धुळे : साक्री तालुक्यामध्ये सोमवारी दुपारनंतर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात (Dhule News) नुकसान झाले आहे, यात प्रामुख्याने मका, गहू, हरभरा, तसेच आंबा व पपई या पिकांना प्रामुख्याने चांगलाच फटका बसला आहे. (Tajya Batmya)
सोमवारी दुपारनंतर अचानकपणे अवकाळी पावसाने साक्री तालुक्यामध्ये निजामपूर तसेच टिटाने या परिसरामध्ये जोरदार हजेरी लावली. जवळपास तासभर चाललेल्या या गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
गारपिटीने बर्फाचा खच
शेतामध्ये गारपिटीमुळे बर्फाचा खर्च साचल्याने कांदा पीक अक्षरशः सडून जाण्याची भीती असल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. या गारपिटीमुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.