

बाबरी की नीव जो लगाई है उसे जल्द कारसेवा कर उखाडा जायेगा.....
मुर्शिदाबाद का नाम भगीरथ धाम किया जायेगा और गर्व से जय श्रीराम कहा जायेगा.....
नवनीत राणांच्या या स्वीटने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता
नाशिक पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी...
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात नाशिक पुणे महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू...
दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा...
स्थानिक तरुणांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न...
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दूसरा टप्पा मंजूर करण्यात आला आहे.
मुंबईतील गुंदवली–अंधेरी वेस्ट मार्गावरील मेट्रो सेवा दोन्ही दिशांनी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रो किती उशिरा धावत आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
मराठी अभ्यास केंद्र तसेच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्यावतीने प्रकाशित 'पहिलीपासून हिंदी/त्रिभाषासक्तीचे महाराष्ट्रद्रोही राजकारण (२०२५)' पुस्तिकेनिमित्त कार्यवाह आनंद भंडारी हे राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. अभिनेत्री चिन्मयी सुमित देखील पोहोचल्या.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना पुण्यात होणार
२०२५-२६ मधील सुपर लीग टप्पा आणि अंतिम सामना आता पुण्यात आयोजित करण्यात येणार
इंदोर येथे होणाऱ्या एका परिषदेच्या कारणास्तव तसेच हॉटेल उपलब्धतेच्या अडचणीमुळे हे सामने पुण्यात हलविण्याचा बीसीसीआयचा निर्णय
मालेगावात स्थानिक गुन्हे शाखा आणि महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने तीन आधार केंद्रांवर मोठी कारवाई..
एकाच वेळी घेतलेल्या या धडक कारवाईत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
परदेशी नागरिकांचे आधार कार्ड बनवल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई.
कोल्हापूर : जयसिंगपूर शहरात भर दिवसा चाकू हल्ल्याचा थरार
काल दुपारी भरदिवसा जयसिंगपूर बाजारपेठेत एकाने दोघांवर केला चाकू हल्ला
संशयीत तरुण पुंडलिक गाडीवडर याने केला शाहरुख मुजावर आणि आकाश नलवडे या तरुणांवर चाकूने हल्ला
किरकोळ वादावादी आणि चाकू हल्ला होत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कैद
नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी आणि झळकवाडी या गावच्या जंगलालगतच्या शेतीत इस्लापूर पोलिसांनी धाड टाकून गांजा जप्त केला.तुरीच्या शेतात गांजाची लागवड केली होती.40 ते 45 किलोपर्यंतची गांजाची झाडे उपटून पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणात एका नागरिकाला ताब्यात घेण्यात आले असून कारवाई सुरू आहे. गुप्त माहितीनुसार झालेल्या या कारवाईत हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत, इस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले, पोलिस कर्मचारी, महसूल विभाग आणि नांदेड येथील फॉरेन्सिक पथक सहभागी झाले.
मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली सरप्राईज भेट
शताब्दी रुग्णालयाचा दुरावस्था पाहून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आक्रमक
मंत्री गोयल यांचा थेट पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना फोन
शताब्दी रुग्णालयामध्ये साफसफाई करणारा जुना कॉन्ट्रॅक्टर ला तात्काळ बदला- पियुष गोयल यांचे आदेश
शताब्दी रुग्णालयामध्ये स्वच्छतेचं कंत्राट असणाऱ्या कंत्राटदाराला बदला.
सात दिवसात रुग्णालयाची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करा.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शताब्दी रुग्णालयातून केला पालिका आयुक्तांना केला फोन
पालिका आयुक्तांना पियुष गोयल यांच्याकडून सात दिवसाचा अल्टिमेटम
पुढचा रविवारी पुन्हा हॉस्पिटलमध्ये पाहणी साठी येणार आहे त्यावेळी शताब्दी हॉस्पिटल चांगला सॅनिटायझेशन हवा - पियुष गोयल
- ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर गणवेशधारी खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे.
- जळगावच्या भडगाव आणि पाचोरा या दोघेही ठिकाणी ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर खाजगी सुरक्षा रक्षकांचे कवच तैनात आहे.
- शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर गणवेश धारी खाजगी सुरक्षा रक्षक नेमले आहे.
- पाचोरा आणि भडगाव या दोघेही ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला आहे.
- सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेर खाजगी सुरक्षा रक्षक नेमल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
किल्ले रायगडावरील रोप वेच्या वरील स्टेशनला ऐतिहासिक राजवाड्याचा लुक देण्यात आला आहे. त्याला रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी आक्षेप घेतलाय. याबाबत त्यांनी सोशल मिडिया वर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. किल्ले रायगडावरील अनेक वास्तू आज भग्नावस्थेत आहेत त्यांचे संवर्धन करताना पुरातत्व विभाग आडकाठी आणते. रायगड विकास प्राधिकरणाला नियमांच्या चौकटी घालते.असं असताना रोप वे कंपनीच्या बांधकामाला कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल संभाजी राजे छत्रपती यांनी उपस्थित केलाय. यामुळे किल्ले रायगडला मिळालेले युनेस्कोचे नामांकन धोक्यात येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. हा व्यावसायिक अतिक्रमण वाद सहन केला जाणार नाही असा इशारा, संभाजी राजे छत्रपती यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमधून दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात नागपूर विमानतळावर पोहचतील
विमानतळावर स्वागतासाठी कार्यकर्ते पोहचले, ढोल ताशाचा गजरात स्वागत करतील...
ढोल वाजवत केलं जाणार स्वागत ...
लातूरच्या निलंगा शहरातील हाडगा नाका येथे भर दिवसा एकावर धारदार कत्तीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे, या हल्ल्यात जगदीश लोभे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा हल्ला जागेच्या वादावरून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे,तर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा तपास सध्या पोलीस घेत आहेत. दरम्यान भरदिवसा शहरातील अतिशय वरदळीच्या ठिकाणी रक्तरंजित घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीच वातावरण पसरलं होतं.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न राजकीय फडात रंगतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितं वेगळी असतात त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येतील असा छुपा सूर दोन्ही पक्षातील नेत्यांकडून ऐकायला मिळतोय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का नाही हा निर्णय येण्यापूर्वीच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधील सचिन दोडके भाजप मध्ये जाण्यासाठी आग्रही आहेत की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचं कारण म्हणजे दोडके यांचे भाजप मध्ये प्रवेश बाबत चे प्रमुख रस्त्यावर लागलेले फ्लेक्स. "मी येतोय जनतेच्या आग्रहासाठी खडकवासल्याच्या जनतेच्या सेवेसाठी" अशा मजकुराचे ज्यावर सचिन दोडके यांचे फ्लेक्स पुण्यातील वारजे भागात पाहायला मिळाले.
- मुंबई पुणे वरून येणारी अनेक उड्डाण रद्द केली आहे.
- त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे.
पुरुषांचा पारंपरिक खेळ समजल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीत मुलींच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.. अहिल्यानगरच्या लोणी गावातील म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत मुलींचा सहभाग बघायला मिळाला.. आत्मविश्वास, कौशल्य आणि धैर्य यांच्या जोरावर मुलींनी प्रभावी कामगिरी करत अनेकांना थक्क केले.. केवळ सहभागच नव्हे तर उत्कृष्ट प्रदर्शन करत मुलींनी पारितोषिके जिंकत, आम्हीही कुठे कमी नाही हे दाखवून दिले..
नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात आज अचानक आग लागल्याची घटना घडली. आग वेळेत आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत यूपीएससह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून नुकसान झाले असून, विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल आहे.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीने पुन्हा राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. हिवाळी अधिवेशनाआधी विदर्भातील विकास, ड्रग्जचा विळखा, तपोवन झाडतोड आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची ठाम मागणी केली आहे. - विजय वडेट्टीवार
पुण्यातील भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर प्रदीप गारटकर मुरलीधर मोहोळ यांच्या भेटीला
गारटकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गारटकर यांनी दिला होता राजीनामा
गारटकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
गारटकर करणार भाजप मध्ये प्रवेश?
सचिन दोडके यांच्यामुळे भाजप मध्ये अंतर्गत कलह?
दोडके यांचे भाजप प्रवेशाचे लागले फ्लेक्स
दोडकेंमुळे पुण्यातील भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत वाद, सूत्रांची माहिती
खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्यात शाब्दिक चकमक
राष्ट्रवादीचे सचिन दोडके यांच्या पक्ष प्रवेशावरून वाद झाल्याची माहिती
वारजे मधील नगरसेवक सचिन दोडके हे भाजप प्रवेशावरून वाद झाल्याची माहिती
भीमराव तापकीर यांचा या पक्ष प्रवेशाला विरोध असल्याची माहिती
आंबेगाव तालुक्यातील वडगाव येथिल एका घराच्या CCTV कॅमेऱ्यात बिबट्या सकाळी घरा समोरून जात असताणी कैद झाला आहे यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले असून या बिबट्यांना जेरबंद करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत, आशा पध्दतीने बिबटे दिवसा फिरू लागले तर घरा बाहेर कसे पडायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भरधाव वेगात असलेल्या दुचाकी चालकाने दिली बेस्ट बसला धडक,
दुचाकी चालकाने बेस्ट बसला समोरून दिली जोरदार धडक
धडकेत दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू
मृत तरुणांच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यासाठी पार्थिव विले पार्लेच्या कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले
मुलुंड ते गोराई मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक 460 चे अपघातात मोठे नुकसान
आरे पोलीस ठाणे परिसरात मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी
डोंबिवलीतील दीनदयाल रोड परिसरात एका बांधकाम साईटवर, जेवण सांडण्याच्या किरकोळ कारणावरून मजुरांमध्ये वाद झाला. या वादानंतर सर्व मजूर झोपले असताना संतापलेल्या जयसान मांझी या मजुराने बांबूने मारून गौरव जगत या मजुराची हत्या केली. विष्णू नगर पोलिसांनी आरोपी जयसान मांझी याला अटक केली आहे. हे दोघे ही मजूर मूळचे ओडीसा येथील राहणार आहेत .या घटनेमुळे डोंबिवली शहरात एकच खळबळ उडाली आहे
इंडिगो विमान सेवेचा फटका आता राज्यातील अनेक आमदारांना पण बसलेला पाहायला मिळतोय.. उद्यापासून नागपूर आत राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून राज्यभरातील सर्वपक्षीय आमदारांना आज नागपूरला पोहोचायचं आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून इंडिगो या विमान कंपनीचा झालेला गोंधळ आणि इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने आता अनेक आमदारांची तिकिटं रद्द झालेली पाहायला मिळत आहेत.. त्यातच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील ज्या आमदारांना नागपूरला पोहोचायचं आहे त्या आमदारांनी आता थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चार्टर्ड विमानाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.. चंद्रकांत पाटील आज दुपारी चार्ट विमानाने पुण्याहून नागपूरला रवाना होणार आहेत
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील सौर उर्जा प्रकल्पसाठी गावातील गायरान मधील 19 एकर जमीन अधिग्रहण करण्यात आली. यामध्ये संबंधित कंपनी व प्रशासनातील अधिकारी यांनी संगनमताने ही जागा चुकीच्या पद्धतीने हडप केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीने सुचविलेले जागेत हा प्रकल्प उभा करण्यास नकार देत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महिलांनी आणि ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
लातूर - चाकूर तालुक्यातील कलकोटी येथे मनरेगाची कामे प्रत्यक्षात न करता निधी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या भ्रष्ट प्रकरणाची चौकशी वरिष्ठ समितीने जिओटॅग लावून केल्याने केवळ एकच गोटासमोर आलाय तर 41 गोट्याचा निधी काम न करता हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेषता ज्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यातील अनेक लाभार्थी हे शासकीय सेवेत कर्मचारी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे., दरम्यान या भ्रष्ट कारभारामुळे शासकीय निधीवर डल्ला मारणाऱ्या अधिकारी कर्मचारी तसेच बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अंगावर शेड आणि भिंत पडून एका निष्काप कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातील J ब्लॉक येथील प्लॉट नंबर 485 या ठिकाणी काल संध्याकाळ दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत मारुती भालेवार भालेराव वय अंदाजे 30 ते 35 वर्षे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
लातूरच्या किल्लारी येथील नीलकंठेश्वर साखर कारखाना निर्विघ्नपणे सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात गाळपाची प्रक्रिया सुरू झाली आहे, मागच्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत धुळखात पडलेला कारखाना सुरळीत चालत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आल्याने , आमदार अभिमन्यू पवार यांनी किल्लारी येथील निळकंठेश्वर मंदिरापर्यंत दंडवत घालत नवस्फूर्ती केली आहे., एकूण 3 किलोमीटर पर्यंत दंडवत घालत, अभिमन्यू पवार यांनी नवस पूर्ण केलाय यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि कुटुंबीय उपस्थित होते.
:केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत पाञ शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात 6 हजार रुपयांचा निधी मिळतो माञ 20 वा हप्ता दिल्यानंतर लागु करण्यात आलेल्या काटेकोर निकषामुळे धाराशिव जिल्ह्यात 2 हजार 588 शेतकरी अपाञ ठरले आहेत.प्रामुख्याने ई केवायसी प्रक्रीया अपुर्ण ठेवल्याने,तसेच बॅंक खाते आधार कार्डशी व जोडल्याने व कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ घेतल्यामुळे ही लाभार्थी संख्या कमी झाली आहे.
अहिल्यानगर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील तब्बल ४३८१ नावे समाविष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे तसेच या संदर्भात लेखी हरकतही नोंदवली आहे. ही सर्व नावे श्रीगोंदाच्या मांडवगण जिल्हा परिषद गटातील असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र महापालिका प्रशासन सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली काम करत असून जर या नावांबाबत अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही तर भविष्यात न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितले आहे.
: वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 24व्या कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याच कार्यक्रमात जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका करत, पालिकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘पानिपत’ होणार, असा दावा केला आहे.
वसई विरार शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. यामुळे पालिकेच्या निवडणुकीत नवनिर्माण सेनेची ताकद सर्व राजकीय पक्षांना कळेल. भारतीय जनता पक्ष हा अतिशय हुशार पक्ष आहे. जिथे त्यांची स्वतःची ताकद आहे. तिथे ते युती करत नाही. ठाणे, मुंबई, नवी मुंबई त्यांची युती नाही. मात्र वसई विरार मध्ये युती करतात म्हणजे त्यांची ताकद नाही.
नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून या मतदान प्रक्रियेत बुलढाण्यात हजारो मतदान हे बोगस झाल्याचा आरोप अड सतीश चंद्र रोठे यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे .. या बोगस मतदानाची एस आय टी चौकशी व्हावी अशी मागणी लेखी पत्रा द्वारे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.... तसेच मतदानाचा निकाल 21 डिसेंबर ला लागणार असल्याने ई व्ही एम मशीन नगर पालिका कार्यालयाच्या हॉल मध्ये ठेवण्यात आल्या असून तिथे घोळ होऊ शकतो म्हणून अड सतीश चंद्र रोठे यांनी रात्रीचा मुक्काम देत पहारा देणे सुरु केले आहे.. दोन दिवसापासून हा कडक पहारा देणे सुरु असून तो 20 डिसेंबर पर्यंत सतत राहणार असल्याचे रोठे यांनी सांगितले आहे
यवतमाळ नगर पालिकेची निवडणूक येत्या वीस डिसेंबर रोजी होऊ घातली आहे.नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात नऊ उमेदवार असून नामांकन मागे घेण्यासाठी चार दिवसाचा कालावधीत उरलाय.या निवडणुकीत मंत्री संजय राठोड,मंत्री इंद्रनील नाईक,खासदार संजय देशमुख,मंत्री अशोक उईक,माजीमंत्री शिवाजीराव मोघे आणि भाजपाचे नेते मदन येरावार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
इंडिगो विमान सेवेचा आमदारांना पण फटका बसला आहे. इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने अनेक आमदारांची तिकिटं रद्द झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक आमदारांची तिकिटं रद्द झाली.
अनेक आमदारांनी आज दुपारच्या विमानाचे तिकीट काढले होते पण विमानं रद्द झाल्याने अनेक आमदारांनी स्वःच्या मोटारीने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपूर मध्ये सुरवात होणार आहे. राज्याचे मंत्रिमंडळ आज नागपूरमध्ये होणार दाखल
डिसेंबरच्या थंडीचा जोर जाणवू लागला आहे.तापमानात जवळपास दोन अंशाने घट झाली आहे.परिणामी यवतमाळ जिल्ह्यात दिवसाही हुडहुडी भरवणारे थंडगार वारे वाहत आहे.यामुळे घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे तर नागरिकांसह महिला शेकोट्या जवळ बसून उब घेतांना दिसताहेत.जिल्ह्यात पारा 10 अंशावर स्थिरावलाय.
माझा पंढरपुरात पराभव झाला तर पुन्हा मंगळवेढ्यात तोंड दाखवणार नाही,तुमचा पराभव झाला तर तुम्ही तोंड दाखवायचं नाही असं खुल आव्हान पंढरपुरातील भगीरथ भालके यांनी दिले आहे.
मंगळवेढा नगरपालिका निवडणूक प्रचार सभेत बोलताना भालके यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर हल्लाबोल केला. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मंगळवेढा येथे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा दावा केला होता. त्यानंतर भगीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सभेत परिचारकांच्या दाव्याला थेट आव्हान दिले आहे.
तीन दिवस रद्द राहिलेल्या इंडिगोच्या सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेतील मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई विमानांचे शनिवारी उड्डाण झाले. त्यामुळे मुंबई विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु मुंबईच्या प्रवासी संख्येत काहीशी घट झाली. दुसरीकडे दिल्ली विमानाला दीड तास विलंब झाला. इंडिगोचे रात्रीचे मुंबई विमान २ डिसेंबर रोजी अचानक रद्द करण्यात आले होते. त्यानंतर ३ ते ५ डिसेंबरदरम्यान मुंबईचे सकाळच्या आणि रात्रीच्या वेळेतील दोन्ही विमाने रद्द झाली. शुक्रवारी मुंबईसह दिल्लीचेही विमान रद्द झाले. परिणामी, प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शनिवारी तीन दिवसांनंतर सकाळ आणि रात्रीच्या मुंबई विमानाने उड्डाण केले. रात्रीच्या मुंबई छत्रपती संभाजीनगर विमानाने जवळपास पाऊण तास उशिराने मुंबईहून रात्री ८:१५ वाजता 'टेकऑफ' घेतले.
नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून खून करण्यात आलेल्या सक्षम ताटे प्रकरणात अटक असलेल्या चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावन्यात आली.नव्याने अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली .. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे या तरुणाचा खून करण्यात आला.याप्रकरणी इतवारा पोलिसांनी त्याच रात्री सक्षम ताटे याच्या प्रेयसीच्या आई-वडिलांसह , दोन भावाना अटक केली होती.आता पर्यंत या खून प्रकरणात एकूण आठ आरोपी अटक करण्यात आले. आरोपींना वेळोवेळी पोलिसांनी न्यायालयात हजर केले .. आज चार आरोपींना न्यायालयाने , न्यायालयीन कोठडी सुनावली.त्यात आँचलचे वडील गजानन मामीलवार , मोठा भाऊ साहिल मामीडवार , सोमेश लाखे , वेदांत कुदळेकर या चार जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.या चार जनांसह आँचलची आई, आणि अल्पवयीन भाऊ यांना देखील 28 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. आँचलची आई जयश्री मामीडवार हिला तीन दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आंचलच्या अल्पवयीन भावाला सुधारगृहात पाठवण्यात आले.नव्याने अटक करण्यात आलेल्या अमन शिरसे याला आणि आदित्य सोमनकर या दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पुणे विमानतळावरून काल दिवसभरात 69 विमानाचे उड्डाणे रद्द
सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना विमानसेवेचा बसला फटका
पुणे विमानतळावर काल दिवसभरात 22 विमानांचे आगमन तर 25 विमानांचे उड्डाणे झाले
इंडिगो चे आगमन होणारी ३४ तर उड्डाणे घेणारे ३५ अशी एकूण ६९ विमाने काल रद्द
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.