राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड या दोघांमध्येही वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपसोबत जाण्यावरून आव्हाडांनी मुश्रीफांवर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देत मुश्रीफ यांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यांनाच सगळं कळतंय का? असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीकास्त्र सोडताना त्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाहीत. ते एकाकी पडल्यामुळे भ्रमिष्ट अवस्थेत आहेत, अशा शब्दांत मंत्री मुश्रीफ यांनी जिंतेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केलीये.
आमची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांच्यासोबत जावं यासाठी जितेंद्र आव्हाड आणि पुढाकार घेतला होता. यावेळी आमदारांनी सह्या केल्या त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांची सही एक नंबरला होती, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.
आम्ही भाजपसोबत जाणार त्यावेळीच्या चर्चेत जितेंद्र आव्हाड नव्हतेच. माझा भाजपसोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रीपदाची शपथ घेतली असती का? असा सवालही हसन मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला.
आव्हाडांची प्रतिक्रिया
जेव्हा पहिल्यांदा आपण भाजपसोबत जावं अशी चर्चा होती त्यावेळी हसन मुश्रीफ यांनी पहिल्यांदा मला फोन केला होता. काही करून हे रोखलं पाहिजे, असं ते मला म्हणाले. मी आतापर्यंत मुश्रीफ यांच्याशी १० मिनीटेही बोललो नाही, असं आव्हाडांनी म्हटलं. जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांच्यात या आधी देखील आरोप प्रत्यारोप झाले आहेत. गद्दारी ही काही लोकांच्या रक्तातच असते, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी याआधी मुश्रीफांना उद्देशून टीका केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.