राज ठाकरे इतकी भाबडी अपेक्षा ठेवतील वाटलं नव्हतं- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSAAM TV

नाशिक: राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राज्य सरकारकडून अपेक्षाच ठेवू नये. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील, असं वाटल नव्हतं. हे सरकार लांगूलचालन करतंय, या सरकारने मर्यादा सोडल्यात आहेत. हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर जे राजद्रोहाचा गुन्हा लावून खासदार, आमदारांना १२ दिवस जेलमध्ये ठेवतात, त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं पूर्ण चुकीचं. राज्यसरकार विरोधात आम्ही लढतोय, राज ठाकरेंनी पण लढलं पाहिजे असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे.

Devendra Fadnavis
Beed: दोन खासदार, पाऊण डझन आमदार तरीही वाढला शेतकरी आत्महत्यांचा टक्का

फडणवीसांनी यावेळी शरद पवारांवरतीही टीका केली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या प्रश्नांकडे लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल. पवारांच्या बहुमूल्य सल्ल्याची आवश्यकता श्रीमान उद्धव ठाकरेंना आहे, त्यांना त्यांनी तो द्यावा असे फडणवीस म्हणाले आहेत. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमधिल अयोध्येचे खासदार ब्रीज भूषण यांनी विरोध केला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले त्यांच्या विरोधाचं कारण मला माहित नाही. रामाच्या शरणात जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे, रामाच्या शरणात जाण्यापासून कुणाला रोखण्याचे काही कारण नाही, अस माझं मत आहे असेही फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत ऑफिस सुरू केलं तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पावरफुल्ल आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यालयाचा काहीही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com