
शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला झाला आहे.
नंदुरबार शहरातील रायसिंग पूरा परिसरातील घटना...
हल्लेखोरांनी घरात घुसून माजी नगरसेविकेवर चाकू हल्ल्याच्या पर्यंत....
हल्ल्यात घरातील महिला जखमी इतर साहित्यांचीही केली तोडफोड....
घरातील पुरुष मंडळी दुखद घटनेच्या ठिकाणी बाहेर गेले असता झाला घरावर हल्ला...
हल्ल्याचा घटनेने नंदुरबार शहरात खडबड....
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात....
पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून अनोख्या शुभेच्छा देण्यात येणार आहे. खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास ड्रोन शो आयोजित केलाय. पावसामुळे आज होणार ड्रोन शो उद्या होणार आहे. १००० ड्रोन द्वारे हा शो होणार आहे आणि वेगवेगळ्या कलाकृती ड्रोन द्वारे साकारण्यात येणार आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच याच आयोजन करण्यात आले आहे. याच ड्रोन शो ची तयारी पुण्यातील स प महाविद्यालयात सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बानगे गावात दुर्मिळ प्रकार
सुरेश सुतार यांच्या म्हशीला जन्मलं दोन तोंडांचं रेडकू
वैद्यकीय दृष्ट्या दुर्मिळ घटनेची पंचक्रोशीत चर्चा
फक्त चार तासांतच रेडकाचा मृत्यू – गावकऱ्यांमध्ये हळहळ
उद्यापासून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला होणार सुरुवात
विधानसभेत रमी खेळल्याच्या आरोपावरून रोहित पवारांना कोकाटे यांनी बजावली होती नोटीस
आठ दिवसात माफी मागण्याचा रोहित पवारांना दिला होता नोटीसीद्वारे ईशारा, पवारांनी नोटीसीची उडवली होती खिल्ली
मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार भोगाव साबळे,ताडबोरगाव,मांडाखळी,पूर्णा तालुक्यातील लिमला पिंगळी सिंगणापूर,लोहगाव आदि गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झालं आहे देवलगाव आवचार गावांमध्ये तर सर्वत्र १ फुटापर्यंत पाणी साचले होते तसेच देवलगाव अवचार येथील 33 केव्ही परिसरातही पाणीच पाणी झाले होते काही देवलगाव अवचार भोगाव साबळे रस्त्यावरिल ओढ्याला पाणी आल्याने काही गावकरी गावातील रस्त्यावर अडकले होते मात्र पाणी उतरल्यानंतर हे गावकरी पुन्हा गावात परतले आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये अति मुसळधार ते जोरदार पाऊस पाहायला मिळाला यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीडमध्ये दाखल झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळाबाबत अजित पवार हे माहिती घेणार आहेत त्याचबरोबर तात्काळ पंचनामे करण्यासाठी सूचना देणार असल्याचे देखील माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांसोबत संवाद साधत घेतला नुकसानीचा आढावा
एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, सरनाईक यांचं आश्वासन
शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा जिल्हा प्रशासनाला आदेश
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्या अंबाबाई मंदिरातील देवीचा गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. गर्भगृहाची स्वच्छता करण्यात येत असल्याने उद्या भाविकांना घ्यावे लागणार. उत्सव मूर्तीचे दर्शन सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू असेन. मात्र देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार.
गणपती बाप्पा मोरया... पुढल्या वर्षी लवकर या असे आपल्या लाडक्या बाप्पाकडून वचन घेत कोकणात आज 21 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यातआले. रत्नागिरीतील ठिकठकाणी गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.अगदी पारंपारीक पद्धतीने बाप्पाची मिरवणुक काढण्यात आली...ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला.... कोकणात अगदी दिड दिवसांपासून ते 21 दिवसांचे गणपती कोकणात आणले जातात... अनेक वर्षापासूनची परंपरा कोकणात आजही टिकून आहे.एकवीस दिवस आपल्या भक्तांकडून मनोभावे सेवा करुन घेतल्या नंतर आजपाहुण्या आलेल्या बाप्पाला भक्तांनी जड अंतकरणाने निरोप दिला.आज ख-याअर्थाने कोकणातील गणेशोत्सवाची सांगता झाली.
विशेष मोका कोर्टाने सुनावली कृष्णा आंदेकर याला 18 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
परभणी जिल्ह्यात मागच्या ४-५ दिवसात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पूर आला ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले होते शिंदेच्या शिवसेनेकडून याच पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला.परभणी तालुक्यातील विविध अतिवृष्टी बाधित गावात जाऊन जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी नुकसानीची पाहणी करून ही मदत केले तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी ही प्रशासनाकडे केली आहे.
'ओबीसींचा बॅकलॉग भरा'.
'सरकारने काढलेला जीआर वादग्रस्त'.
'याचिकांवर लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे'. - मंत्री छगन भुजबळ
लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे , वरून मुसळधार पाऊस कोसळतोय, तरी मोठ्या संख्येने समाजातील महिला आणि पुरुष या ठिया आंदोलनावरती ठाम आहेत. मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी आदिवासी समाजाला देखील एसटी मधून जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडीटी साठी सुलभता द्यावी अशी या आंदोलकांची मागणी आहे.
माजी आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता
तुळजापूर मध्ये हजारो च्या संख्येने बंजारा समाज एकवटला
तुळजापूर मध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक येण्यापूर्वी बंजारा समाज एकवटला
हैदराबाद गॅझेट मध्ये एसटी प्रवर्गात आरक्षणाच्या मागणीला घेऊन बंजारा समाज आज तुळजापूर शहरात काढणार होता मोर्चा
पण पोलिसांनी बंजारा समाजाच्या फक्त निवेदन देण्याला दिली परवानगी मोर्चाला परवानगी नाकारली
बंजारा समाज मोर्चा काढण्यावर ठाम शासकीय विश्रामगृह परिसरात हजारो बंजारा समाजाचे कार्यकर्ते एकवटले
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या येण्याअगोदरच तुळजापूर शहरात गोंधळाची परिस्थिती
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायमूर्तींनी राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. “३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्या,” असे आदेश न्यायालयाने दिले.
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आयोजनासंदर्भातील याचिकांवर सुनावणीला सुरुवात झाली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचा अंतरिम आदेश दिला होता. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित खटल्यांमुळे २०२२ पासून या निवडणुका रखडल्या होत्या. आता त्यावर सविस्तर सुनावणी सुरू झाली आहे.
मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉक येथे पुन्हा एकदा आंदोलनाची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद आता तीव्र झाला असून त्यामुळे ससून डॉकचे कामकाज ठप्प झाले आहे. स्थानिक कोळी बांधवांनी सरकारकडे ठाम मागणी केली आहे की, तत्कालीन केंद्रीय जहाजवाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री एकनाथराव खडसे यांनी घेतलेला निर्णय तातडीने अंमलात आणावा.
कोळी कम्युनिटीचे म्हणणे आहे की एमबीपीटीकडून सुरू असलेला त्रास त्वरित थांबवला नाही, तर त्यांना अनिश्चितकालीन संपावर जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. "मुंबई आमच्या कोळ्यांची आहे, कोणाच्या बापाची नाही," असे ठाम विधान करून कोळी बांधवांनी सरकारला इशारा दिला आहे. या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर शहरातील मत्स्यव्यवसाय आणि मासळी पुरवठा यावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कपाशीमध्ये साचलेल्या पाण्यात पोहतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
अंबड तालुक्यातील भांबेरी या गावातील शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळात आज सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी
जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून याचा प्रचंड तडाखा शेतकऱ्यांना बसलेला आहे
खरीप हंगामातील कपाशी पिकासह मोठ्या प्रमाणात फळबागा देखील पाण्याखाली दिल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं
- संशयित आरोपी उद्धव निमसे भाजपचे माजी नगरसेवक
- नाशिक पोलिसांनी उद्धव निमसेंना नाशिक न्यायालयात केलं आज हजर
- राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणात उद्धव निमसे होते फरार
- निमसे यांच्यासह बारा ते तेरा जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात दाखल आहे खुनाचा गुन्हा
- २२ ऑगस्टला धोत्रेवर करण्यात आला होता प्राणघातक हल्ला, तर २९ ऑगस्टला उपचारादरम्यान झाला होता मृत्यू
- तब्बल वीस दिवस भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे होते फरार
- मोबाईल न बाळगता चार ते पाच राज्यात निमसे यांनी ट्रॅव्हल बसने केला प्रवास
- पोलिसांना थांगपत्ता लागू नये, यासाठी निमसे यांनी हॉटेलमध्ये मुक्काम करणेही टाळलं होतं
- काल निमसे पोलिसांना शरण आल्यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नाशिक पोलिसांनी केली होती अटकेची कारवाई
काल बीड जिल्ह्यामध्ये झाला होता धुवाधार पाऊस शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त भागांची मनोज जरांगे पाहणी करणार आहेत. आष्टी कडा व शिरूर भागामध्ये ढगफुटीजन्य परिस्थिती पाऊस झाला होता यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या भागाची पाहणी स्वतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करणार आहेत अंतरवाली सराटी मधून मनोज जरांगे पाटील हे बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…
राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील सोयाबीन, कापूस आणि कांद्याची पिके पाण्याखाली…
रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा शेतातील पाणी साचल्याचा व्हिडिओ व्हायरल...
सरकारकडे रयत क्रांती संघटनेकडून शेतकऱ्यांना 100 टक्के नुकसान भरपाई आणि पिक विमा निकषात बदल करण्याची मागणी…
गुंड बंडू आंदेकरच साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी प्रशासन आक्रमक झालंय ..
आंदेकरचा प्रमुख आर्थिक स्त्रोत असलेल्या नागझरी नाल्यावर भरणार्या बेकायदा मासळी बाजारावर पोलिसांनी महापालिकेला लिहीलेल्या पत्रानंतर कारवाई करण्यात आलीय ..
व्यापाऱ्यांनी मात्र कुठलीही पुर्वसुचना न देता कारवाई केली असल्याचा आरोप केलाय ..
या कारवाईच्या वेळी नागझरी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होत
हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात आले आहे हतनूर धरणाचे ४१ पैकी १० गेट उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून,नाशिकच्या उमराणे येथील रामेश्वर कृषी या खाजगी बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त होत त्यांनी देवळा-मालेगाव रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले,कांद्याचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत असून भाव घसरल्याने शेतकऱ्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे,रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती,दरम्यान घटनास्थळी पोलीस पोहचत त्यांनी आंदोलन कर्त्यांची समजूत काढली
प्रत्येक निवडणुकीत प्रामुख्याने गाजलेल्या शहादा तालुक्यातील रहाटयावड धरणाचा प्रश्न गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असून सद्यस्थितीत गेल्या आठ वर्षांपासून धरणाचे काम रखडले आहे या धरणामुळे जवळपासच्या 15 गावांना पाणीटंचाईचा समस्येपासून मुक्तता होणार आहे मात्र एकदा मागणी करूनही धरणाचे काम होत नसल्याने शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे..
औंढा नांदेड व औंढा जिंतूर दोन्ही कडे जाणारा मार्ग रोखला
हजारो आंदोलक रस्त्यावर
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन
बंजारा तरुणाची उपोषणादरम्यान प्रकृती खालावली असताना सरकार दखल घेत नसल्याने आंदोलक संतप्त
जालन्यात एक वृद्ध महिला पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे जालन्यातील बदलापूर तालुक्यातील देवपिंपळगाव गावातली घटना घडली आहे.शरदबाई काशिनाथ श्रीसुंदर असे नाव आहे. देवपिंपळगाव गावात समाज मंदिरामध्ये ही वयोवृद्ध महिला राहत होती. रात्री मुसळधार पाऊस पडला आणि समाज मंदिरा शेजारी असलेल्या ओढ्याला पूर आला. याच पुरामध्ये ही वयोवृद्ध महिला वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे...
पहाटे 2 ते 5 वाजे दरम्यान सर्वाधिक पाऊस...
जालना शहरामध्ये मध्यरात्री झालेल्या धुवाधार पावसाची नोंद झाली असून अवघ्या तीन तासात तब्बल 116 मिलिमीटर एवढी पावसाची नोंद करण्यात आलीय,
धुंवाधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून , रस्त्यावर घरा मध्ये तसेच मुख्य मार्केट मध्ये, पाणीच पाणी पाहायल मिळतेय...
अहिल्यानगरच्या करंजी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ नुकसान झाल आहे. या पूरग्रस्त परिस्थितीची खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली आहे. करंजी परिसरात घर, शेती, पशुधन, वाहने याचं प्रचंड नुकसान झालं आहे. पूर्वसारल्यानंतर नंतर घरामध्ये अक्षरशः चिखल झाला असून घरातील सर्व संसार उपयोगी सामान अस्तव्यस्त झाल आहे. तर प्रशासनाला मी पंचनामाचे आदेश देऊन तात्काळ मदत करण्याचे सांगितल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटल आहे. या संदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिला असून पाठपुरा करणार असल्याचं खासदार लंके यांनी म्हटलं आहे. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील उपस्थित होते. लवकरात लवकर शासनाला मदत करावी लागणार असल्याचं तनपुरे यांनी म्हटलं आहे.
- सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. काँग्रेस कडून त्या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत.
- स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या सक्रिय आमदार म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस पक्षासह त्यांचा महिला चळवळीतही सक्रिय सहभाग होता.
सोलापूर शहर दक्षिण मधून काँग्रेसकडून 1872 ते 1976 या काळात त्या विधानसभेवर तर त्यानंतर त्या विधान परिषदेवर आमदार राहिल्या. आज त्यांच्यावर सोलापूर मधील हिंदू स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
उद्याची बैठक जी अंतर्गत बैठक आहे पुढच्या आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव यासह डीजी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावणार आहोत अनेक आमदारांच्या तक्रारी आहे विशिष्ट जिल्ह्यामध्ये नवीन आयएस आयपीएस अधिकारी लोकप्रतिनिधीला पाहिजे तसा सन्मान देत नाही या सगळ्या संदर्भातला आढाव याची बैठक पुढच्या आठवड्यात घेणार आहे गरज पडल्यास जिल्हे स्तरावर सुद्धा बैठका घेऊ - नरेंद्र भोंडेकर, शिवसेना आमदार, समिती प्रमुख.
जालना शहरातील बस स्थानक परिसरात दोन गटात हाणामारी. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर पाहणी करत असताना दोन गटात हाणामारी झाली. पावसाच्या पाण्यात लाकडी साहित्य वाहून गेल्यामुळे, आणि जुन्या वादामुळे एकमेकांवर आरोप करत दोन गटांमध्ये मारामारी झाली. वाद मिटवण्याच्या प्रयत्नामध्ये अर्जुन खोतकर यांनी एकाला चापट मारली.
जमवायला पांगवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली, एकाला हटवण्यासाठी चापट मारावी लागली, असे अर्जुन खोतकर यांनी सांगितले
बीडच्या शृंगारवाडी येथील सभेत लक्ष्मण हाके यांनी मराठा मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते आमचे ११ सुशिक्षित क्वालिफाईड मुलं आहेत तुमच्या अकरा मुलींचा विवाह आमच्या मुलांसोबत लावा असे वक्तव्य केल्यानंतर बीडच्या तलवाडा मध्ये लक्ष्मण हाके यांच्या पोस्टरला जोडे मारवा आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे त्याचबरोबर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे लक्ष्मण हाके यांनी आपले विधान मागे घेऊन माफी मागवी अशी महिला भगिनींनी मागणी केली आहे.
कोल्हापूर महानगर पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत शेवटच्या दिवशी तब्बल 34 हरकती आल्याने हारकती सूचनाची संख्या ५५ झाली. त्यात बहुताश प्रभागाच्या हद्दीवरील फुटलेल्या कॉलनी, गल्लीन बाबत आहेत. पूर्वीच्या एक सदस्यीय प्रभाग रचनेतील प्रभाग फोडले जाऊ नयेत. चार सदस्यीयऐवजी एक सदस्यीय प्रभाग रचना ठेवावी, भागाची नावे बदलावीत, अशाही महत्वाच्या हरकती आहेत. या सर्व हरकतींवर जिल्हाधिका-यांकडून नेमण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याकडून आता २२ सप्टेंबापर्यंत एक दिवशी सुनावणी होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सप्टेंबरला चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी प्रारूप रचना जाहीर केली. हरकती, सूचना नोंदवण्यास सांगितले होते. 15 सप्टेंबर अंतिम तारीख होती. 14 पर्यंत केवळ 21 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या दिवशी फार हरकती येतील अशी अपेक्षा नव्हती, पण काल 34 हरकती आल्या. त्यात बहुतांश माजी नगरसेवकांच्याच हरकती असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांनी नोंदवलेल्या जास्तीतजास्त हरकती या चार सदस्यीय प्रभागाच्या हद्दीबाबत आहेत. त्याही निश्चित करताना काही कॉलनी, गल्ली दुसऱ्या प्रभागात जोडल्या आहेत. त्यापूर्वीच्या प्रभागाच्या हद्दीत ठेवाव्यात तसेच एक सदस्य प्रभाग रचना असताना ज्या प्रभागाच्या हद्दी होत्या त्याप्रमाणे या चार सदस्य प्रभाग रचनेत ठेवाव्यात अशी मागणी करत पूर्वीचे प्रभाग जैसे थे ठेवावेत असे मांडण्यात आले आहे.
नालासोपाऱ्यात अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ५० लाख रुपये किंमतीचा मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ जप्त केला आहे. हबाज हमिद शेख (२२), योगेश राजू राठोड (२२) व जाफर आसिफ शेख (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क मैदानाजवळ ३ व्यक्ती अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखा २ च्या पथकाला मिळाली होती.
त्यानुसार सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यांच्या कडे २५० ग्रॅम मेफेड्रॉन नावाचा अमलीपदार्थ मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आले आहे.
मराठवाड्यात मागील काही दिवसापासून पाऊसाचा जोर कायम असल्यामुळे व वरच्या धरणातून म्हणजे जायकवाडी आणि माजलगाव धरणातून मोठा विसर्ग सोडला असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदी तुडूंब भरून वाहत आहे अनेक वर्षानंतर एवढ आणि पहिला मिळत असून नदी काठावर 11 मंदिर हे पाण्याखाली गेले आहेत तर नदीकाठावर असलेले 200 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नदीकाठोवर असलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर गोदावरी नदी काठावर असलेल्या दशविधीक्रिया करण्यासाठी बांधण्यात आलेल्या हॉल ही पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अडचणी होणारच आहे तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात सूचना झाले आहे याचाच आढावा घेतला आहे
बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाने हाहाकार माजवला असून सर्वच मस्त मंडळांमध्ये आता अतिवृष्टी झाली आहे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं असून बीडच्या आष्टी पाटोदा शिरूर कासार या भागामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसाच्या पाण्याची आवक सिंदफना नदी पात्रात होत आहे सिंध पण नदीपात्राला पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतकऱ्यांचे या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांकडून आता नुकसान भरपाईची मागणी होत आहे
- एकीकडे कॉंग्रेसकडून वडेट्टीवार सुद्धा आंदोलनाचा तयारीत असताना, आता समता परिषदे मेळावा घेता विदर्भात तयारी करत असल्याचं बोलल जात आहे..
- ओबीसी नेते छगन भुजबळ करणार मार्गदर्शन, ओबीसी बहुजनांना आवाहन
- महात्मा फुले समता परिषद, विविध ओबीसी संघटना आणि बहुजन यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलेला आहे.
- महात्मा फुले सभागृह, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मार्ग, रेशीमबाग नागपूर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
- या मेळाव्यात ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहे. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी होणार बैठक...
- या मेळाव्यासाठी ओबीसी बहुजनांनी मोठ्या संखेने नागपूरला उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, विशाल हजारे यांनी केले...
माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या वाढदिवसाच्या बॅनर वरून शिवसेनेच्या उपनेत्या प्रिती बंड यांचा फोटो गायब...
काही महिन्यापूर्वीच प्रीती बंड यांनी केला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..
तर ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी देखील केला होता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश..
प्रीती बंड यांचा फोटो गायब असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण..
मावळ तालुक्यातील खरीप हंगामातील महत्वाचे पीक म्हणून भातपिकांची ओळख आहे. सध्या मावळ तालुक्यात भातपिकावर मोठ्याप्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पवनमावळ भागात भात पिकावर करपा रोगाचे प्रमाण जास्त आहे. करपा रोगावर उपाययोजना करण्यासाठी मावळ कृषि विभागाने गावोगावी मोहीम राबवली आहे. धामणे येथे कृषि अधिकारी विकास गोसावी व अश्विनी खंडागळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपा करपा रोगाची पाहणी केली. करपा रोगावर करावयाच्या औषध फवारणी बाबत कृषि विभागामार्फत गावोगावी जाऊन आणि व्हाट्स अँप, वार्ताफलक, बैठक घेऊन कृषि अधिकारी करपा रोगाबाबत उपाययोजना बाबत प्रचार प्रसिद्धी करत आहेत
विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव, नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
- सरकारी पातळीवर शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनास्था असल्याचे चित्र
- एप्रिल महिन्यात सर्वाधिक 50 शेतकरी आत्महत्या, तर गेल्या ऑगस्ट महिन्यात 28 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
- गेल्या आठ महिन्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपोटी 1 कोटी 58 लाख रुपयांचा मदतनिधी वितरित
लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात मागच्या दोन दिवसापासून पाऊस होतो आहे. जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय, तर औसा तालुक्यातील बोरगाव नकुलेश्वर येथे ओढ्याला पाणी आल्याने लातूरच्या औसा येथून धाराशिवच्या तेर कडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. तर पुढील काही तास लातूर जिल्ह्याला हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा देखील दिलाय
बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परळी तालुक्यातील वानटाकळी गावात तर एका शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत त्याच्या जनावरांसाठी साठवलेली कडब्याची गंजी पुराच्या पाण्यात वाहून गेली. ही घटना वानटाकळी गावात घडली.
शेतीत पिकलेल्या कडब्याची मोठी गंजी शेतकऱ्याने मेहनतीने गोळा करून ठेवली होती. पण अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्याने ही गंजी पूर्णपणे वेढली आणि काही क्षणात ती पाण्यासोबत वाहून गेली. शेतकरी हतबल होऊन आपलं नुकसान डोळ्यासमोर होताना पाहत राहिला. या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसानंतर आज सकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली. या धुक्याचा परिणाम खरिपातील सोयाबीन,भाजीपाला या पिकांवर होण्याची शक्यता आहे. धुक्यांमुळे पालेभाज्यांनाही याचा फटका बसणार असून, शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता धुक्याचे नवे संकट उभे राहिले आहे.
पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासात जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटीजन्य पाऊस झाला असून जिल्ह्यातील सर्व तलाव हे धोक्याच्या पातळीच्या बाहेर गेले असून सर्वच नद्यांना महापूर आला आहे सर्व रस्ते व राष्ट्रीय महामार्ग बंद झाले असून सर्वच गावांचा सध्यातरी संपर्क तुटला आहे या पार्श्वभूमी वरती आता जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाडी त्याचबरोबर इंग्लिश स्कूल यांना आज सुट्टी देण्यात आली आहे हा निर्णय बीडच्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतला असून सर्व शाळांना आज सुट्टी असणार आहेत बरोबर नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनासोबत संपर्क साधावा असेही आव्हान त्यांनी केले आहे.
:राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे 16 व 17 सप्टेंबर या दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.आज तुळजापूरात शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विविध स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करुन ते आढावा घेणार आहेत. तर सायंकाळी 6 ते 9 या वेळेत शिवसेना पदाधिकारी यांची बैठक घेणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री उपस्थिती लावणार आहेत या विविध कार्यक्रम सरनाईक यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.
शिरूर तालुक्यात गेल्या रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कांदा लागवडीवर या पावसाचा विशेषतः मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरले असून खर्चिक लागवड कोसळण्याची वेळ आली आहे. शेतकरी वर्गात चिंता व हतबलता निर्माण झाली आहे.
शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाला मागणी केली आहे की, जिथे जिथे पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व भागांचा तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी.
अमरावती जिल्हा सह विदर्भाच आराग्य दैवत श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी या अमरावती शहराच्या ग्रामदैवत असून दोन्ही मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. श्री एकविरा देवी मंदिर संस्थांच्यावतीनं मंदिरातील देवीचे सर्व चांदीचे आभूषण आणि वस्तूंची खास सफाई केली जात आहे. शहरातील सुवर्णकार बांधवांच्या हातून सुरू असणाऱ्या या सफाईमुळं देवीच्या चांदीच्या आभूषणांना नवी झळझळाळी येत आहे. श्री एकविरा देवी मंदिरात देवीच्या आभूषणांसह सर्व चांदीच्या वस्तूंची स्वच्छता शहरातील सुवर्कार सेवा म्हणून करून देतात. साठ वर्षांपासून सुवर्णकार बांधव नवरात्रीच्या पर्वावर श्री एकविरा देवी मंदिरातील चांदीचे दागिन स्वच्छ करून देतात.
जालना शहरात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय. जालना शहरात काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. जालना शहरालगत असलेल्या चौधरी नगर परिसरातील जालना - मंठा महामार्गाला अक्षरशा तलावाचं स्वरूप आलं असून जालना मंठा महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद झालेली आहे. जालना शहरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल आहे तर अनेक चार चाकी वाहन देखील वाहून गेल्याची माहिती आहे.
लातूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरण आणि पाणी प्रकल्प 100% भरले आहेत , लातूर ग्रामीण साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा तावरजा प्रकल्प देखील 100% क्षमतेने तुडुंब भरला आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे जवळपास 400 एकर क्षेत्रावरील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.. माजी आमदार धीरज देशमुख यांनी साधारण 47 कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाचे नूतनीकरण केले आहे.दरम्यान प्रकल्प पहिल्यांदाच लवकर भरल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत, जलपूजन केले आहे. यावेळी माजी आमदार धीरज देशमुख हे देखील उपस्थित होते.
जालना शहरात काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. या पावसामुळे शहरातील मंठा चौफुली परिसरातील रस्त्यांना अक्षरशः नदीचा स्वरूप आल आहे. मंठा चौफुली परिसरातील रस्त्यावरून गुडघाभर पाणी वाहत आहे.
तुळजापुरातुन तुळजाभवानी मातेची महाआरती करुन मराठवाडा स्वाभिमान जागर याञेचा शुभारंभ करण्यात आलाय,जातीत जातीत भांडत बसण्यापेक्षा प्रत्येक तरुणाच्या हाताला काम,शेतकऱ्यांना पाणी,तरुणांना गावात काम मिळेल त्यांना गाव सोडण्याची वेळ येवु नये यासाठी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मराठवाडा स्वाभिमान जागर याञेचे प्रमुख नामदेवराव पाटील यांच्या वतीने ही याञा काढण्यात आली आहे.लातुर बीड जिल्ह्यातुन ही याञा धाराशिव जिल्ह्यात आली होती.मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने एकरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी,कृषी कर्ज माफ करावे,दल महीन्याला मराठवाड्यात मंञी मंडळाची बैठक घ्यावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.या याञेला कॉग्रेसचे वतीने पाठिंबा देण्यात आला.
जालना शहरात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका सीना नदीला पूर आला आहे. या पुरामध्ये एक चार चाकी वाहन वाहून जाताना पुलाच्या कठड्याला अडकल आहे. तर बस स्टॅन्ड परिसरातून चारचाकी वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे..
धाराशिव जिल्ह्यात मागील दोन दिवसात पावसाने जोरदार तडाखा दिला सात महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.पावसामुळे शेती शिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे काढणीस आलेले सोयाबीन व अन्य पिके देखील पाण्याखाली गेल्याने हजारो हेक्टर पिकांना तडाका बसला आहे. हातातून आलेला घास,पावसाने हिरावल्याने बळीराजा देखील हतबल झाला आहे.या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यात 51 घराची पडझड देखील झाली आहे.जिल्ह्यात सलग तीन दिवस विविध भागात जोरदार पाऊस कोसळला यामध्ये मुरूम उमरगा तालुक्यातील 22 घरांची पडझड झाली आहे तर धाराशिव तालुक्यातील 28 घरांच्या भिंती कोसळल्या आहेत.कळंब तालुक्यातील देखील एका घराची पडझड झाली आहे.नुकसानीची सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यातून आता केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.