Maharashtra News Live Update: कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

Marathi Breaking Live Headlines Updates : नीट पेपरफुटीवरून सीजेपीचे आज देशव्यापी आंदोलन, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आषाढी वारी अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news

विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने १५०६ वारकरी पंढरपुरकडे रवाना..

आषाढी एकादशी चे सोहळ्यासाठी खामगाव ते पंढरपूर या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून 1506 वारकरी घेऊन रेल्वेची पहिली फेरी पंढरपूरकडे प्रस्थान केलीय.. दरम्यान मोठ्या संख्येने खामगाव रेल्वे स्थानकावर परिसरातील वारकरी मंडळी जमली होती .. विठू माऊलीचा जयघोष करत हे सर्वजण आनंदी वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.. दरवर्षी फक्त आषाढी करता खामगाव रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या या विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ला परिसरातील वारकरी शेतकरी बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो, दुसरी फेरी सुद्धा लवकरच प्रस्थान करणार आहे. . या रेल्वे फेरी मधून रेल्वे प्रशासनाला पाच लाख पंचेचाळीस हजार 152 रुपयाचे उत्पन्न झाले. तर भाविकान मध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले ..

जालन्याच्या महापौरांनी दिलेली शिस्तभंगाची नोटीस अपक्ष नगरसेवकाने फाडली

जालन्याच्या महापौरांनी बजावलेली शिस्तभंगाची नोटीस अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनी डस्टबिनमध्ये टाकली आहे.जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी महापौर वंदना मगरे यांनी भाजपच्या दोन, शिंदे सेनेच्या एका आणि एका अपक्ष नगरसेवकाला शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर महापौर वंदना मगरे यांनी बजावलेल्या शिस्तभंगाच्या नोटीसा रद्द केल्या आहेत. दरम्यान मी सभेत कुठल्याही प्रकारचे अपशब्द वापरले नाही तरीही मला महापौरांनी नोटीस बजावली महापालिकेत विरोधकांचा आवाज दाबण्याच काम सुरू असल्याचा आरोप अपक्ष नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनी केला आहे.

nashik-kalvan-सततचा पाऊस,पुर पाण्यामुळे शेतात पाणीच पाणी

नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालूक्यातील पश्चिम पट्ट्यात तीन दिवसां पासून सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे चणकापूर धरण क्षेत्रा लगत असलेल्या शेतां मध्ये पावसाचे तसेच नद्यांना आलेल्या पुराचे पाणी साचल्याने मका,सोयाबीन,भात रोपे ही पिक पाण्याखाली गेली असून त्याचा फटका पिकांना बसण्ची भिती व्यक्त केली जात आहे.तर चांगल्या पावसामुळे रखडलेली भाताची लागवण काही भागात होण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केली आहे.

- नाशिकच्या चांदोरी गावातील 40 कुटुंबाचे करण्यात आले स्थलांतर

- चांदोरी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने प्रशासनाकडून खबरदारी

- 40 कुटुंबातील सदस्यांना सायखेडा परिसरातील गोदावरी सोसायटीत हलवले

- गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासन अलर्ट मोडवर

- जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना जेवण आणि निवासाची करण्यात आली व्यवस्था

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल,भोकरदन पोलीस ठाण्यात 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

जालन्यातील पिंपळगाव सूळ येथे बेकायदेशीर वाळू उपशाला विरोध केल्याने एका शेतकऱ्याला शिवीगाळ करीत काठीने व लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कृष्णा जाधव असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सूळ शिवारात पूर्णा नदी पात्रात हि घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तीन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत विसर्ग सुरू

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आषाढ सरींचे जोरदार तांडव सुरू आहे.. 11 टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणात पाण्याची जोरदार आवक सुरू असल्याने, 90 टक्के पाणीसाठा स्थिर ठेऊन प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलाय.. गेल्या 24 तासात घाटघर परिसरात 300 तर रतनवाडी परिसरात 248 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.. जोरदार पाऊस सुरू असल्याने डोंगर दऱ्यांवरील धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत.. पाणलोट क्षेत्रात धो धो पाऊस आणि वारे वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भंडारदरा परिसरातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत

कॉकरोच जनता पार्टीचा आज पुण्यात मोर्चा

शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून जाणार मोर्चा

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ म्हणून मोर्चाचे आयोजन

पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे केले आवाहन

nashik-surgana-पावसामुळे नुकसान,एक जण पुरात वाहून गेला

-नाशिकच्या सुरगाणा तालूक्यात गेल्या तीन दिवसां पासून पावसाने चांगलेच धुमशान घातले असून तालुक्यात अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झाले आहे.तालूक्यातील नद्या,नाल्यांना मोठे पूर आल्याने काही ठिकाणी दरडी कोसळल्याने काही ठिकाणचे रस्ते बंज झाले आहे तर छोटे बंधारे फुटून पाणी वाहून शेतात गेल्याने विहिरी गाळ पाण्याने भरल्या व शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.तर भोरमाळ येथिल पुंडलिक मोतीराम चव्हाण ही व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट

पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पडणाऱ्या पावसाने रात्रीपासून विश्रांती घेतली असली तरी आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असून आज देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक सखल भागात पाणी साचून रस्ते बंद झाले होते तर अनेक गावपाड्यांमधील वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. मुसळधार पावसाने रस्ते वाहतूक तसेच रेलवे वाहतुकीवर ही परिणाम झाला होता. सूर्या प्रकल्पाचे धामणी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून धामणी धरणाचे पाणी सूर्या नदीत सोडण्यात आल्याने सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com