PM Kisan 14th Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानच्या १४ व्या हप्त्याबाबत आली महत्त्वाची अपडेट

PM Kisan 14th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi YojanaSaam TV

PM Kisan 14th Installment: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच पीएम किसानचा १४ वा हप्ता जारी करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ फेब्रुवारी रोजी PM किसानचा १३ वा हप्ता जारी केला होता. याचा लाभ देशभरातील जवळपास ८ कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. आता लवकरच १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

PM Kisan Samman Nidhi Yojana
Viral News: ऐकावं ते नवलंच! बायकोनेच गर्लफ्रेंडसोबत लावलं नवऱ्याचं लग्न; आता तिघेही नांदतात सुखाने

पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशभरातील अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली योजना आहे. अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्टा दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. (Breaking Marathi News)

विशेष बाब म्हणजे ही रक्कम प्रत्येकी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिला जातो. सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करते. आतापर्यंत सरकारने PM किसान सन्मान निधीचे १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत. आता सर्व लाभार्थी शेतकरी १४ व्या हप्त्याची प्रतिक्षा करीत आहेत.

पीएम किसानचा १४ वा हप्ता कधी मिळणार?

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला PM किसानचा १४ वा हप्ता मे किंवा जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो. त्यासाठी सरकारनेही पूर्ण तयारी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

PM Kisan Samman Nidhi Yojana
Ulhasnagar Crime News: प्रसाद आणण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरात बोलावलं; नंतर केलं धक्कादायक कृत्य

या शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये?

मीडिया रिपोर्टनुसार, ज्या शेतकऱ्यांना (Farmers) अद्याप १३ व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र येतील, म्हणजेच त्यांच्या खात्यात ४००० रुपये ट्रान्सफर केले जातील. अनेक शेतकरी केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांना १३ व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. मात्र, आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता २००० ऐवजी ४००० रुपये मिळणार आहेत.

पीएम किसान ई-केवायसी करणे अनिवार्य

केंद्र सरकारने पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी eKYC अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप eKYC अपडेट केलेले नाही, त्यांनी PM Kisan https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन eKYC प्रक्रिया पूर्ण करा. जर E KYC पूर्ण केली नसेल तर १४ वा हप्ता खात्यावर येणार नाही. https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळे डिटेल्स पाहू शकता.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com