Maharashtra Farmer Loan Waiver: मोठी बातमी! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी; कृषिमंत्र्यांची घोषणा

Farmer Loan Waiver: महाराष्ट्र सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असेलली शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी सरकार पूर्ण करणार आहे. सरकार जून महिना संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा करणार असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिलीय.
Maharashtra Farmer Loan Waiver
Maharashtra Agriculture Minister Dattatray Bharane announcing blanket farm loan waiver for farmers before June 30.saam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

  • ३० जूनपूर्वी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय

  • कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली अधिकृत घोषणा

राज्य सरकारने शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय. सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी पूर्ण करणार आहे. सरकार ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे. ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल,अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर जून महिना संपण्याच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल," असे कृषिमंत्री भरणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com