कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांना दरमहा ११०० रूपये; मुदत ठेव प्रमाणपत्र वाटप

कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांना दरमहा ११०० रूपये; मुदत ठेव प्रमाणपत्र वाटप

जळगाव : कोरोना कालावधीत दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या २०, एक पालक गमाविलेल्या ३५९ अनाथ बालकांच्या शैक्षणिक व सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध असून अनाथ मुलांच्या मागे शासन ‘आधारवड’ म्हणून खंबीरपणे उभे आहे. ‘मिशन वात्सल्य अंतर्गत’ अनाथ मुले व विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. (jalgaon-news-gulabrao-patil-1100-per-month-to-children-orphaned-by-Corona)

कोरोनाने अनाथ झालेल्या बालकांना प्रत्येकी ५ लाखाचे मुदतठेव प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमावेळी अजिंठा शासकीय विश्रामगृह ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार संजय सावकारे उपस्थित होते.

३३७ विधवा महिलांना योजनेचा लाभ

कोविड काळामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील ३३७ महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा काळात या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात आहे. सदर ३३७ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा किंवा श्रावणबाळ योजनेचाही लाभ मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने अनाथ मुले व विधवा महिलांसाठी कार्य करण्यास तत्पर राहावे.

मुदत ठेव प्रमाणपत्र वाटप

मंत्री पाटील यांच्या हस्ते कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या २० अनाथ बालकांना प्रत्येकी ५ लाखाचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. या मुलांना दरमहा ११०० रुपये मिळणार असून त्यांना शासकीय नोकरी कामी १ टक्का आरक्षण मिळणार आहे. सज्ञान झाल्यावर सदर मुला मुलींना व्याजासह रक्कम मिळणार असल्याने त्यांना शासनातर्फे मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com