

देवघर खुर्द येथे चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल

तीन ते चार कुटुंबातील पंधरा ते वीस लोक अडकल्याची माहिती

Jalna: जालन्यात पावसाचा हाहाकार

जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जालना शहरासह दहा ते पंधरा गावचा पाणी प्रश्न अवलंबून असणारा कल्याण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच अतोनात नुकसान होत आहे तर जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने समाधान देखील व्यक्त होत आहे.

Dharashiv: परंडा तालुक्यातील कांदलगाव भीषण पुर स्थिती; पिके गेली पाण्याखाली

धाराशिव च्या परंडा तालुक्यातील कांदलगाव भीषण स्थिती; पिके गेली पाण्याखाली त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. एकंदरित भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

Jayant Patil: राजारामबापू पाटील आणि जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीचा मोर्चा

स्व. राजारामबापू पाटील आणि जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीचा सांगलीत राज्यस्तरीय महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा निघणार आहे. सांगलीच्या कर्मवीर चौकातून या मोर्चाला 1 वाजता सुरवात होणार आहे. तर मुख्य चौकातून आणि शहरातून हा मोर्चा स्टेशन चौकात राजारामबापू याच्या पुतळ्या येथे सभेतून या मोर्चाचा समारोप होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत.

साकत येथे पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातील साकत येथे मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाणी शिरले आहे. पूर परिस्थितीमुळे साकत गावाचा संपर्क तुटला असून तिथे १२ नागरिक अडकले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश दिले आहेत.

Beed: बीडच्या आष्टी पाटोदा शिरूर कासार मध्ये ढगफुटी; सिंदफणा नदीला महापूर

बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री आष्टी पाटोदा शिरूर आणि बीड या भागामध्ये ढगफुटी झाली यामुळे बीड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाला असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचे स्वरूप आल आहे.तर अनेक गावांचा संपर्क तुटला असून सिंधफना नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला आहे मात्र यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे

AHILYANAGAR : . मुसळधार पावसामुळे महामार्ग व राज्य मार्गांवरील वाहतूक ठप्प

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग कल्याण–विशाखापट्टणम, राज्य महामार्ग बारामती–छत्रपती संभाजीनगर, राज्य मार्ग पाथर्डी–बीड तसेच बीड ते मोहटा देवस्थान या महत्त्वाच्या रस्त्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असून, प्रशासनाने सर्व वाहतूक बंद केली आहे. पर्यायी मार्गांही बंद झाले आहे.

nanded : नांदेडच्या माहूर गडावर शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात

शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या नांदेडच्या माहूर गडावर भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केले आहे. भाविकांसाठी मंदिर संस्थांच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सकाळी श्री रेणुका मातेचा अभिषेक वस्त्र अलंकार प्रधान व घटस्थापना आणि महाआरती पार पडणार आहे.

Rain News : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी..

रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे सीना नदीला आला पुर..

या पुराच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग तसेच बोलेगाव आणि वारुळाचा मारुती कडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद..

सीना नदीला आलेल्या पुरामुळे शिवाजीनगररोड, नालेगाव आणि बोल्हेगाव भागातील जगजीवन झाले विस्कळीत..

जोरदार पावसामुळे रस्ते,ओढे, नाल्यांना आले नदीचे स्वरूप..

गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान..

सरकारने तत्काळ पंचनामे करून भरपाईची शेतकऱ्यांची मागणी..

Pune : पुण्याची ग्रामदेवी श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना

आजपासून शारदीय नवरात्रला सुरुवात होत असून पुण्यातील ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या तांबडी जोगेश्वरी मंदिरात आज सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळतेय. तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. नवरात्रीच्या निमित्ताने मंदिराला सुंदर आरस केली गेली आहे. उत्सवाच्या काळात देवीचा विविध रुपांमध्ये श्रृंगार केला जातो. तांबडी जोगेश्वरी हे ऐतिहासिक असून या मंदिरामध्ये पेशवे देखील दर्शनासाठी येत असत. महिषासुराचे बारा सेनापती होते. त्यात ताम्रसुर नावाचा एक सेनापती होता. त्याचा वध या देवीने केला त्यामुळे या देवीला ताम्र जोगेश्वरी म्हणू लागले. पुढे जाऊन ताम्रचे तांबडी जोगेश्वरी झाले. योगेश्वरी माताचे दुसरे नाव म्हणजेच जोगेश्वरी आहे. पुण्यामध्ये जोगेश्वरी देवीची तीन मंदिरं आहे. त्यातील तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदेवी आहे. न

buldhana : विदर्भ मराठवाडा या दोन विभागाला जोडणारा मार्ग बंद

सिंदखेडराजा तालुक्यात् पुन्हा एकदा ढगफुटी झाली असून रात्री पाडून तालुक्यातील सर्व नद्या नाल्याना पूर आले आहेत.. सोनोशी गावा जवळून वाहणाऱ्या विद्रुपा नदीला महापूर आला असून विदर्भ - मराठवाडा जाणारा महामार्ग गेल्या 6 तासापासून बंद झाला आहे . .. नदीला पूर आल्याने गावात व शेतात पाणी शिरले आहे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, काही जनावरे वाहून गेली आहेत... त्यामुळे शेतकरी पुम्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे..

पगार, पेन्शन कर्जावरील व्याजानं राज्ये खिळखिळी | Salary And Pension News

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराला आकर्षक फुलांची आरास

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज शादीय नवरात्र उत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराची आकर्षक अशा फुलांनी सजावट करण्यात आली आहे. देशी विदेशी फुलांचा वापर करून केलेल्या सजावटीमुळे आई तुळजाभवानीचा मंदिर परिसर फुलून गेला आहे. दुपारी बारा वाजता मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे.

गुणरत्न सदावर्ते यांची आई साम टीव्हीवर, मुलाला म्हणाली जरा शांत रहा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आक्रमक बोलणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना आता त्यांच्या आईने शांत राहण्याचा सल्ला दिला आहे, सध्या गुनरत्न सदावर्ते हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत काल जालन्यामध्ये मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हाताने मारत सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर हिंगोली मध्ये देखील अँडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या सगळ्या घटनांवर अँडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या आईने माध्यमांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे, साम टीव्हीशी बोलताना सदावर्ते यांच्या मातोश्री यांनी आपला मुलगा गुणरत्न सदावर्ते कायद्याने बोलतो तो वकील आहे

Crime News : मध्यरात्री गॅस कटर च्या सहाय्याने ATM मशीन फोडून 10 लाखांची रोकडं लंपास.

चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील भर वस्तीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये घुसून चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील दहा लाख रुपयांची रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना चिखली शहरात घडली आहे. चोरट्यांनी सुमारे दीड तास या एटीएम मध्ये धुमाकूळ घालत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून ही रोकड लांबवली यामुळे मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे अतिशय दाट वस्तीच्या असलेल्या राऊतवाडी परिसरात अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकही भयभीत झाले आहेत. पोलीस आता विविध माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

raigad :  नेरळ माथेरानच्या रस्त्याची दुरावस्था

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. पावसाळ्या दरम्यान रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला गटार काढुन न दिल्याने डोंगरात पडणाऱ्या पावसाचे पाणी रस्तावरून वाहिल्याने माथेरानच्या घाट रस्त्या चरा प्रमाणे लांब खड्डे पडले आहेत. यामुळे नेरळ ते माथेरान या आठ किलोमिटरच्या रस्त्यावर अपघात जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्यटक आणि स्थानिकांच्या वाहनांचे या खड्डयांमुळे नुकसान होत असून अपघात देखील होत आहेत. पावसाळा संपत आला असून आता पर्यटनाचा हंगाम सुरू होणार आहे. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रशासनाने हा नेरळ माथेरान रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा नेरळ माथेरान टॅक्सी मालक चालक संघटनेनी दिला आहे.

Rain News : संभाजीनगरला झोडपले

छत्रपती संभाजीनगर : मध्यरात्रीपासून पुन्हा शहरासह वैजापूर, पैठण, कन्नड, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव परिसरात जोरदार पाऊस

कन्नड तालुक्यातील सावरगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

सावरगाव मध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर शेती पिकांचे मोठे नुकसान

नदीला मोठा पूर आल्याने घाटनांद्रा सिल्लोड संपर्क तुटला

मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू

Tuljapur : तुळजाभवानी देवी मंचकी निद्रा संपुन सिंहासनावर विराजमान

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची नऊ दिवसाची मंचकी निद्रा संपून आज देवी सिंहासनावर पुन्हा विराजमान झाली आहे.देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पुजा होवुन सुरूवात होणार आहे.दरम्यान देवीची मुर्ती ही चल मुर्ती आहे.मध्यराञी १ वाजुन १५ मिनिटांनी चरणतीर्थ झाले तर राञी सव्वा दोन वाजता तुळजाभवानीची मुर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.काळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान तुळजाभवानी मातेची धुपारती व घटस्थापना होणार आहे.तर नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदीराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नवराञ उत्सवाचा पाहीलाच दिवस असल्याने तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळत आहे.

DHARAshiv : परंडा तालुक्यातील चांदणी नदीने रौद्ररूप,सिरसाव गावातील शाळा सरकारी दवाखाना व घराघरात घुसले पाणी

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा मोठा कहर पाहायला मिळत आहे.राञी झालेल्या अतिवृष्टीमुळे चांदणी नदीने रौद्ररूप धारण केले आहे.परंडा तालुक्यातील सिरसाव गावात चावडी शाळा व घराघरात पाणी साचले आहे, यामुळे गावकऱ्यांच्या नुकसान झाले असून, घराघरात पाणी सुचल्या जीवनावश्यक वस्तूचे होते नुकसान झाले असून मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकांचे हे अतोनात नुकसान झाले असून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी ही करण्यात येत आहे. सिरसाव गावातील नदीला महापूर आल्यामुळे नदीच्या पलीकडे जवळपास 200 -300 लोक अडकल्याची माहिती आहे. 

PANDHARPUR : पंढरपूरच्या उपरीत मुसळधार पाऊस

पंढरपूर तालुक्यातील उपरी व परिसरात  रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. ऊस पिकासह अनेक शेती पिकात गुडघाभर पाणी साचले आहे. 

सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. कासार ओढ्यावरील सुपली आणि पळशी गावा दरम्यानचा पुल पाण्याखाली गेला आहे

YAVATMAL : आसेगाव देवी येथे आज पासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ

यवतमाळ च्या बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव येथे आदिशक्तीचे प्राचीन देवस्थान असून आज नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घटस्थापना होणार आहे.भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आई जगदंबेच्या चरणी नवही दिवस आसेगाव देवी येथे भक्तांची गर्दी उसळणार आहे.आसेगाव देवी येथील आदिशक्तीच्या देवालयाबाबत मोठी अख्यायिका आहे.संस्थानच्या वतीने या सदर्भात माहिती देण्यात आली इ.स.१६७० मधे आसेगाव देवी मधे मराजी नावाचे देवीचे भक्त होऊन गेले.दिवसभर मराजी गावातील गुरे ढोरे चारायचे त्यानतंर गोठानाची ते साफसफाई करायचे पुरातन काळात जणू त्यांनी गावकऱ्यांना स्वच्छेतेचा मंत्र दिला होता.गावामध्ये गोधनाची संख्या वाढावी व त्यातून गावकरी समृद्ध व्हावे या साठी मराजी झटायचे.त्यांची अहोरात्र गो मातेची सेवा पाहून आई जगदंबेने त्यांना साक्षात दर्शन दिले.

RAIGAD : माथेरानमध्ये घोड्यांच्या डोळ्यांना अज्ञात रोगाची लागण

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये घोड्यांना डोळ्याच्या अज्ञात आजाराची लागण झाली आहे.  गेल्या विस दिवसांपासून उद्भवलेल्या या आजारामध्ये घोड्यांना दृष्टी दोष निर्माण होत आहे.  प्रथम डोळ्यांना सुज, डोळ्यांच्या रंगात बदल आणि दृष्टी कमी होत जाण्याची लक्षण दिसत आहेत.  हा आजर नक्की काय आहे हे अद्याप समजले नसुन या आजाराची 11 घोड्यांना लागण झाली आहे.  घोडा हा माथेरानकरांसाठी केवळ एक प्राणी नसून तो त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य, उत्पन्नाचे साधन आहे.  

DHARASHIV : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात राञी मुसळधार पाऊस

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात  राञी मुसळधार पाऊस

संजीतपुर गावातील तेरणा नदीला पुर,परीसरातील शेतात  घुसले पाणी

काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांच मोठं नुकसान

नदीला पुर आल्याने बंधाऱ्याहुन वाहणाऱ्या पाण्यातुन गावकर्‍यांचा जिवघेना प्रवास

sangli : .. अग्रण धुळगावचा हरित विश्वविक्रम, आईच्या नावाने 1 मिनिटात 1000 वृक्षांची लागवड...

 सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या अग्रण धुळगाव येथे हरित विश्वविक्रम करण्यात आला आहे.एक झाड आईसाठी या उपक्रमांतर्गत अवघ्या एका मिनिटात 1 हजार वृक्षांचा लागवड करण्यात आली आहे.

त्याचबरोबर यावेळी माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत एकूण पाच हजार झाडांचे वृक्षारोपण देखील करण्यात आले. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये अग्रण धुळगाव मधील शालेय विद्यार्थी,महिलांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

NANDED : नांदेडच्या माहूरच्या गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात

नांदेडच्या माहूरच्या गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात

माहूरगडावर राज्यासह देशभरातील भाविक मोठ्या संख्येने श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल.

नऊ दिवस माहूर गडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची असणार रेलचेल.

 देवीचा अभिषेक, वस्त्र अलंकारांचे प्रधान, घटस्थापना,

घट स्थापनेनंतर महाआरती कुमारी का पूजन सोहळा पडणार पार.

मंदिर संस्थान कडून भाविकासाठी उपाय योजना.

माहूर गडाच्या पायथ्या पासून महामंडळाच्या एसटी बसेसची सुविधा.

NASHIK : नवरात्रोत्सव निमित्ताने देवीचे फलक रेखाटन

शारदीय नवरात्रोत्सवाला आज पासून सुरुवात होत असून त्या निमित्ता नाशिकच्या चांदवड येथिल कला शिक्षक देव हिरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या वणी गडावरील सप्तश्रृंगी देवीची प्रतिकृती च फलक रेखाटन करत भाविकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

PUNE | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! 

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यात जिल्ह्यातील ४ ही धरणं १०० टक्के भरलेली

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार ही धरणात १०० टक्के पाणीसाठा

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर मध्ये १०० टक्के पाणीसाठा

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे चार ही धरणे मध्ये मुबलक पाणीसाठा

पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात २९.१२ टी एम सी पाणीसाठा

PUNE | औषधे आजपासून होणार स्वस्त, किंमत जुनी असली तरी जीएसटी कपातीचा लाभ रुग्णांच्या खिशात

औषधांवरील वस्तू व सेवाकरात (जीएसटी) कपात केल्यानंतर औषध नियंत्रकांनी कंपन्या आणि वितरकांना सुधारित किमतीत ग्राहकांना औषधे पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने औषधविक्रेत्यांनी सोमवारपासूनच स्वस्त दरात औषधे देण्याचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे जुनी किंमत असलेली औषधेही नव्या किमतीत मिळणार आहेत. बहुतांश औषधांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर आणला आहे. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटीही आता ५ टक्क्यांवर आणला आहे.

राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा कायम

राज्यात विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते जोरदार सरी कोसळतच आहेत. राज्याच्या कमाल तापमानातील वाढ टिकून आहे. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी आणि विजांसह पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. विदर्भात मुख्यतः उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com