भाजपच्या प्रवक्त्या म्हणून काम केलेल्या आरती साठेंची उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती म्हणून निवड झाली आणि वादाची ठिणगी पडलीय... तर न्यायव्यवस्थेतील राजकीय नियुक्ती चुकीची असल्याचं सांगत रोहित पवारांनी आरती साठेंच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय...
तर न्यायव्यवस्थेतील राजकीय नियुक्तीमुळे न्याय मिळणं दुर्मिळ होण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केलीय.. खरंतर सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने 28 जुलैच्या प्रस्तावानुसार आरती साठे, अजित कडेठाणकर आणि सुशील घोडेश्वर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केलीय... त्यावरुन वाद उफाळून आलाय..मात्र भाजपने विरोधकांचा दावा फेटाळून लावलाय...
आरती साठेंनी 2024 मध्ये भाजपचा राजीनामा दिला असला तरी भाजप प्रवक्तेपदाचा त्यांच्यावर शिक्का बसलाय... त्यामुळे आता उद्भवलेल्या वादानंतर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भुषण गवई आरती साठेंच्या नियुक्तीवर फेरविचार करणार की केलेली नियुक्ती कायम ठेवणार? याचीच उत्सुकता आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.