बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 13 वर्षांनी पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूवरुन वादळ उठलंय.. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर 2 दिवस त्यांचं पार्थिव मातोश्रीत ठेवल्याचा आणि त्यांच्या बोटाचे ठसे घेतल्याचा आरोप रामदास कदमांनी केला आणि नव्या वादाला तोंड फुटलं.. मात्र आरोप फेटाळून लावतानाच अनिल परबांनी रामदास कदमांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय..
खरंतर दसरा मेळाव्यात बोलताना रामदास कदमांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचा छळ केल्याचा आरोप केलाय..एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या बोटाचे ठसे कशासाठी घेतले होते? याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीच रामदास कदमांनी केलीय.
महापालिका निवडणूकांच्या आधीच देशातील सर्वात महत्वाचे नेते राहिलेल्या बाळासाहेबांच्या मृत्यूवरुन राजकारण सुरुय झालंय. आजवर आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती. याच महाराष्ट्रात निवडणूकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची राळ उठवत एकमेंकांना नामोहरम केलं जायचं. मात्र आजवर न गाठलेली निच्चांकी पातळी सध्या राजकीय पुढाऱ्यांनी गाठलीये. असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.