परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला.
एसआयटी तपासावर मुंडे कुटुंबीय नाराज.
मुख्य संशयित गोट्या गीते अद्याप फरार.
कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांशी लवकरच महत्त्वाची भेट होणार.
बीड जिल्ह्यातील परळी शहरात व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला बरेच दिवस उलटले आहे. या घटनेनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. विशेषत: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून ठोस कार्यवाहीची मागणी केली होती. मात्र, एक महिना पूर्ण होऊनही तपासाच्या बाबतीत काही ठोस कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे आता मुंडे कुटुंबीय व ज्ञानेश्वरी मुंडे स्वतः जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत.
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची भर चौकात हत्या करण्यात आली. ही घटना घडून बराच कालावधी उलटून गेला आहे. अद्यापही त्यांचा मारेकरी पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुंडे कुटुंबीयांनी तपासातील विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली असून, एसआयटीवर विश्वास कमी होत चालल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित गोट्या गीते अजूनही फरार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला स्पष्ट अल्टिमेटम दिला होता की, जर एका महिन्यात आरोपींना अटक झाली नाही तर बीडसह संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येईल. त्यामुळे आता परिस्थिती गंभीर व संवेदनशील बनली आहे. जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल आणि ते पुढे कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
परळीतील व्यापारी हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण अजूनही अस्थिर आहे. आंदोलनाचा वादळ पुन्हा उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार आणि सरकार काय पावले उचलणार, यावर पुढील काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.