अमरावतीत तहसीलच्या दारात सोयाबीन ओतून, शेतकऱ्यांनी केला संताप व्यक्त!
अमरावती : केंद्र सरकारने सोयाबीन हंगामाच्या तोंडावर सोयाबीन पेंड आयात केली. आयातीचे धोरण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे आहे. या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभाचे वतीने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे तहसीलदाराच्या दारात सोयाबीन ओतुन आयात धोरणाविरुद्ध सोयाबीन उत्पादक शेतकरी यांनी संताप व्यक्त केला. सोयाबीनला दोन महिन्यापूर्वी ११,१११/- रूपायाचा भाव होता.
हे देखील पहा :
सोयाबीन हंगाम सुरू होताच ४००० रुपयांवर भाव आले. सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. अतिवृष्टीमुळे सोयाबीन भूत वादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
सोयाबीनला १०,००० रुपये भाव मिळावा अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली यावेळी पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीनचे नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी तहसील मध्ये सोयाबीन फेकून संताप व्यक्त करण्यात आला.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.