Maharashtra Farmers Death: नापीक जमीन, अवकाळीचे संकट अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर, पश्चिम विदर्भात पाच महिन्यात ४६१ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं

Maharashtra Farmers Death: पश्चिम विदर्भात पाच महिन्यात 461 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या अमरावती जिल्ह्यात झाल्यात.
Maharashtra Farmers Death: नापीक जमीन, अवकाळीचे संकट अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर, पश्चिम विदर्भात पाच महिन्यात ४६१ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं
Maharashtra Farmers Death:Saamtv
Published On

अमर घटारे,अमरावती|ता. २१ जून २०२४

नापिकी, अवकाळी पाऊस आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अमरावती विभाग म्हणजेच पश्चिम विदर्भात पाच महिन्यात 461 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या या आत्महत्यांवरुन प्रहारचे नेते बच्चू कडू आणि अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Maharashtra Farmers Death: नापीक जमीन, अवकाळीचे संकट अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर, पश्चिम विदर्भात पाच महिन्यात ४६१ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं
Sanjay Raut Video: 'लोकशाहीच्या नावाखाली डोंबाऱ्याचा खेळ सुरू', CM केजरीवाल यांच्या जामीनानंतर संजय राऊत बरसले; मोदी- शहांवर निशाणा!

अमरावती विभाग म्हणजेच पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने शेतकरी आत्महत्यांबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. जानेवारी ते मे या महिन्यात पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला व बुलढाणा या पाच जिल्ह्यात नापिकी, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणामुळे तब्बल 461 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

यामध्ये एकट्या अमरावती जिल्ह्यात143 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर राज्यात सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. यावर खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभा सभागृहात शेतकरी आत्महत्याचा विषय मांडू, असे सांगितले आहे.

Maharashtra Farmers Death: नापीक जमीन, अवकाळीचे संकट अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर, पश्चिम विदर्भात पाच महिन्यात ४६१ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं
Pune Maval Firing CCTV : पुण्यात चाललंय काय? तळेगावात हवेत 5 राऊंड फायर; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल

तसेच "सरकारच्या योजना फक्त कागदावर आहे व फक्त सरकार घोषणाबाजी करते," अशी टीका खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेस- भाजपवर टीका करत स्वामीनाथन आयोग सरकार का लागू करत नाही? असा सवाल उपस्थित करत निवडणूकीत शेतकऱ्यांचे मुद्दे गायब असतात अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

Maharashtra Farmers Death: नापीक जमीन, अवकाळीचे संकट अन् डोक्यावर कर्जाचा डोंगर, पश्चिम विदर्भात पाच महिन्यात ४६१ शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं
Chhatrapati Sambhajinagar: १२ कोटींसाठी कामगारांनीच रचला बड्या उद्योजकाच्या अपहरणाचा कट, एका टीपने प्लॅन फसला; व्यापारी भयभीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com