अमर घटारे
अमरावती : सततच्या पावसानानंतर मागील आठ- दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकरी पीक काढणीचे काम करत आहे. अशात मशीनद्वारे शेतातील सोयाबीन काढणीचे काम सुरु असताना दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत तरुण शेतकऱ्याचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीय हादरले आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड शेत शिवारात सदरची घटना घडली असून यात गौरव कावरे असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान पावसाने उघडीप दिली असल्याने शेतात काढणी करण्याचे बाकी असलेले काम शेतकरी करत आहेत. प्रामुख्याने सोयाबीन आणि मका काढणीच्या कामाला वेग आला असून कापूस वेचणी देखील सुरु आहे. अशात दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मशीनखाली सापडल्याने जागीच मृत्यू
कावली वसाड शेत शिवारात कापून ठेवलेला सोयाबीन काढणीचे काम करण्यात येत होते. यासाठी शेतात मशीन लावण्यात आले होते. मशीनमध्ये कापलेल्या सोयाबीनची झाडे टाकण्यात होते. यावेळी गौरव कावरे हा तरुण शेतकरी मशीनमध्ये सोयाबीन टाकणीचे काम करत होता. सोयाबीनची कापणी सुरू असताना सोयाबीन कापणीच्या यंत्राखाली आल्याने शेतकरी गौरव याचा मृत्यू झाला. गौरवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
कापणी केलेला सोयाबीन पेटविला
अतिवृष्टीमुळे पिकांची खराबी झाल्यानंतर आता यातून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. मात्र उत्पन्न होत नसल्याने शेतकऱ्याने कापणी केलेले सोयाबीनचे ढीग पेटवले. उत्पन्न होत नसल्याने व पुढील पिकावर बुरशी रोग येऊ नये; म्हणून शेतकऱ्याचा पेटवण्याचा निर्णय घेतला. देवळी तालुक्यातील आंजी बऱ्हाणपूर येथील शेतकरी बाबा कृष्णाजी पाटील यांनी चार एकरावरील सोयाबीनचे पीक पेटवले. यात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.