>> सचिन कदम
Raigad Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. इको कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली आहे.
इको कार आणि ट्रक यांची समोरसमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रकमधील टक्कर एवढी जोरदार होती की इको कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येऊन इको कार वर धडकल्याने हा अपघात झाला.
सर्व जण गुहागर तालुक्यातील हेदवी येथे आजीच्या उत्तरकार्याला जात होते. सर्वांनी पहाटे मुंबईहून प्रवास सुरु केला, मात्र माणगाव तालुक्यातील रेपोली येथे ट्रकची समोरा समोर धडक झाली. मुंबईहून आजीच्या उत्तरकार्याला येणाऱ्या जाधव आणि सावंत कुटुंबावर अशा प्रकारे काळाने घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांसह बचावकार्य सुरु केलं. इको कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाल्याने बचावकार्यातही अडचण येत होती. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरूषांचा तसेच एका लहान मुलाचा समावेश आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.