२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

Child Trafficking : कल्याणमधून दोन लहान भावांचं भीक मागण्यासाठी किंवा चोरीच्या कामात वापर करण्यासाठी अपहरण करून पोबारा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
Child Trafficking News
Child Trafficking NewsSaamTv
Published On

Child Kidnapping case : अंबरनाथमधील दोन सख्ख्या भावंडांचा अपहरणाचा डाव कल्याण आणि पालघरच्या कासा पोलिसांनी हाणून पाडला. या मुलांचं अपहरण करून त्यांचा वापर भीक मागण्यासाठी आणि चोरीसाठी करण्यात येणार होता. पण त्याआधीच आरोपींचा हा डाव पोलिसांनी उधळून लावला.

चोरी किंवा भीक मागण्यासाठी मुलाचं अपहरण करणाऱ्या टोळीचा डाव पोलिसांनी शिताफीनं हाणून पाडला आहे. कल्याणच्या (Kalyan) महात्मा फुले पोलिसांनी पालघरच्या (Palghar) येथील कासा पोलिसांच्या मदतीने ही कामगिरी पार पडली आहे. गस्तीवर असताना काही महिला आणि पुरुषांचं भांडण सोडवण्यासाठी पोलीस गेले. मात्र तिथे त्यांच्यासोबत असलेली दोन लहान मुलं बघून संशय आल्याने पोलिसांनी या टोळीला तब्यात घेतलं. त्यानंतर चौकशी केली असता ही दोन मुलं चोरी किंवा भीक मागण्याच्या कामासाठी वापर व्हावा म्हणून अपहरण करण्यात आलेली असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणी विनोद गोसावी, आकाश गोसावी, अंजली गोसावी आणि चंदा गोसावी (सर्व रा. मिरज, सांगली) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Child Trafficking News
PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

९ आणि ६ वर्षांची दोन मुलं अचानक गायब!

अंबरनाथ येथे राहणाऱ्या अखिलेश प्रसाद मिश्रा यांची सूरज आणि सत्यम ही अनुक्रमे नऊ आणि सहा वर्षांची दोन मुलं घरातून बेपत्ता झाली. तशी तक्रार अखिलेश यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीनंतर कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विनोद पाटील यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

सीसीटीव्हीमुळं मिळाला पहिला पुरावा

सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) मदतीने तपास केला असता यात ही मुलं कल्याणमधून एका बसमध्ये बसून निघून गेल्याचं निदर्शनास आलं. त्या दिशेने हा तपास सुरू असतानाच पालघरच्या कासा पोलिस ठाण्यातून सुरज आणि सत्यम ही दोन्ही मुलं तिथे असल्याची माहिती मिळाली. या मुलांना वडील अखिलेश यांचा मोबाइल नंबर माहीत असल्याने त्यांच्याशी संपर्क करून कासा पोलिसांनी त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.

Child Trafficking News
Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

महिला आणि पुरुषांचं पैशांसाठी भांडण अन् फुटलं बिंग

पालघर येथील चारोटी नाका परिसरात गरबा सुरु असताना काही महिला आणि पुरूष पैशासाठी भांडत असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे असलेली दोन लहान मुलं बघून पोलिसांना संशय आला. तेव्हा अधिक चौकशी केली असता विनोद गोसावी, आकाश गोसावी, अंजली गोसावी आणि चंदा गोसावी या चौघांच्या टोळीने सूरज आणि सत्यम या दोघांना कल्याण बस डेपोतून बसमध्ये बसविले होते. चोरी किंवा भीक मागण्याच्या कामात या मुलांचा वापर करण्याच्या हेतूने हे अपहरण करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले.

या मुलांचे अपहरण करुन या मुलांकडून चोरी आणि भीक मागण्यास लावणार होते, अशी कबूली या चौघांनी दिली आहे. त्यानंतर मुलांच्या पालकांशी संपर्क साधून या मुलांना वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Child Trafficking News
Nashik Crime : हटकल्याचा राग डोक्यात गेला, तरुणांच्या टोळक्याचा पोलीस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com