
मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती काही ढासळली नाही. सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणारा एक संशयित आरोपी सापडलाय. त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. गुरुवारी मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानवर एका चोराने चाकू हल्ला केला. त्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सेलिब्रिटींवर होत असेलल्या हल्ल्यांवरून विरोधकांकडून सरकारवर सुरक्षेवर टीका केली जातेय.
अभिनेत सैफ अली खान झालेल्या चाकू हल्लेवरून विरोधकांनी मुंबईतील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले. राज्यातील इतर शहरातही वाढत्या गुन्ह्यांच्या घटनांवरून कायदा सुव्यवस्थेबाबत शंका उपस्थित होत आहे. मुंबईतील घटनेनंतर बीड, सातारा या शहरातही गुन्ह्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरून विरोधकांकडून टीका होतेय. या टीकेवर मुख्यमंत्र्यांनंतर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलंय.
सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला करणारा एक संशयित आरोपी सापडला आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर आज नारायणगावमध्ये जी एसटी बस दुर्घटना घडलीय. त्या घटनेची संदर्भात मी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेऊन कुणाची चूक होती याची माहिती घेणार असल्याचंही उपमुख्यमंत्री म्हणालेत. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराडविषयी वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत.
मात्र या प्रकरणात तपास करणाऱ्या सीआयडीने किंवा एसआयटीने कुणाच्याही दबावाला बळी पडू नये, अशा सूचना मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात. असा अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात माध्यमांशी बोलताना सांगितलं. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CID पथकात मोठा बदल करण्यात आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडविरोधात मकोका लागताच सीआयडीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय.
सीआयडीतील तपास अधिकारी बदलण्यात आलाय. मकोकामध्ये सुदर्शन घुले गँगचा प्रमुख तर वाल्मीक कराड गँगचा सदस्य असल्याची माहिती समोर आलीय. हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करत होते. आता त्यांच्या जागी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील या प्रकरणाचा तपास करणार आहेत. आता यात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा शोध सीआयडी घेत आहे.
जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरलंय. आष्टी तालुक्यातील वाहीरा गावात धारदार शस्त्राने तीन भावांवर प्राणघातक हल्ला झाला. यात २ सख्या भावांची मृत्यू झालाय. तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झालाय. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या वाहीरा गावात रात्री साडेनऊ ते १० च्या सुमारास घडली. अजय विलास भोसले, भरत विलास भोसले असे हत्या झालेल्या भावंडांची नावे आहेत. तर कृष्णा विलास भोसले असे गंभीर जखमी असलेल्या भावाचं नाव आहे. याप्रकरणी ८ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पूर्व वैमनस्यातून ह घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.