Jayant Patil: सरकार गोंधळलेले, सर्वांना एकत्रित कसं ठेवायचे हा सरकारसमोर प्रश्न; जयंत पाटील

सरकार गोंधळलेले, सर्वांना एकत्रित कसं ठेवायचे हा सरकारसमोर प्रश्न; जयंत पाटील
Jayant Patil
Jayant PatilSaam tv

लातूर : जनतेचा आता फारसा प्रतिसाद मिळत नाही. हे राज्‍य सरकारला दिसत आहे. त्यामुळेच त्यांना आता भीती असल्याने सरकार सध्या गोंधळलेले आहे. सर्वांना एकत्रित (Latur News) कसं ठेवायचं हाच मोठा प्रश्न सरकारसमोर आहे; अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. (Maharashtra News)

Jayant Patil
Bribe Trap: चेकपोस्‍टवर ट्रक चालकांकडून घेतले पैसे; मोटार वाहन निरीक्षक एसीबीच्‍या जाळ्यात

औसा इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्‍यानिमित्ताने जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्‍यानंतर माध्‍यमांशी बोलताना प्रतिक्रीया दिली.

म्‍हणून सरकारला निवडणुका टाळायच्या

गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मंत्रिमंडळाचा विस्तार या दोन्ही गोष्टी सरकारला टाळायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपण निवडून येवू शकत नाही. यामुळे निवडणुका सरकारला टाळायच्या आहेत. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार केला; तर ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, ते सोडून जाणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com