Girish Mahajan News : नार्को टेस्ट करा, मग समजेल कोण खरं बोलतंय; गिरीश महाजनांचे अनिल देशमुखांना आव्हान

Dhule News : एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. महाजन म्हणाले, कि नाथाभाऊंची दुटप्पी भूमिका असून त्यांना सर्व पक्ष व सर्व पद आपल्याच घरात पाहिजेत
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : अनिल देशमुख यांनी समोरासमोर चर्चा करण्यास यावे. तसेच त्यांची आणि माझी नार्को टेस्ट करण्यात यावी; यानंतर समजेल कि कोण खरं बोलत आहे; असं खुल आव्हान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख याना दिले आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमानिमित्ताने (Girish Mahajan) गिरीश महाजन धुळ्यात आले होते. कार्यक्रमणानंतर महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल देशमुख हे यंत्रणेवर दबाव टाकून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला लावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारंवार चुकीचे आरोप करून देशमुख हे स्वतःचा बचाव करत असल्याचा आरोप देखील महाजन यांनी केला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी (Anil Deshmukh) अनिल देशमुख यांच्या विरोधात जबाब दिले असतानाही देशमुख खोटे दावे करत आहेत. समोरासमोर चर्चा आणि नार्को टेस्ट करण्याचे आव्हान अनिल देशमुख यांना दिल आहे. 

Dhule News
Ahmednagar News : चक्क पोस्टाने ड्रग्सची तस्करी; पुण्याहून मागविलेले पार्सल स्वीकारताच पोलिसांनी घेतले ताब्यात

पक्ष प्रवेश केला असेल तर खडसेंनी फोटो दाखवावे 
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भाजप प्रवेशाबाबत महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. महाजन म्हणाले, कि नाथाभाऊंची दुटप्पी भूमिका असून त्यांना सर्व पक्ष व सर्व पद आपल्याच घरात पाहिजेत. तसेच एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्ष प्रवेशावरून देखील निशाणा साधत एकनाथ खडसे यांनी त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला असेल तर तसे फोटो त्यांनी दाखवावे किंवा वरिष्ठांना आम्हाला आदेशीत करण्यास  सांगावे, असे म्हणत एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत सांगण्यात आलेल्या पक्षप्रवेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

महायुती सरकार जिल्ह्यातील दुष्काळ दूर करत आहे : उपमुख्यमंत्री फडणवीस 

धुळे जिल्ह्याला जे कधी वाटलं नव्हतं जे आमची वाटचाल दुष्काळाकडून वाटचाल होईल. देशांमध्ये नरेंद्र मोदी सरकार व राज्यामध्ये महायुतीचा सरकार आल्यामुळे या जिल्ह्याचा दुष्काळ हद्दपार करीत आहेत. पूर्वीच्या काळी प्रकल्प कसे व्हायचे. तत्कालीन युती सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली आणि सरकार गेले. १४ वर्ष या महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी सरकार होते. १४ वर्षात सुरवाडे जामफळसाठी फक्त २६ कोटी रुपये दिले. मात्र आता पाच वर्षात २४०० कोटी रुपये दिले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com