Saif Ali Khan: .. जे घडलं ते दुर्दैवी, पण मुंबई असुरक्षित म्हणणं अयोग्य; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

Chief Minister Devendra Fadnavis: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. एका घटनेच्या आधारे मुंबईला असुरक्षित म्हणणे चुकीचे असल्याचं फडणवीस म्हणालेत.
Chief Minister Devendra Fadnavis
Chief Minister Devendra Fadnavis ANI
Published On

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर आला आहे. हल्लेखोराचा फोटो माध्यमांमधून व्हायरल झालाय. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यावरून सरकारवर टीका केली जात आहे. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना उत्तर दिले आहे. जे घडले ते दुर्दैवी आहे, परंतु मुंबई असुरक्षित आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असं मुख्यमंत्री फडणीवस म्हणालेत.

“पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबाबत सर्व माहिती दिलीय. हा कसला हल्ला आहे, यामागे नेमकं काय आहे आणि हल्ल्यामागचा हेतू काय होता हे सगळं तुमच्यासमोर मांडलंय, असं फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.मुंबईत सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोराने अभिनेत्यावर चाकू हल्ला केला. सैफ अली खानने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोराने त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला.

चोराने त्याच्यावर पाच ते सहा वेळा हल्ला केला. एक मोठा सेलिब्रिटींवर हल्ला होण्याच्या घटनांवरून विरोधकांनी सरकारवर टीका केलीय. मुंबई शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर चौफेर हल्ला चढवला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिलंय.

महाराष्ट्रातील महायुतीच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करताना शिवसेना (यूबीटी) नेत्या प्रियांका चतुर्वेदी चतुर्वेदी म्हणाल्या, “सेलिब्रेटी सुरक्षित नसतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? जीवावर बेतणारा आणखी एक हायप्रोफाईल प्रयत्न मुंबई पाहतोय ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. मोठ्या लोकांना टार्गेट करत मुंबईला कमकुवत करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न केला जात आहे,” अशी टीका शिवसेनेचे राज्यसभा खासदार (UBT) यांनी X वर केलीय.

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षापासून कायदा सुव्यवस्था वाऱ्यावरती आहे. सभा संमेलन उत्सव प्रधानमंत्री यांचं स्वागत शिबिर याच्यात गुंतून पडलं आहे. त्याच्यामुळे बीडपासून मुंबईपर्यंत द्यापर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था उरलेली नाहीये. सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला. पंतप्रधान मुंबईत आहेत त्याच्यामुळे संपूर्ण सुरक्षा ही त्यांच्याकडे आहे. पंतप्रधान जरी मुंबईत असले तरी या राज्यांमध्ये काय चालले आहे राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवं.

महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे. रस्त्यावर घरात झोपड्यांमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसत आहेत. जे मोठे कलाकार आहेत, त्यांना घराबाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. तिथे सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. नरेंद्र मोदी यांना हा खरं म्हणजे धक्का आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलीय. विरोधकांच्या या टीकेवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com