
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने रात्रीपासून विश्रांती घेतली असली तरी आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असून आज देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक सखल भागात पाणी साचून रस्ते बंद झाले होते तर अनेक गावपाड्यांमधील वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. मुसळधार पावसाने रस्ते वाहतूक तसेच रेलवे वाहतुकीवर ही परिणाम झाला होता. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून धामणी धरणाचे पाणी सूर्या नदीत सोडण्यात आल्याने सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.