Hingoli News : हिंगोलीत पाणी प्रश्न पेटला; इसापूर धरणात कयाधू नदीचे पाणी सोडण्यास विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

Hingoli News : नदीचे पाणी धरणात गेल्यास हिंगोली जिल्ह्याचा दुष्काळामुळे वाळवंट होईल; असा आरोप यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजी माने यांनी केला आहे. दरम्यान शासनाने जाहीर केलेली ही निविदा तातडीने रद्द करावी
Hingoli News
Hingoli NewsSaam tv
Published On

हिंगोली : हिंगोलीच्या कयाधू नदीवर बांधारा तयार करून ईसापुर धरणात पाणी सोडण्यासाठी शासनाने निविदा प्रसिद्ध केली आहे. यानंतर हिंगोलीत पाणी प्रश्न पेटला आहे. आज हिंगोलीत सिंचन संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. 

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळवल्यास सिंचन संघर्ष समितीचा विरोध आहे. नदीचे पाणी धरणात गेल्यास हिंगोली जिल्ह्याचा दुष्काळामुळे वाळवंट होईल; असा आरोप यावेळी सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजी माने यांनी केला आहे. दरम्यान शासनाने जाहीर केलेली ही निविदा तातडीने रद्द करावी; अन्यथा निवडणुकीत याचा परिणाम भोगावा लागेल असा इशारा देखील यावेळी मोर्चेकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे.  

Hingoli News
Anil Patil News : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा..शेती नुकसानीची तात्काळ मदत; मंत्री अनिल पाटील

जिल्हाधिकारी कार्यलयावर घोषणाबाजी 

संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चात जिल्ह्यातील शेकडो (Farmer) शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोह्चल्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करत निविदा रद्द करण्याची मागणी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com