
महाराष्ट्र सरकारने ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत.
प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी ही बदली प्रक्रिया तातडीने करण्यात आली.
बदल्यांमध्ये जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश.
बदली आदेश प्रशासन विभागाद्वारे जारी करण्यात आले आहेत.
राज्यात स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. सरकारकडून गेल्या पाच सहा महिन्यांपासून बदल्यांचं सत्र सुरू आहे.काही दिवसापूर्वीच राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. आता परत राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
1) श्री अजीज शेख, भाप्रसे, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई. येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे. या पदावर.
2) श्री अशीमा मित्तल, भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.येथून जिल्हाधिकारी जालना या पदावर.
3) श्री श्रीकृष्णनाथ पांचाळ, भाप्रसे, जिल्हाधिकारी, जालना. येथून जिल्हाधिकारी, ठाणे या पदावर.
4) श्री विकास खारगे, भाप्रसे, मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई येथून अप्पर मुख्य सचिव महसूल मंत्रालय, मुंबई या पदावर
5) श्री अनिल डिग्गीकर, भाप्रसे, अप्पर मुख्य सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई येथून अपर मुख्य सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय,मुंबई या पदावर
दरम्यान मागील काही दिवसाआधी सरकारने काही अधिकाऱ्यांची पदोन्नती केली होती. तर २० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.