Maharashtra Live News Update: नाशिकमधील वाघाडी नाला फुटला; गोदाघाट परिसरात शिरलं पाणी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२५, बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा आजपासून सुरू होणार, मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

नाशिकमधील वाघाडी नाला फुटला; गोदाघाट परिसरात शिरलं पाणी

रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरीलल हातखंबा गावात भीषण अपघात

कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची सहा गाड्यांना धडक

ट्रकने चार चारचाकी, 3 दुचाकी, 1 रिक्षाला उडवलं आहे

एक ठार तर चार जखमी, जखमीना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले

गाड्यांना धडक देणाऱ्या वाहनामध्ये आरटीओ विभागाची गाडी

चंद्रपुरातील मनपाच्या मल:निस्सारण संयंत्रात क्लोरीन गॅस गळती

द्रपूर शहरातील रहमतनगर परिसरातील इरई नदीच्या पात्रात असलेल्या महानगरपालिकेच्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटमधून क्लोरीन गॅस गळतीने खळबळ उडाली आहे. प्लँटच्या जवळपास असलेल्या लोकांना डोळे आणि घशात जळजळ जाणवत आहे.

माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

माढा- वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने माढा तालुक्यात सीना नदीला पूर...

नदी काठच्या वाकाव गावाला पाण्याचा वेढा.

शेतकरी शिवाजी सावंत यांच्या घराला ही पाण्याचा वेढा

सीना नदी काठच्या केवड,उंदरगाव,सह ८ ते १० गावांना पुराचा वेढा

आगळगावात चांदणी नदीच्या पूरात दुचाकीसह वाहून जाणाऱ्या इसमास तरुणांनी वाचवले

बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात गेल्या ४ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांदनी नदीला पूर आल्याने आगळगावसह अनेक गावाचा बार्शी तालुक्याचा संपर्क तूटला आहे.

आज दुपारी अंदाचे ४.३० वाजण्याच्या सुमारास चांदणी नदीवरील पुलावरून एक दुचाकीस्वार बार्शीकडे जात असताना अचानक दुचाकी घसरून पूराच्या पाण्यात वाहू लागली. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे दुचाकीसह इसम वाहत चालल्याचे दिसताच त्या पुलावर उपस्थित असलेले शुभम गरड, रवि कोल्हे, गोट्या शिंदे व हैदर मुजावर जीवाची पर्वा न करता त्या इसमाला नदीच्या पुरातून सुखरुप बाहेर काढले.

बौद्धगया मुक्तीसाठी शिर्डीत आक्रोश आंदोलन

बिहार राज्यातील महाबोधी बुद्धविहार आणि नागपूर येथील दीक्षाभूमी मुक्तीसाठी शिर्डीत आंदोलन करण्यात आलंय.. भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांच्या नेतृत्वात शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. यावेळी बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.. गेल्या 50 वर्षापासून हा लढा सुरू असून बुद्धगया टेम्पल ऍक्टमध्ये बदल करून ही ठिकाणे मुक्त करावीत अशी मागणी करण्यात आलीय..

Nashik: ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

नाशिक -

ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक

शालिमार कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचे निषेध आंदोलन..

आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी

नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक

Parbhani: परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याहस्ते कुणबी प्रमाणपत्र वाटप

परभणी -

परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याहस्ते कुणबी प्रमाणपत्र वाटप

जुने नवीन नाही तर दोन्हीचे एकच निकष त्यानुसार प्रमाणपत्र वाटप– जिल्हाधिकारी

कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याने लाभार्थ्यांनी मानले जरांगे पाटील यांचे आभार

Nanded: नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात, सात ते आठ जण गंभीर

नांदेड -

नांदेडच्या मुखेड शहरात भीषण अपघात

ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने काळी पिवळी जिपला दिली धडक.

पाच ते सहा मोटरसायकलला देखील ट्रकने चिरडले.

या भीषण अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती.

दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले.

मुखेड शहरातील बाऱ्हाळी नाका येथे घडला अपघात.

Beed: बीडमधून बीड - आहिल्यानगर रेल्वे धावली, मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

बीड-

बीडमधून बीड - आहिल्यानगर रेल्वे धावली

बीडवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड- आहिल्या नगर रेल्वेचे उद्घाटन.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल

उद्धव ठाकरेंकडून मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

शिवसैनिकांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता

Shirur: ओढ्याच्या पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे कामिनी ओढ्याच्या पुलावरून वाहून गेलेला तरुणाचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

सूरज अशोक राजगुरू असे तरुणाचे नाव

स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन बचाव पथकाच्या सततच्या प्रयत्नांनंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Omraje Nimbalkar: खासदार ओमराजे निंबाळकर यांचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक

गेल्या 5 दिवसापासून खासदार ओमराजे यांचे व्हॉट्सअँप अकॉउंट बंद, पोलिस व प्रशासन दरबारी तक्रार

व्हाट्स ऍप अकॉउंट सुरु होत नसल्याने खासदार झाले हतबल

सोशल मीडिया अकॉउंट विरोधकांनी ठरवून रिपोर्ट केल्याचा आरोप

सोशल मीडिया बॅन करून माझ्या जनसंपर्कावर घाला घालण्याचा प्रयत्न

सरकार विरोधी भुमिका घेतल्याने कटकारस्थान करून लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम

Beed: बीड अहिल्यानगर रेल्वे धावली

अनेक दशकांपासूनच बीड वासियांचे रेल्वेचे स्वप्न अखेर आता पूर्ण झाल असून आज बीड अहिल्यानगर हा पहिला टप्पा रेल्वेने पूर्ण केला असून आज बीड मधून रेल्वे अहिल्यानगर कडे धावली आहे गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेसाठी आतुरलेले बिडकर आज आनंद व्यक्त करत आहेत स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घा

Nanded: नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान...

नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने थैमान घातला आहे. पावसामुळे गोदावरी सह उपनद्यांना मोठा पूर आलाय. आसना नदीला पूर आल्याने गाडेगाव इथल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे नांदेड ते मुदखेड हा राज्य महामार्ग बंद करण्यात आला आहे. नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या 14 दरवाजातून एक लाख 62 हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी, असना ह्या नद्या धोक्याच्या पातळी जवळ आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवर नुकसान झालेला आहे. पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

Raj Thackeray: २४ तासांच्या आत आरोपीला शोधा, राज ठाकरेंची पोलिसांकडे मागणी

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज पहाटे लाल रंग फेकण्यात आला होता. त्यानंतर शिवाजी पार्कात एकच गोंधळ झाला. शिवसैनिक संतप्त झाले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली. शिवसेना नेत्यांनी संपूर्ण घटना राज ठाकरेंना सांगितली. राज ठाकरे यांनी त्यानंतर पोलिसांसोबत संवाद साधला. पुतळ्यावर रंग टाकणाऱ्यांना २४ तासांच्या आतमध्ये शोधा, अशी विनंती राज ठाकरेंनी पोलिसांना केली आहे.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला, शिवाजी पार्कात गोंधळ, राज ठाकरे घटनास्थळी

मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कात गोंधळ निर्माण झाला आहे. या ठिकाणी राज ठाकरेंनी पाहणी केली.

Dharashiv: धाराशिव शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत

जेसीबीने हार घालून सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांचे करण्यात आले स्वागत

मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते 151 फुटाच्या स्वराज ध्वज स्तंभाचे करण्यात भूमिपूजन

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभा केला जातोय 151 फुटाचा स्वराज ध्वज स्तंभ

मुंबईच्या आंदोलनानंतर जरांगे पाटील पहिल्यांदाच धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत

पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार सुराज्य ध्वज स्तंभाचे भूमिपूजन करण्यात आले

Jalna: आमदार बबनराव लोणीकरांनी दिली बंजारा उपोषणस्थळी भेट

उपोषण सोडण्याचीही केली विनंती

निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी उपोषण स्थळी उपस्थित

बंजारा समाजाला एसटी प्रवर्ग मध्ये सामावून घ्यावे याकरिता मागच्या सात दिवसापासून सुरू आहे आमरण उपोषण

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बबनराव लोणीकर यांच्या फोनवरून उपोषणकर्त्यांसोबत संवाद साधला

मी माझी भूमिका यापूर्वीच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेली आहे- पंकजा मुंडे

स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी शिवसेना आक्रमक

दादर येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे विटंबना करण्याच्या प्रयत्न करण्यात आला.. यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. तर ठिक ठिकाणी आंदोलनं होत आहे . बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे सुद्धा शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन सुरू केला आहे..

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्हा दौऱ्यावरती होते याच दरम्यान बीडच्या जिजाऊ सृष्टी येथे काही बांधवांनी अजित पवारांना निवेदन दिले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना खडे बोल सुनावत चांगले काम करून घ्या कंत्राटदारांना वेळोवेळी सूचना करा चुकीचे काम करू नका त्याचबरोबर काम दर्जेदार झाले पाहिजेत मागचा पुढचा विचार करून कामांमध्ये दर्जा वाढवा असे खडे बोल अजित पवारांना जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अंबरनाथ दौरा

उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आढावा बैठक

आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात महत्त्वाची बैठक

शुक्रवारी राज ठाकरे यांचा अंबरनाथ मध्ये दौरा

अंबरनाथच्या पनवेलकर हॉलमध्ये कार्यक्रमचं आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना कार्यालयाच लोकार्पण सोहळा राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार

Raju Shetty: अलमट्टी धरणाच्या उंची वाढीसाठी कर्नाटक सरकारच्या हालचालीवरून राजू शेट्टी संतापले

केंद्र सरकारने कर्नाटकला कडक शब्दात खडसावण्याची गरज

अलमट्टी धरणाची उंची वाढवणे कोल्हापूर आणि सांगलीच्या जीवावर उठणार आहे

महाराष्ट्र सरकार सह केंद्राने याला कडाडून विरोध करावा

राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी पुढील कॅबिनेटमध्ये विषय मांडणार - मंत्री झिरवाळ यांची माहिती

मराठवाड्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडाला आहे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जनावरे वाहून गेली आहेत हिंगोली जिल्ह्यात तर आतापर्यंत सहा जणांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे दरम्यान सोयाबीन कापूस तूर उडीद मूग हळद ही पिके अक्षरशा उध्वस्त झाली आहेत दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत शेतकऱ्यांना मदत भरीव मदत देण्यासाठी ओल्या दुष्काळाची मागणी मांडू असं हिंगोलीचे पालकमंत्री व राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले आहेत,

Latur crime :  जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या,  पोलीस भरतीसाठी पैसे न दिल्याने घेतला जीव

लातूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे ,जन्मदात्या बापालाच स्वतःच्या मुलाने जीवांशी संपवल आहे. पोलीस भरती साठी पैसे दिले नाही, पण घरातील सिलेंडर साठी पैसे दिले या रागातून हैवान मुलाने हे कृत्य केलय, ही , घटना लातूरच्या चाकूर तालुक्यातील हिंपळनेर येथील आहे , तर या घटनेत वडील काशिनाथ पांचाळ वय 70 वर्ष यांना , अजय काशिनाथ पांचाळ वय २४ वर्षे याने लाकडाने बेदम मारहाण केली आणि यात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणी मुलाची तक्रार आईने चाकूर पोलीस ठाण्यात दिली आहे. सध्या या हैवान मुलाला पोलिसांनी ताब्यात घेत बेड्या ठोकल्यात. तर अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

Parbhani : सततच्या पावसामुळे शेतात असलेल्या मुगाला बुरशी

परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने सप्टेंबर मध्येच पावसाची सरासरी ओलांडली आहे. यामुळे लाखो हेक्टर वरील हाताला आलेली सोयाबीन,कापूस मुग आदी खरीप पिके अगदी शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत.परभणीच्या दैठणा येथील शेतकरी बन्सी कच्छवे यांनी दिड एकर मध्ये मग लागवड केली होती मुग चांगल्या प्रतीचा आला ही होता मात्र सतत पाऊस सुरू असल्याने या मुगाला बुरशी आलीय त्यामुळे या शेतकऱ्यांला हा मुग काढणीचा खर्चही परवडेना म्हणुन गावातील मजूर महिलांना दीड एकराचा प्लाट देवून टाकलाय गावातील मजूर महिला हा मुग काढून घेवून जातात हाताला काही लागते का ते पाहत आहेत.

Ajit Pawar News : अजित पवारांचा अचानक दौरा, जिल्हा प्रशासनाची धावपळ 

- अजित दादांनी अचानक वंजारवाडी कडे जाण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ.

- आदर्श गाव असलेल्या वंजारवाडीत अजितदादांनी दिली भेट.

- दादांकडून सरपंचासह ग्राम पंचायत मधील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी कोणाला किती पगार आहे

- मध्ये कोणी तंबाखू त्याचबरोबर गुटखा खातं का सरपंचाला अजित पवारांची विचारपूस.

- गावामध्ये दारूचे ठेके चालतात का कोणी दारू विक्री करता का जुगार पत्ते आहेत का कसून विचारपूस.

- कोणाला किती अपत्य आहे.

- सरपंच नाही विचारले तिथे अपत्य आपत्ती सरपंच पद जाईल मिस्कील टिपणी.

- बीड मधील अर्धे कार्यक्रम सोडून अजित पवारांना अचानकच दिली वंजारवाडी ला भेट अर्ध्या अधिकाऱ्यांना अजित पवारांचा ताफा कुठे गेला माहित नाही

 ST Bus : रायगडच्या माझेरी घाटात ST बसला अपघात

महाड भोर रस्त्यावरील माझेरी घाटात ST बसला अपघात झाला आहे. यामध्ये ST बस चालकाने प्रसंगावधान राखत अनियंत्रित ST बस रस्ताच्या विरुद्ध बाजूस डोंगर भागात नेल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. रामदास पठार महाड अशी हि असून या बसमधून 20 विद्यार्थी आणि 12 ग्रामस्थ प्रवास करीत होते. अपघातदरम्यान अनेकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना वरंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमोपचार देण्यात आले. हि ST बस नादुरुस्त असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.

Dharashiv: मुख्यमंत्र्यांनी तातडीने सरसगट नुकसान भरपाई द्यावी, धाराशिवमधील शिवारात शेतकऱ्यांनी मागणी

धाराशिव जिल्ह्यात मागील चार दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे.जिल्ह्यातील सात महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.शेतकऱ्यांच हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीमध्ये हिरावुन गेला आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेले सोयाबीन पिकाला अक्षरशः तळ्याच स्वरुप आलय,मुख्यमंत्र्यांनी सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी गोपाळवाडी येथील शेतकऱ्यांनी केलीय

Jalna: जालना शहरात पंकजा मुंडे यांच्याकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी..

- जालना येथे काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरा मोठी हानी झाली, अनेक व्यापाऱ्यांचे तसेच सामान्य नागरिकांच्या कुटुंबाची अक्षरशः दैना उडाली, यावेळी पंकजा मुंडे यांनी शहरातील साठे नगरात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली यावेळी संसार उपयोगी साहित्य वाहून गेल्यामुळे पंकजा मुंडे समोर महिलांना अश्रू अनावर झाले.. पंकजा मुंडे यांनी मनपा आयुक्त यांच्याशी संवाद साधत पिढी त्यांना मदत करण्याचा आश्वासन दिलं

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

मुक्ती संग्राम दिनाच औचित्य साधून मराठा समाज बांधवांना अजित पवारांकडून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप.

मराठा समाज बांधवांना स्वतः अजित पवारांनी कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले आहे.

Jalna: जालन्यात बंजारा समाज आक्रमक

जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाचा रास्ता रोको,

जालना जिल्हाधिकारी कार्यालय समोर बंजारा समाजाने रास्ता रोको आंदोलन सुरू केलय...

बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे आमरण उपोषण...

आज आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे...

आमरण उपोषणाला पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट न दिल्यामुळे आक्रमक झालेल्या बंजारा बांधवांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन सुरू केल आहे...

Marathwada: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप

धाराशिव मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते चार कुणबी प्रमाणपत्राचे झाले वाटप

मुंडे अभिषेक व्यंकटेश, धाराशिव, प्रगती व्यंकटेश मुंडे, पूजा व्यंकटेश मुंडे, गणेश व्यंकटेश मुंडे सर्व राहणार धाराशिव यांना करण्यात आले वाटप

Maharashtra Live News Update :अजित दादांच्या ताफ्यासमोरच तरुणांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित दादा बीडमध्ये आहेत दादांचा ताफा ध्वजारोहणासाठी पोलीस ग्राउंडकडे जात होता‌. यादरम्यान दोन तरुणांनी अचानक ताफ्याच्या समोर येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदरील तरूण केज तालुक्यातील कुंभेफळ येथील आहेत. यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं यावेळी तरुणांनी न्याय द्या, न्याय द्या अजित दादा न्याय द्या अशा घोषणा दिल्या.

Latur : पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे हस्ते कुणबी प्रमाणपत्र वाटप

लातूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आज मराठवाडा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात हैदराबाद गॅजेट नुसार नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रच वाटप करण्यात आल आहे. तर यापुढेही कुणबी नोंद सापडलेल्या बांधवांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र मिळाल्याने पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Maharashtra Live News Update: फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ

ओबीसीवर अन्याय करू नका, असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला संभाजीनगरमध्ये आले होते. ते भाषण करण्यासाठी उभे राहिले, त्यावेळी काही लोकांनी जोरदार राडा घातला अन् घोषणाबाजी केली.

Beed : उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हुतात्मा चौकात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे या पार्श्वभूमी वरती राज्याचे मुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे आज बीडच्या हुतात्मा चौकात शहिदांना हुतात्मा चौकात अजित पवारांकडून अभिवादन मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे त्यांना अजित पवारांकडून अभिवादन करण्यात येत आहे

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरात स्वच्छता अभियान

- नागपूरातील डॅा. हेडगेवार चौकात स्वच्छता अभियान सुरु

- भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात अभियान

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्याने नागपूर शहर भाजप कडून 111 ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन

- नागपूर शहर संघटनेतील 20 मंडळ मिळून शहरातील विविध भागात 111 कार्यक्रमांचे आयोजन

- 111 ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात लाखो भाजप कार्यकर्ते होणार सहभागी

- स्वच्छता अभियान, नेत्र तपासणी, पूजा, अभिषेक, रुग्णालयात फळ वाटप सारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन

Jalgaon : जळगाव विमानतळावरून दीड वर्षांत ७३ हजार प्रवाशांचे उड्डाण

जळगाव विमानसेवेला पसंती देणाऱ्या जळगावकर प्रवाशांचा आलेख दिवसेंदिवस वाढताच आहे. प्रतिदिन सरासरी दीडशेवर प्रवासी विमान सेवेच्या माध्यमातून प्रवास करीत आहेत. एप्रिल २०२४ ते जून २०२५ या काळात ७३ हजार ५२९ प्रवाशांचे उड्डान झाले तर ७३ हजार ४३७ प्रवाशी जळगावात दाखल झाले.एप्रिल २०२४ मध्ये फ्लाय-९१ आणि जून २०२४ पासून अलायन्स एअरसह कामकाज पुन्हां सुरू झाल्यानंतर जळगाव विमानतळावरून सेवा उपलब्ध झाली आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद, गोवा आणि अहमदाबाद या शहरांसाठी सेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. या सर्वच मार्गावर प्रवाशांची ये-जा वाढत आहे.

Dharashiv : मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यु पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना प्रताप सरनाईकांकडून 25 लाखांची मदत

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिल्यानंतर लाखो मराठे मुंबईत दाखल झाले. जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआरही काढला.मात्र या आरक्षण लढ्यामध्ये पाच मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आंदोलकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरसावलेत . मुंबईतील आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयाला सरनाईकांकडून स्वखर्चाने पंचवीस लाखांची आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येक मयत आंदोलकाच्या कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला.धाराशिव इथं मदतीच वाटप करण्यात आलं.

Latur : मांजरा धरणाची चार दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सदरतेचा इशारा

मांजरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे, मागच्या तीन दिवसापासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतो आहे, दरम्यान धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने , मांजरा धरण 100 टक्के भरले आहे, तर पाण्याचे योग्य नियोजन आणि धरणाची सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने धरणाचे चार दरवाजे उघडून मांजरा नदी पात्रात 13, हजार 166 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देखील दिलाय, दरम्यान पुढील काही तास लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Latur News : शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशा ही, धुळीस मिळाल्या; लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी

लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानंतर सातत्याने अतिवृष्टी होत आहे, यंदा वेळेवर खरिपाच्या पेरण्या झाल्या तर त्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढतच गेलाय, लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने नगदी पीक म्हणून सोयाबीन, तूर, मूग उडीद मोठ्या प्रमाणात घेतली जातात, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे ही सगळी पीक अगदी बहरली होती मात्र, ऑगस्ट पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत गेला आणि काढणीला आलेले मूग आणि उडीद पिक अक्षरशः पाण्यात गेले आहे. तर पुन्हा आता मागच्या तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाचा दूर वाढल्याने सोयाबीन संपूर्णतः पाण्यात गेले आहे, त्यामुळे शेतकऱ्याची उरलीसुरली अशा ही ,आता मावळली आहे, प्रशासनाने पंचनामे करून मदतीच आश्वासन जरी दिलं असलं तरी शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे. शेतकऱ्याचा काना पूर्णतः मोडून गेलाय ,आर्थिक नियोजन कोलमडलय,त्यामुळे हताश झालेल्या जगाच्या पोशिंदाला सरकारच्या मदतीची मोठी अपेक्षा आहे.

Nagpur : शालार्थ घोटाळ्यामधील चौकशीला संशयित शिक्षक गैरहजर

- शालार्थ घोटाळ्यामधील चौकशीला संशयित शिक्षक गैरहजर... शिक्षण उपसंचालक ह्यांच्याकडून चौकशी सुरू

- ६३२ जण संशयितांच्या यादीत आहेत. शासनाने सुनावणीसाठी उपसंचालकांकडून कारवाई सुरू केली, पण संशयित शिक्षकांची चौकशी समिती समोर गौरहजेरी लावल्याचा बोललं जातं आहेय...

- पहिल्या दिवशी ५० जणांना हजर राहायचे होते, मात्र केवळ १७ जणच सुनावणीला सामोरे आले.

- रविनगर येथील डायटच्या कार्यालयात ही सुनावणी इन कॅमेरा घेण्यात येत आलीय...

- यात चौकशी करत कागदपत्र तपासताना नियुक्तीची तारीख, शिक्षण पद्धत, पगाराचे स्वरूप, पहिली शाळा आणि कार्यरत कालावधी यासंबंधी प्रश्न विचारले हे ऑन कॅमेरा घेतले जात आहेय...

- या प्रकरणात शेकडो शिक्षक आक्रमक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बनावट कागपत्राचा आधारे नोकऱ्या मिळवल्या, वेतनह लाटले, २० अधिकारी, कर्मचारी शाळा संचालकांवर गुन्हे दाखल झाले...

Jalna News : पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्हा दौऱ्यावर, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी...

जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्ह्या दौऱ्यावर आहेत. जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची त्या पाहणी करणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार घातला असून जिल्ह्यातील 15 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झालीय . या पावसामुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं असून खरिपातील सोयाबीन कपाशी यापिकासह फळबागांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

अमरावती-मुंबई-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल..नवीन वेळापत्रक प्रवाशांना दिलासा देणारे...

येत्या 7 आक्टोंबर पासून विमान हे मुंबईवरून अमरावतीसाठी 7 वाजून 5 मिनिटांनी अमरावती साठी उड्डाण घेणार...

त्यानंतर हे विमान अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर 8 वाजून 50 मिनिटांनी दाखल होईल..

आणि 9 वाजून 15 मिनिटांनी हे विमान पुन्हा अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून मुंबईसाठी उड्डाण घेईल.. त्यानंतर सकाळी 11 वाजता हे विमान मुंबईत पोहोचणार

आता आठवड्यातून तीन ऐवजी चार दिवस राहणार विमान फेरी आता रविवारीही मिळणार विमानसेवा.

Junnar- आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

जुन्नर तालुक्यातील सोनावळे येथील आदिवासी आश्रम शाळेत प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई अचानक आले. त्यांनी मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर पीडित महिला शिक्षिकेच्या वर्गात घुसून त्यांच्याकडे अश्लील नजरेने पाहत दमदाटी केली आणि त्रास दिला हा प्रकार इथेच न थांबता पीडित महिला शिक्षिकेच्या शाळेवर पुन्हा पाहणे करतेवेळी दमबाजी करून अश्लील भावनेने पाहि या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिक्षिकेने घडलेला प्रकार पोलिसांकडे नोंदवला. त्यांच्या तक्रारीनंतर प्रदीप देसाई यांच्याविरोधात विनयभंगासह संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Ambegoan - अवसरीच्या माळरानावर मुसळधार पाऊस. .

आंबेगाव तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. अशातच माळरानासह तांबडेमळा व अवसरी बुद्रुक परिसरात मुसळधार पाऊस झालाय. या मुसळधार पावसामुळे अवसरी बुद्रुक परिसरातील ओढेनाले तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षात ओढ्याला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Ambegoan-मंचरमध्ये भर पावसात काढले कोथिंबिरीचे पीक

उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सततधार पडणाऱ्या पावसामुळे शेतीकामे पूर्णपणे रखडली असली तरी आंबेगाव तालुक्याच्या अवसरी बुद्रुक गावातील शेतकरी बापू टाव्हरे यांनी भर पावसात आपल्या शेतातील कोथिंबिरीचे पीक काढले आहे.

पावसामुळे बाजारात कोथिंबिरीची आवक कमी होत असते त्यामुळे यावेळी चांगला बाजारभाव मिळत असतो. त्याचबरोबर सततच्या पडणाऱ्या पावसाने शेतात काढणीला आलेले कोथिंबिरीच्या पिकाचे नुकसान होणार याचीही भीती असते. या दोन्ही बाबींचा विचार करून या शेतकऱ्याने भर पावसात आपल्या शेतातील कोथिंबिरीचे पीक काढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com