संघर्ष गांगुर्डे
कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि मनसे हे सत्तेच्या समीकरणात एकाच बाजूला असले, तरी स्थानिक पातळीवरील राजकीय संबंधांमध्ये तणाव कायम असल्याचे चित्र आहे. त्यातच शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या वाढत्या जवळिकीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
जानेवारी २०२६ मध्ये मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर केडीएमसीतील सत्तासमीकरणात भाजप, शिंदेसेना आणि मनसे हे एकाच बाजूला आले. मात्र, स्थानिक पातळीवर भाजप विरुद्ध शिंदेसेना-मनसे असा संघर्ष आणि शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते राजू पाटील हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना रवींद्र चव्हाण यांनी निंदकाचे घर असावे शेजारी असे विधान केले. या विधानाचा संदर्भ राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या पद्धतीने लावला जात असून, चव्हाण यांनी नाव न घेता राजू पाटील आणि मनसेला लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.