Amravati News : आठ दिवसांपासून शेतात वीज नाही; वीज कार्यालयावर ठिय्या आंदोलन

Amravati News : आठ दिवसांपासून शेतात वीज नाही; वीज कार्यालयावर ठिय्या आंदोलन
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे  
अमरावती
: यंदा उशिराने पावसाचे आगमन झाले असून हवा तसा पाऊस झाला नाही. यामुळे पिकांची (Amravati) अपेक्षित वाढ झाली नाही. यात आता पाऊस नसल्याने पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. परंतु शेतात वीजपुरवठा नसल्याने शेतकरी (Farmer) आक्रमक झाले असून महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. (Latest Marathi News)

Amravati News
Nitesh Rane News : सिंधुदुर्गच्या इतिहासात कधी नव्हे ते अशी निंदनीय घटना घडली : नितेश राणे

गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक करपत आहे. यात अमरावती जिल्ह्यतील अंजनगाव सुर्जी लगत कापूस तळणी भागात गेल्या तीन दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा (Mahavitaran) पूर्णपणे बंद आहे. शेतातील विहिरीत पाणी आहे. मात्र वीज पुरवठा नसल्याने शेतातील पीक हे शेतकरी वाचवू शकत नाही. परिणामी शेतकरी त्रस्त झाला आहे. 

Amravati News
BJP on INDIA Meeting : 'इंडिया'ची बैठक म्हणजे गरुड झेप नाही तर श्वापदांची टोळी, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

शेतकऱ्यांचा ठिय्या 

आठ तास वीज पुरवठा सुरू असला पाहिजे; असे आदेश असताना सुद्धा गेल्या तीन दिवसापासून वीज पुरवठा बंद असल्याने अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत मंगळे यांच्या नेतृत्वात कापूस तळणी वीज मंडळ कार्यालयात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांना बोलविल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com