नांदेडनंतर अकोल्यात असंवेदनशीलतेचा कळस, कृषीमंत्र्यांसमोरच अधिकारी मोबाईलवर मश्गुल

Insensitivity in Akola Drought Meeting: नांदेडनंतर आता अकोल्यात दुष्काळावर घेतलेल्या बैठकीत जे काही घडलंय ते पाहून तुम्हाला चीड येईल. नेमकं काय घडलंय या बैठकीत?... विरोधक पुन्हा का आक्रमक झालेत?
AKOLA DROUGHT MEETING
AKOLA DROUGHT MEETINGsaam tv
Published On

राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींनंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य आहे का? असा प्रश्न पडावा. मराठवाड्यातील काजू-बदामच्या प्रकारानंतर अकोल्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी अकोल्यात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मात्र, ही बैठक सुरू असताना अधिकारी मोबाईल खेळण्यात मश्गुल असल्याचं दिसलं...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात झालेल्या आढावा बैठकीतील प्रकारावर विरोधकांनी संताप व्यक्त केलाय... तर दुसरीकडे, कृषीमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करणार असल्याची मोघम प्रतिक्रिया दिलीये...

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे. खरीपाचा हंगाम हातचा गेल्याने बळीराजा रडकुंडीला आला आहे. आस्मानी संकटाने बळीराजा पिचलेला असतानाच यंत्रणेची असंवेदनशीलता चिड आणणारी आहे. एकीकडे काजू-बदामवर ताव मारणारे लोकप्रतिनिधी तर दुसरीकडे, मोबाईलमध्ये दंग असणाऱ्या अधिकाऱ्यांना पाहून खरंच, सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं सोयर-सुतकं तरी आहे का?... असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com