Hingoli : कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर बँकेकडून होल्ड; संभाजी ब्रिगेडचा बँकेत गोंधळ

Hingoli News : बँक व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने वसमतमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बँक प्रशासनाच्या विरोधात संतप्त
Hingoli News
Hingoli NewsSaam tv
Published On

हिंगोली : शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या निर्णयावर सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे हिंगोली जिल्ह्यात बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करायला सुरुवात केली आहे. हि सक्तीची कर्ज वसुली सुरू करण्यासाठी बँकेने शेतकऱ्यांच्या सेव्हिंग खात्यावर होल्ड लावले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे फोन पे, गुगल पे सारखे यूपीआय व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आता कोणतेही व्यवहार करता येत नाहीत.  

शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँकांकडून पीक कर्ज घेतलेले असते. दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेण्यात येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. याच दरम्यान बँकांकडून कर्ज वसुली साठी तगादा लावण्यास सुरवात केली आहे. इतकेच नाही तर सक्तीची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करण्यात आले आहेत. 

Hingoli News
Rain Alert : पूर्व विदर्भात येलो अलर्ट; नागपुरसह अनेक भागात जोरदार पावसाचा इशारा

संभाजी ब्रिगेडचा बँकेत गोंधळ

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून बँक सक्तीची कर्ज वसुली करत आहे. यासाठी बँक व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याने वसमतमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बँक प्रशासनाच्या विरोधात संतप्त झाले. याबाबत बँक व्यवस्थापनाला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. तर वसमत शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया सह पंजाब नॅशनल बँकेने ज्या शेतकऱ्यांच्या खात्यांना होल्ड लावले आहेत; अशा शेतकऱ्यांना सोबत घेत बँकेत गोंधळ घातला. दरम्यान संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर बँक व्यवस्थापन टाळ्यावर आले असून तातडीने लावण्यात आलेले होल्ड काढण्यात आले. 

Hingoli News
Nashik Crime : नाशिकमध्ये मध्यरात्री तुफान राडा; वर्चस्व वादातून गोळीबार, पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल

शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना पाठविले परत 

दरम्यान कर्ज वसुलीसाठी गावात आलेल्या बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईपर्यंत कर्ज भरणार नसल्याचे सांगत परत पाठवले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा गावामध्ये हा प्रकार घडला आहे. शेतात नापिकी झाल्याने आमच्यावर आत्महत्येची वेळ आल्याचे सांगत शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना गावातून परत पाठवले आहे. दरम्यान सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले असून लवकरच सरकार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करेल; अशी आशा यावेळी शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com