Bachchu Kadu : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर सरकारला धोका; आमदार बच्चू कडू यांचा इशारा

Amravati News : जाती- धर्माभोवती राजकारण फिरत; तसं शेतकऱ्याच्या भोवती ज्या दिवशी राजकारण फिरेल, तेव्हा शेतकरी शेतमजुरांचे भलं होईल
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला तेव्हाच यांचा भरोसा वाढेल. नाही तर वाढणार नाही. उलट सरकारला धोका भेटणार; असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन व कापसाचे हमीभाव दोन हजार रुपये कमी केले. त्यामुळे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच नुकसान झाल्याचे देखील बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

अमरावती (Amravati) येथे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राजकारण शेतकऱ्यांच्या भोवती फिरलं पाहिजे. जसं जाती- धर्माभोवती राजकारण फिरत; तसं शेतकऱ्याच्या भोवती ज्या दिवशी राजकारण फिरेल, तेव्हा शेतकरी शेतमजुरांचे भलं होईल; असेही आमदार कडू (Bachchu Kadu) यांनी सांगितले. 

Bachchu Kadu
Kiran Lahamate : धनगर आरक्षणावरून अजित पवार गटाच्या आमदाराचा सरकारला घराचा आहेर; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

अनेक आमदार शरद पवार गटात जातील 
अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडून लढू शकतात; अशी एकंदरीत परिस्थिती आहे असा दावा बच्चू कडू यांनी केला. शेवटी आमदाराला मतदार संघात निवडून यायचं असते. पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. निवडून येणं महत्वाचे आहे. लोकांना अजित दादा अशी उडी घेणार हे पटलं नाही. तर भाजप व राष्ट्रवादी यांची विचारधारामध्ये तफावत असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com