जालना : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे मध्यरात्रीपासून जालना जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचे (Rain) आगमन झाले. या पावसामुळे हातातोंडाशी (Jalna News) आलेला घास हिरावून घेतला आहे. प्रामुख्याने गहू, हरभरा व कांद्याचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. (Letest Marathi News)
जालना जिल्ह्यातील भोकरदन, बदनापूर, अंबड तालुक्यासह जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसाला सुरवात झाली. या अवकाळी पावसामुळे काढणीसाठी आलेल्या गव्हाच्या पिकांसह हरभरा, कांदा, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात सुरू असलेल्या या वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उभं गव्हाचे पीक अक्षरशः आडवे पडायला सुरुवात झाली.
शेतकरी अडकचणीत
खरीप हंगामात चांगले उत्पन्न मिळाले नाही. जे मिळाले त्याला देखील चांगला भाव मिळालेला नाही. यात आता रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते वजीरखेडा शिवारात नुकसान अधिक झाले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.