Maharashtra Politics : हायकमांडच्या मास्टरस्ट्रोकने राज्याच्या राजकारणात वारं फिरणार? काँग्रेस पुन्हा उभारी घेणार का?

Maharashtra Political news update : काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्रात मोठा बदल केला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी हर्षवर्धन सकपाळ यांना सोपवण्यात आली आहे.
Maharashtra Political News
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवला. मात्र, काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत मात्र यश आले नाही. विरोधकांनी मतांची चोरी करून सरकार बनवलं. आता नव्याने पक्ष संघटना मजबूत करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागी विजय मिळवा. नाना पटोले यांनी चार वर्षात पक्षासाठी चांगले काम केलं. आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात मजबूत बनेल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवात शायरीने केली, 'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, असे म्हणत त्यांनी भाषणला सुरुवात केली. ते म्हणाले की, विरोधी पक्ष भाजपा सक्षम नाही म्हणूनच त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले. काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात प्रवेश दिला. आपल्याला संघटना बांधायची आहे. आपल्याकडे नेतृत्व आहे, पण कार्यकर्त्यांची एकएक कडी जोडायची आहे. कार्यकर्ता कार्यकुशल बनवायचा आहे'.

Maharashtra Political News
Kalyan Domivali: KDMCच्या 'त्या' ६५ इमारतींवर टांगती तलवार; ठाकरे गट आला धावून, रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

'लढाईतील आयुधे बदलली आहेत, रस्त्यावर उतरून लढावे लागेल. आता रडायचे नाही तर लढायचे दिवस आहेत. येत्या काळात राज्यात काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहे. काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे. पुढील निवडणुकीत राज्यात काँग्रेसची सत्ता आणून काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा निर्धार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.d

Maharashtra Political News
Dombivli : ६५०० कुटुंब बेघर होणार! टॅक्स भरूनही इमारती ठरल्या अनधिकृत, डोंबिवलीमधील रहिवाशांची डोळे पाणावणारी परिस्थिती

विजय वडेट्टीवार म्हणाले की, २०१४ साली मोदी लाटेत काँग्रेसनं विधानसभेत ४२ जागी विजय मिळवला, तर २०१९ साली अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही ४४ जागी विजयी झालो. २०२४ च्या लोकसभेत मोठा विजय मिळवला. पण विधानसभेत मात्र काँग्रेसला अपयश आले. आता पुन्हा जोमाने काम करावे लागणार आहे. संख्याबळ महत्वाचे नाही तर लढण्याची इच्छाशक्ती लागते. काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने जोमाने काम करून काँग्रेस पक्षाला पुनर्वैभव आणू, असे वडेट्टीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com