नागपूर: लॉकडाऊनच्या (Lockdown) दीड वर्षाच्या काळात सर्वकाही थांबलं होतं. प्रत्येकजण हवालदील होता. मात्र, याचा काहीही परिणाम लाचखोरांवर (bribe takers) झालेला दिसत नाही. कारण जिल्ह्यात गेल्या वर्षात 114 लाचखोरीची प्रकरणं पुढं आली आहेत. गेल्यावर्षी 72 तर यावर्षी सहा महिन्यात 42 लाचखोरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे.
कोरोनाच्या गेल्या दिड वर्षाच्या काळात प्रत्येकजण कोरोनापासून बचाव करण्यासाठी धडपडत होता. सरकार आणि सर्वसामान्य कोरोनावर मत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, लाचखोरांचं लाच देणं-घेणं सुरूच होतं.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गेल्या वर्षी 72 जणांवर कारवाई केली. तर यावर्षी सहा महिन्यात 42 जणांवर कारवाई करण्यात आली. यातील सर्वाधिक 9 प्रकरणे महसूल विभागाची आहेत तर त्या खालोखाल 7 प्रकरणे पोलीस विभागाची आहे. लाचखोरी ही एक मानसिकता आहे. ही मानसिकता दूर व्हावी, लोकांनी जागृत होऊन लाच मागणाऱ्यांविरुद्ध तक्रार द्यावी, असं आवाहन लाचलुचपत विभागाच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी केलं आहे.
यावर्षी लाचखोरीत महसूल विभाग सर्वात पुढं आहे. महसूल विभागाची 9 प्रकरणे आहेत, तर त्या खालोखाल 7 प्रकरणे पोलीस विभागाची आहेत. या प्रकरणांमध्ये 200 रुपयांपासून तर 6 लाख रुपयांपर्यंतची लाच घेतल्याची प्रकरणे आहेत. लाचखोरांवर कारवाई होत असली तरी लाच घेणे थांबत नाही. त्यामुळं यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.