Ashti Heavy Rain : आष्टी तालुक्यात धुवाधार पाऊस; सीना नदीच्या पुराचे पाणी शिरले गावात, शेती पिकाचे मोठे नुकसान

Beed News : अवकाळी पाऊस राज्यात जोरदार बरसत आहे. परिणामी अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यानुसारच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे
Ashti Heavy Rain
Ashti Heavy RainSaam tv
Published On

योगेश काशीद 

बीड : राज्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात धो धो बरसला आहे. यामुळे तालुक्यातील सिना नदीला मोठा पूर आला असून पुराचे पाणी आजूबाजूच्या गावांमध्ये तसेच शेतांमध्ये देखील शिरले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून युवा नेते जयदत्त धस यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे.

अवकाळी पाऊस राज्यात जोरदार बरसत आहे. परिणामी अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. बहुतांश नद्यांना पूर आल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यानुसारच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे तालुक्यातील सीना नदीला मोठा पूर आला आहे. नदी काठावरील साकत, खुंटेफळ, लोणी, कोयाळ या गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा ओघ वाढल्याने भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. 

Ashti Heavy Rain
Ambit Dam : मे महिन्यातच आंबित धरण ओव्हरफ्लो; आठ दिवसांपासून सुरु आहे अवकाळी पाऊस

नदी पात्र फुटून पुराचे पाणी शेतात 

शिवाय नदीवरील बंधाऱ्यामधून पाणी ओव्हरफ्लो झाल्याने नदी पात्र फुटून परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. यामुळे शेतात असलेला कांदा, ऊस, मका व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक शेतांचे रस्ते पूर्णपणे वाहून गेले असून, काही भागांत विहिरी पाण्यात बुजल्या आहेत. तसेच सोलर पंप व कांद्याच्या चाळी पाण्याखाली गेल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवलेला मुरघासही या पाण्यात मिसळला असून अंदाजे दीडशे ते दोनशे टन मुरघास वाया गेला आहे.

Ashti Heavy Rain
Akola : रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात पडून एकाचा मृत्यू; महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

तातडीने पंचनाम्याची मागणी 
पुराची माहिती मिळताच युवा नेते जयदत्त धस यांनी तातडीने प्रशासनाला सोबत घेत पूरग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तर साकत हे गाव अहिल्यानगर- सोलापूर हायवेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असून या गावाचा मिरजगाव व अहिल्यानगर शहराशी दळणवळणाचा दैनंदिन संपर्क असतो. मात्र, पुरामुळे रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. याबाबत जयदत्त धस यांनी तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून रस्ता पुनर्बांधणीसाठी आवश्यक कार्यवाहीची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com