ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (Hansraj Ahir) यवतमाळ दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. यवतमाळच्या लोणी गावात माजी मंत्री आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'मोदी सरकारचं धोरण, शेतकऱ्यांचं मरण' असं म्हणत ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना शेकतऱ्यांनी सुनावलं आहे. (latest political news)
आमच्या शेतमालाला भाव का मिळत नाही. कोरोना काळात सर्व उद्योग बंद होते. मात्र, शेती हा व्यवसाय सुरू होता. तुम्ही एकीकडे म्हणता की, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, अन् दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. तुम्ही तुमच्या वरिष्ठांपर्यंत आमच्या मागण्या का पोहोचवत नाही, असे प्रश्न शेतकऱ्यांनी त्यांना विचारले (Farmers Question To Hansraj Ahir) आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हंसराज अहिर यांना शेतकऱ्यांचे सवाल
आम्हाला चालायला रस्ता नाही. सिंचनासाठी लाईट मिळत नाही, अशाने शेतकरी वर्ग कशा जगेल? एक रुपयात आम्ही पीक विमा काढला. मात्र, पुढे पिक विम्याचं काय झालं ते समजलंच नाही. घर चलो अभियानांतर्गत हंसराज अहिर लोणी या गावाच्या दौऱ्यावर होते. त्यादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं (Hansraj Ahir Yavatmal Visit) होतं.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबद्दल केलेल्या वक्तव्यावर टीका केली. त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या जातीबद्दल खोटं सांगितलं आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. ते खुल्या प्रवर्गातील असून ओबीसी प्रवर्गाशी त्यांचा संबंध नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.
राहुल गांधींवर टीका
1994 मधे गुजरात सरकारने मोध घांची जातीला ओबीसीमधे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. मी तीनही पुरावे समोर आणले आहेत, असं म्हणत हंसराज अहीर यांनी राहुल गांधी यांचे आरोप खोडून काढले आहेत. राहुल गांधी यांनी लावलेल्या आरोपात तथ्य नाही. त्यांनी केलेले आरोप बिनआधाराचे असल्याचं त्यांनी म्हटलं (Hansraj Ahir News) होतं.
राहुल गांधी यांचा आरोप खोटा आहे. फक्त प्रसिद्धीसाठी त्यांनी हा आरोप आहे. मोदींच्या काळात ओबीसीला न्याय मिळत आहे. अशा पद्धतीने झालेलं विधान हे विकृत मानसिकतेतून केलेलं विधान आहे, असं मला वाटतं असंही हंसराज अहीर म्हणाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.