Crop Insurance: नुकसान लाखो रुपयांचे अन् मदत फक्त ३ रुपये; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Maharashtra Farmer News: Saamtv

Crop Insurance: नुकसान लाखो रुपयांचे अन् मदत फक्त ३ रुपये; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Maharashtra Farmer News: दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विमा म्हणून कुणाच्या खात्यात ७० रुपये तर कुणाच्या खात्यात दीडशे रुपये जमा झालेत. त्याहून अधिक त्रासदायक म्हणजे ही विम्याची रक्कम काढायची असेल तर बँकेच्या खात्यात किमान १ हजार असणे गरजेचे आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर, ता. ८ जून २०२४

दुष्काळ, अवकाळी पाऊस अन् निसर्गानेही साथ न दिल्याने यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे दुष्काळाची दाहकता, त्यानंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. अशावेळी या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पिक विम्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र मराठवाड्यात पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केल्याचे समोर आले आहे.

Crop Insurance: नुकसान लाखो रुपयांचे अन् मदत फक्त ३ रुपये; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Maharashtra Politics: अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा, आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजप पदाधिकारी थेट बोलला; VIDEO

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती आणि अवकाळी पाऊस या गोष्टींमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. याचपार्श्वभूमीवर सरकारने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला.

मात्र आता शेतकऱ्यांना मिळालेली नुकसान भरपाई पाहिली तर सरकार आणि विमा कंपन्यांनी त्यांची थट्टाच मांडल्याचे पाहायला मिळत आहे. पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याला फक्त ३ रुपये २६ पैसे नुकसान भरपाई मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दत्ता ज्ञानदेव मानमोडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Crop Insurance: नुकसान लाखो रुपयांचे अन् मदत फक्त ३ रुपये; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दादागिरी! हात पाय बांधून तरुणांना बेदम मारहाण; ७ जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विमा म्हणून कुणाच्या खात्यात ७० रुपये तर कुणाच्या खात्यात दीडशे रुपये जमा झालेत. त्याहून अधिक त्रासदायक म्हणजे ही विम्याची रक्कम काढायची असेल तर बँकेच्या खात्यात किमान १ हजार असणे गरजेचे आहे. त्यामुळे ७० रुपये १०० रुपयाचा विमा घेण्यासाठी बँक खात्यात हजार रुपये टाकायची कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि पेरणीच्या काळात ही चेष्टा केल्याने शेतकऱ्यांचा सरकार विरोधी आणि विमा कंपन्या विरोधी संताप वाढला आहे.

Crop Insurance: नुकसान लाखो रुपयांचे अन् मदत फक्त ३ रुपये; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Pune Crime: शर्यतीच्या बैल खरेदीवरुन वाद, बारामती तालुक्यात गोळीबाराचा थरार; एक जण गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com