बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात आगीच्या घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. अशीच एक मनाला हेलावून टाकणारी घटना (Buldhana) बुलढाणा तालुक्यातील इरला येथे रात्रीच्या सुमारास घडलीय. शेतातील गोठ्याला आग (Fire) लागल्याने या आगीमध्ये ८ जनावरांचा जळून मृत्यू झाला. (Tajya Batmya)
इरला (जि. बुलढाणा) येथील शेतकरी भागवत सरोदे यांच्या शेतात जनावरे बांधण्यासाठी गोठा केला आहे. येथे जनावरे बांधून ठेवलेले असतात. शेतकरी सरोदे हे नेहमीप्रमाणे चारापाणी करुन गोठ्यामध्ये गुरे बांधलेली होती. तसेच या गोठ्यामध्ये त्यांनी शेतीपयोगी साहित्य देखील ठेवलेले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास सरोदे यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागली. यामध्ये आठ जनावर आणि शेती साहित्य जळले.
दहा लाखाचे नुकसान
शेतकरी सरोदे यांच्या गोठ्यात असलेली ८ जनावरांचा आगीत जळून मृत्यू झाला. तसेच गोठ्यात ठेवलेले शेतीपयोगी साहित्य सुद्धा जळून खाक झाल्याने त्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून शेतकरी भागवत सरोदे यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.