Maharashtra News Live Update: सातारा जिल्हा परिषदेतील 'त्या' नाट्याचा वचपा काढण्याची हीच वेळ; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यात मान्सूनची प्रगती अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा, महागाईचा भडका, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam TV Marathi

हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून

हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थापनाचा गलथान कारभार पुढे आला आहे, लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यात दाखल झालेल्या शव वाहतूक करणाऱ्या नव्या कोऱ्या रुग्णवाहिका वापराविना धूळ खात पडून आहेत, जिल्ह्यातील अनेक मृतदेह घेऊन न जाताच या रुग्णवाहिका एकाच जागेवर अडगळीत ठेवण्यात आल्या आहेत हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात उभ्या केलेल्या या शववाहीकाचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे दरम्यान या प्रकारानंतर आता जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने धुळखात पडलेल्या या शव रुग्णवाहिका वापरण्यासाठी सुसज्ज करण्याची तयारी सुरू केली आहे.

कळंबोलीत विजेच्या लपंडावाने नागरिक संतप्त; महावितरण कार्यालयावर रात्रभर ठिय्या आंदोलन

उलवे आणि कामोठेनंतर आता कळंबोली परिसरातही वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाविरोधात स्थानिक रहिवाशांनी कळंबोली येथील महावितरण कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले.

Maharashtra News Live Update: सातारा जिल्हा परिषदेतील 'त्या' नाट्याचा वचपा काढण्याची हीच वेळ; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आज सातारा दौऱ्यावर आले असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सातारा जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांत जे राजकीय नाट्य घडले, त्याविरोधातील राग मतदानातून व्यक्त करण्याची हीच पहिली आणि शेवटची संधी आहे, असे सांगत कार्यकर्त्यांनी आपला रोष मतपेटीतून दाखवून द्यावा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले आहे.

पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांना मिळणार दिलासा

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील ४४ गावांमध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील ईसापूर धरणातून आरक्षित पिण्याच्या पाण्यापैकी तीन दशलक्ष घनमीटर पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.गटविकास अधिकारी,पंचायत समिती उमरखेड यांनी पैनगंगा नदीकाठावरील गावांमध्ये भूजल पातळी घटल्याने गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. ग्रामस्थ व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरक्षित पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com