जालना : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज (Jalna) जालन्यात कापुस- सोयाबीन पिकाला भाववाढ मिळावी. अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या (farmer) खात्यात तात्काळ जमा करावी. यासह अन्य मागण्यांसाठी जालना– जळगाव (Jalgaon) महामार्गावर चक्का जाम आंदोलनाला सुरवात केली आहे. (Live Marathi News)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी आज भोकरदन तालुक्यातील जालना – जळगाव महामार्गावरील बरंजळा साबळे फाट्यावर कार्यकर्त्यानी रस्तावर उतरले. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि राज्य सरकारच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवता कृषी मंत्री विदेश दौऱ्यावर मोजमज्जा करत असल्याने त्यांचा जाहीर निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनामुळे जालना- जळगाव महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापासूम ठप्प झाली.
विमा कंपनीने रोखलेला पिक-विमा तात्काळ द्यावा, कृषी पंपाला दिवसाला विज द्यावी आणि थकित उसाची एफआरपी तात्काळ जमा करावी; या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील विविध भागात चक्काजाम आंदोलनास सुरवात करण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.