'औरंगजेबाने तलवारीने कापले नाहीत त्यापेक्षा जास्त सरकारने धोरणाने कापले', बच्चू कडू यांची सरकारवर टीका

Bachchu Kadu On Government: बच्चू कडू यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर सरकारवर तीव्र टीका केली. शेतकरी आणि युवकांच्या आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणावर सरकारला उत्तर देण्याचं आव्हान त्यांनी केलं.
Bachchu Kadu
Bachchu Kadugoogle
Published On

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर बोलताना बच्चु कडू यांनी सरकारवर जळजळीत टिका केली आहे. कबर नको आहे हे मान्य आहे पण त्या कबरीच्या प्रश्नात आमचा शेतकरी मरतोय. जेवढे औरंगजेबाने तलवारीने कापले नाहीत तेवढे लोक या राज्यात सरकारी धोरणाने कापले. राज्यात शेतकरी आणि तरुण मिळून वर्षाला ५० ते ६० हजार जण आत्महत्या करत आहेत याकडे बच्चू कडू यांनी लक्ष केंद्रीत करत सरकारने शेतकरी, युवक अपंग यांना काय चांगलं दिलं ते सांगाव असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं.

दरम्यान, दिव्यांग, शेतकरी, मजुर, कष्टकऱ्यांसाठी बजेटमध्ये तरतुद नसल्याच्या मुद्द्यावरून बच्चु यांनी सरकारवर टिका केली आहे. नियमित तरतुदी शिवाय दुसऱ्या कुठल्या नाहीत. धर्म आणि जातीच्या नावावर सर्वच पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप बच्चु कडू यांनी यावेळी केला आहे.

Bachchu Kadu
Nashik Water Crisis: नाशिककरांनो सावधान! शहरात शनिवारी आणि रविवारी दोन दिवस पाणीबाणी

शिंदे सरकारने दिव्यांग मंत्रालय काढलं पण त्याला आर्थिक तरतुद नाही, १४०० कोटींची तरतुद केली. त्यापैकी १२०० कोटी पगारावर खर्च होत आहेत. एक कोटी दिव्यांगासाठी केवळ २०० कोटीची तरतुद. १६ च्या कायद्यानुसार पाच टक्के म्हणजे २५ हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने राखीव ठेवला पाहिजे पण ठेवत नाहीत. दिव्यांग मंत्रालय स्थापन करून काही उपयोग नाही, त्याला तरतुद असल्याशिवाय अर्थ नाही. केवळ राजकिय लाभासाठी येथे योजना निर्माण केल्या जातात त्यामुळे देशाच वाटोळ झालय अशी टिका देखील बच्चु कडू यांनी केली आहे.

Bachchu Kadu
Nagpur Clash: नागपूर दंगलीचं बांगलादेश कनेक्शन? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे नेते बच्चु कडू यांनी आज किल्ले रायगडाचा पायथा पाचाड येथून आपल्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन ते अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. सरकारचे दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे नसल्याचा आरोप करीत सरकारचे दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी या आंदोलनाचा पुकार केला आहे. आज २१ मार्च ते २३ मार्च असे तिन दिवस हे अन्न त्याग आंदोलन केले जाणार असून शासनाने याची दखल घेतली नाही तर २३ मार्च रोजी या आंदोलनाची नवी दिशा ठरवली जाईल असे कडू यांनी सांगितले आहे.

Bachchu Kadu
Dharashiv Political Crisis : धाराशिवमधील १२ सरपंच आणि ५०० ग्रामपंचायत सदस्य अपात्र, नेमकी चूक काय?

तसेच दिशा सालियन आणि औरंगजेब कबरीवरूनही बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये कुणाचं भलं होणार आहे असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात दंगल होते याची जरा देखील शरम वाटत नाही. साधी खंत देखील व्यक्त केली नाही. दंगलीची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी किमान दोन दिवसांचा तरी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com