
विधानसभेनंतर राजकीय पक्षांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केलीय. ठाकरे गटाने मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिलेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरू केलाय. तर भाजप, राष्ट्रवादीकडून पक्षांची मोर्चेबांधणी करत निवडणुकांबाबत रणनिती आखत आहेत. मात्र दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुकांची घोषणा केली जात नाहीये. ओबीसी आरक्षण प्रश्नावरून सुप्रीम कोर्टात सुनावणीत होतेय. आज ओबीसी आरक्षणाबाबत आज अंतिम सुनावणी होईल असं वाटत होतं. परंतु सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पुढील तारीख दिलीय. सुनावणीसाठी पुन्हा तारीख दिल्याने राज्यातील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबतीच सुप्रीम कोर्टातील सुनावणी ही आता २५ फेब्रुवारीला होणार आहे. याकारणामुळे महापालिका निवडणुका आणखी एक महिना पुढे निवडणुका ढकलण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या आजच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्यावतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. राज्यात विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात झाल्या. या निवडणुकांनंतर महापालिकेच्या निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केलीय. परंतु कोर्टाने निवडणुकांना स्थगिती दिलेली नाही. मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने सरकारने सर्वेाच्च न्यायालयाकडे निर्णय देण्याची विनंती केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.