Maharashtra Live News Update: सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Ratnagiri: सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान

रत्नागिरी - सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग

कापलेले भात भिजून गेले काही तर तर काही ठिकाणी भात पीक पूर्णपणे आडवे

कृषी विभागाकडून सध्या पंचनामे सुरु

जिल्ह्यात जवळपास 4 हजार हून अधिक शेतक-यांच 772 हेक्टरवरील क्षेत्राचं भात पिकाचा नुकसान

65 लाखाहून अधिकच नुकसान

अजुनही 10 हेक्टरवरील भातकापणी शिल्लक

Nandurbar: शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार आमश्या पाडवी शेतकऱ्यांचा बांधावर

शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार आमश्या पाडवी शेतकऱ्यांचा बांधावर...

अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदारांनी केली पाहणी.....

गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यात शेती पिकाच प्रचंड नुकसान.....

सोयाबीन ,उडीद, ज्वारी यासह मका पिकाच मोठा नुकसान....

नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत तात्काळ पंचनामे करण्याचे आमदार आमश्या पाडवी यांनी दिलेले आदेश...

पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

खड्ड्यामुळे दुचाकीस्वार घसरला, महिला जखमी

पुणे-बेंगळुरू महामार्गावर खड्ड्यामुळे दुचाकी घसरून चालक आणि मागे बसलेली महिला खाली पडल्याने भीषण अपघात घडला

या अपघातात दोघेही जखमी झाले असून, मागून येणाऱ्या वाहनाच्या डॅशकॅममध्ये संपूर्ण घटना कैद झाली

हा सगळा प्रकार १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडला

Bhandup: कन्या सेरेना मस्कर हिने युथ एशियाई कबड्डी स्पर्धेत मिळवले गोल्ड मेडल

भांडुप ची कन्या १५ वर्षी सेरेना मस्कर हिने भारताचे नेतृत्व करत युथ एशियाई कबड्डी स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल हासिल केले नंतर तिचे भांडुप मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले तिचे आता सर्व स्तरावर स्वागत केले जात आहे त्यात महत्त्वाचे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा केली आणि पुढील वाटचालीसाठी सेरेना मस्कर हिला शुभेच्छा दिल्या.

शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमाफी केली पाहिजे -उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांची मागणी आहे कर्जमाफी केली पाहिजे

केंद्राचे पाहणी पथक येणार आहे

दोन तीन दिवसात हे पथक पाहणी करमत कशी मराठवाड्याची

अमित शहा म्हणाले प्रस्ताव पाठवा.....मला नाही वाटत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला असेल

कर्जमाफी पुढच्या वर्षी करणार असं सांगितलं आहे...

कर्ज माफी केली तर बँकांचा फायदा होईल असं मुख्यमंत्री अतर्क्य वाक्य म्हणाले

आता कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल अन् पुढच्या वर्षी जून महिन्यात केल्यावर बँकांना कसा फायदा होणार नाही....हे त्यांनाच माहिती.... कारण त्यांना वाटतं की ते चांगले अर्थतज्ज्ञ आहेत

केंद्राचे पाहणी पथक येणार आहे

दोन तीन दिवसात हे पथक पाहणी करमत कशी मराठवाड्याची

अमित शहा म्हणाले प्रस्ताव पाठवा.....मला नाही वाटत राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला असेल

कर्जमाफी पुढच्या वर्षी करणार असं सांगितलं आहे...

कर्ज माफी केली तर बँकांचा फायदा होईल असं मुख्यमंत्री अतर्क्य वाक्य म्हणाले

आता कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल अन् पुढच्या वर्षी जून महिन्यात केल्यावर बँकांना कसा फायदा होणार नाही....हे त्यांनाच माहिती.... कारण त्यांना वाटतं की ते चांगले अर्थतज्ज्ञ आहेत - उद्धव ठाकरे

छत्रपती संभाजीनगरमधील निवासी डॉक्टरांकडून संप

छत्रपती संभाजीनगरमधील 800 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर आजपासून संपावर आहेत. या संपाचा रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे. अत्यावश्यक सेवा देणार अशी भूमिका या डॉक्टरांनी घेतली आहे. त्यामुळे OPD सेवेवर परिणाम जाणवणार आहे.

'सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे' - उद्धव ठाकरे

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरावे की नाही?

कर्जमुक्ती झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची मागणी.

महात्मा फुले कृषी कर्जमाफीनुसार तुम्हीही कर्जमाफी करा.

सगळी आकडेवारी उपलब्ध, अभ्यास करत बसू नका.

हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत ही शेतकऱ्यांची मागणी. -उद्धव ठाकरे.

अमरावतीत काँग्रेसचं जवाब दो आंदोलन

अमरावती शहरात साफसफाईचा बोजवारा उडाल्याने आणि उच्च न्यायालयाने आदेश देऊनही ठेकेदारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर अमरावती काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन...

यावेळी भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार विरोधात तसेच अमरावती मनपातील कचरा माफिया यांच्या विरोधात भव्य जवाब दो आंदोलन...

महिला विश्वचषक विजयानंतर सांगलीत जल्लोष.

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीत जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून प्रथमच विश्वचषक जिंकला. या संघाची उपकर्णधार स्मृती मानधना ही मूळची सांगलीची आहे. तिच्या अप्रतिम कामगिरीमुळे सांगलीकरांनी आनंद व्यक्त केला. शहरातील मारुती चौक येथे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी नागरिकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. हा विजय सांगलीकरांसाठी अभिमानास्पद क्षण कारण स्मृती मानधनाचे क्रिकेटचे प्रशिक्षण सांगलीतच झाले त्यामुळे सांगलीकरांनी मोठा जल्लोष साजरा केला.

राज ठाकरे व्होट जिहाद करतायेत - आशिष शेलार

महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात त्यांनी सत्ताधारी आणि मतदारयादींविरोधात गंभीर आरोप केले. याच आरोपांना भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं आहे.

'दिल्ली ते गल्लीपर्यंत पप्पूला बेनकाब करणार'.

'जे सत्य आहे ते मांडणार'. - आशिष शेलार.

शेलारांकडून राज ठाकरेंचा दावा खोडण्याचा प्रयत्न.

राज ठाकरेंनी व्होट जिहाद करू नये - शेलार.

निवडणुका याद्या स्वच्छ झाल्या पाहिजे, आमची देखील तीच भूमिका - आशिष शेलार.

Pune: पुण्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय महिला एकटवल्या

पुण्यातील गुडलक चौकात आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या रूपाली ठोंबरे, ठाकरे गटाच्या रेखा कोंडे आणि संगीता तिवारी यांनी चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं.. फलटण मध्ये झालेल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्यानंतर रूपाली चाकणकर यांनी वादग्रस्त शब्द वापरले असा आरोप करत रूपाली चाकणकर यांच्या विरोधात या महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.. यानंतर रूपाली चाकणकर यांना या पदावर राहायचा अधिकार नाही म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत रूपाली चाकणकर यांच्या विरोधात वेगवेगळे पोस्टर दाखवत आणि घोषणाबाजी करत या महिलांनी आंदोलन केलं... यावेळी रूपाली चाकणकर यांच्या फोटोला जोडे मारत त्यांचा मेकअप केलेला फोटो असलेल्या पोस्टर जमिनीवर टाकत या महिलांनी निषेध केला.

Yavatmal: यवतमाळमध्ये तुळशीचा विवाह उत्साहात साजरा

तुळशीचा विवाह हे धर्म,निसर्ग आणि भक्ती याचा संगम मानला जातो.यानंतर खऱ्या अर्थाने लग्नसराईचा हंगाम सुरू होतो.अशात यवतमाळच्या आर्णी येथील शास्त्री नगरातील दुर्गा मंदीरात तुळशी विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला.यावेळी वराती म्हणून भजनी मंडळाच्या महीला पुरुषगण ऊपस्थीतीत होते तर मंगलआष्टकांनी तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला तूळशी विवाह संपन्न झाल्यावर डफडी वाजवत फटक्याची आतिषबाजी सुध्दा करण्यात आली यावेळी तुळशीला नवरी प्रमाणे नऊवारी साडीने सौ,रेखा आत्माराम जारंडे ह्यानी लक्षवेधी सजविले होते.

Pune Live News Update: महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. रूपाली ठोंबरे, संगीता तिवारी यांच्याकडून चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. फलटणच्या डॉ आत्महत्या प्रकरणात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील 800 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर आजपासून संपावर आहेत. या संपाचा रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे. अत्यावश्यक सेवा देणार अशी भूमिका या डॉक्टरांनी घेतली आहे. त्यामुळे OPD सेवेवर परिणाम जाणवणार आहे.

Nashik News : बनावट नोटा प्रकरणात तिसरा संशयित ताब्यात

पाचशे रुपयांच्या बनावट नोटाप्रकरणी नाशिकच्या मालेगाव तालुका पोलिसांनी शहरातून तोसिफ मोहम्मद अक्रम या तिसऱ्या संशयितास ताब्यात घेतले आहे..अटकेतील दोघा संशयितांनी त्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा दिल्या होत्या,या नोटा चलनात आणल्याचा पोलिसांना संशय आहे..दरम्यान यातील मुख्य संशयित मोहंमद जुबेर मोहंमद अश्रफ अन्सारी याच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील घरावर मालेगाव पोलिसांच्या मदतीने तेथील स्थानिक पोलिसांनी रविवारी ( दि.२ ) छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे..छाप्यात पोलिसांच्या हाती काय लागले याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, मालेगाव पोलिसांनी कारवाई केल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे..

Nashik-Chandvad-कांदा शेतात सडू लागला

गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा मात्र हवालदिल झालेला आहे. कांदा पिकावर करपा व मावा रोग पडल्याने नवीन लागवड केलेला कांदा देखील सडू लागला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

परतीच्या पावसानं भातपीक शेतीसह फळबाग आणि फुलशेतीलाही फटका

मधील सहा दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वदूर परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका भातपीक शेतीला बसला आहे. भातपीक शेतीसह भंडाऱ्यात बागायत शेती करणाऱ्या फळबागायतदार आणि फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा चांगलाचं फटका बसला. या परतीच्या पावसामुळं झाडाला लागलेले पेरू आणि फुल काळवंटली असून ते खराब झाल्यानं बाजारात विक्री होणार नसल्यानं याचा आर्थिक फटका बागायतदार शेतकऱ्यांना बसला आहे.

वाशिम पोलिसाची अशी ही मद

वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला हैदराबाद या महामार्गावर रात्रीच्या दरम्यान रस्ता पार करतांना कासवाच्या अंगावरून वाहन गेल्याने कासव जखमी झाले होते. वाशिम शहरचे पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करताना नागरिकांनी तो कासव पोलिसांच्या हवाली केला. पोलिसांनी रात्रीच या कासवावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय केंद्र गाठले मात्र, रात्री रुग्णालय बंद असल्याने रात्रभर या कासवाची काळजी घेत सकाळी कासवाला उपचारासाठी दाखल करत, उपचार झाल्यावर या कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचा मानस पोलिसांनी व्यक्त केला.

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मुर्तीजापूर रोडवर भरधाव कारने समोरील दुचाकीस जबर धडक देऊन झालेल्या भिषण अपघातात दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला आहे. घर बांधकाम मजूर गौतम अणा मोहोड, कैलास एकनाथ पेठकर असे मुतकाचे नावे आहेत‌. घटनेच्या वेळी दर्यापूर येथून राजकाम आटोपून दोघे ही गावी जात होते. दरम्यान दर्यापूर-मुर्तीजापूर रोडवरील समोरून येणाऱ्या भरधाव कार समोरासमोर जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात दुचाकी चालक गौतम मोहोड व सहकारी कैलास पेठकर यांना डोक्याला व ईतर ठिकाणी जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यूं झाला. माहीती मीळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीसांनी दोन्ही मुतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात ठेवले आहे.

पुणे महापालिकेच्या मतदार याद्यांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय

प्रभागनिहाय मतदार याद्यांतील अनियमितता च्या तक्रारींनंतर पुणे महापालिका प्रशासनाने या याद्यांची फेरपडताळणी करण्याचा निर्णय

झालेल्या गोंधळाची गंभीर दखल घेत निवडणूक विभागाने नुकतेच आदेश जारी केले असून, सहाय्यक आयुक्तांकडे या कामाची जबाबदारी

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने प्रभागानुसार मतदार याद्यांचे विभाजन सुरू केले होते

मात्र, या प्रक्रियेदरम्यान काही इच्छुकांनी अनधिकृत हस्तक्षेप करून त्यांना प्रतिकूल असणाऱ्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात हलवण्याचे, तसेच अनुकूल मतदारांचे नावे स्वतःच्या प्रभागात आणण्याचे प्रकार समोर आले

मोताळा तालुक्या तील लिहा बुद्रुक गावाला अतिवृष्टीचा फटका...

बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून पाऊस कोसळत आहे तर रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी झाली.. त्याचा फटका जिल्हतातील शेतकऱ्यांना बसलाय.. नदीकाठच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, लिहा बुद्रुक या गावातील शेतकरी हतबल झाला आहे.. गावा शेजारी असलेल्या नदीला पूर आला आणी त्या पुरामुळे शेताला तलावाचे स्वरूप आले आहे.. शेतातील मका पिक वाहून गेले आहे आणी शेतात दोन ते तीन फुट पाणी साचल्याने होत्याच नव्हतं झालाय त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ आर्थिक नुकसान झाल आहे.

खेडशीत बिबट्याची दहशत

रत्नागिरी नजिकच्या खेडशीतील डफळचोळवाडी परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या पुन्हा एकदा खुलेआम वाडीत फिरताना ग्रामस्थांनी पाहिला. बिबट्याची ही दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच ग्रामस्थांच्या मोबाईलमध्ये चित्रीत झाली आहेत.. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, केवळ दोन दिवसांपूर्वी याच बिबट्याने एका ग्रामस्थाच्या दारातून कुत्रा उचलून नेल्याची घटना घडली होती. डफळचोळवाडी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा सातत्याने वावर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या थेट वस्तीत येत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. सहा महिने बिबट्याचा वावर असताना आणि ग्रामस्थ वारंवार तक्रारी करत असतानाही वनविभागाने या समस्येकडे पूर्णपणे डोळेझाक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या बिबट्याला त्वरित पकडून सुरक्षित स्थळी सोडावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

भंडाऱ्याच्या आष्टीत पंचायत समितीच्या माजी उपसभापतीनं एकावर ताणली बंदूक

भंडाऱ्याच्या लोभी गावात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगानं शिंदे सेनेचे स्थानिक नेते ठाकचंद मुंगुसमारे आणि काही शेतकरी मध्यप्रदेशातून आलेल्या महाराजांसोबत आष्टी गावातील एका धान गोडाऊनमध्ये बसून चर्चा करीत होते. यावेळी तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिशुपाल गौपाले हे तिथं पोहचलेत आणि त्यांनी उपस्थितांशी वाद घालून एकावर बंदूक ताणली. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील आष्टी गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अजय गहाणे यांच्या तक्रारीवरून गोबरवाही पोलिसांनी शिशुपाल गौपाले याचे विरोधात गुन्हा दाखल करत धमकावण्यासाठी वापरलेली बंदूक आणि बलेनो कार पोलिसांनी ताब्यात घेत शिशुपाल गौपाले याला अटक केली आहे. या घटनेनं भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पुढील अनेक पिढ्यांसाठी तुम्ही प्रेरणास्रोत आहात! तुमच्या निर्भीड क्रिकेटने आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत असलेल्या विश्वासाने तुम्ही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम केलं आहे. तुम्ही सर्व कौतुकास पात्र आहात आणि या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या! उत्कृष्ट कामगिरी, हरमन आणि संपूर्ण टीमला!
विराट कोहली

यवतमाळच्या एसटी भागाच्या तिजोरीत पाच कोटीने भर

दिवाळीची गर्दी कॅश करण्यात एसटीचा यवतमाळ विभाग यशस्वी झाला असून केवळ नऊ दिवसात चार कोटी 99 लाख 32 हजार 527 रुपयाची कमाई यवतमाळ एसटी विभागाने केली. एसटी बसेस खचाखच भरून जात असतानाही नागरिकांनी लालपरीलाच पसंती दिली.23 ते 31 ऑक्टोंबर या काळात यवतमाळ विभागातील सर्व नऊही आगारांनी महामंडळाला अधिक प्रवासी मिळावी याकरिता प्रयत्न केले त्याची फलश्रुती चांगली कमाई होण्यात झाली.

भारताचा महिला संघाने दक्षिण आफ्रिकावर दणदणीत विजयउलवल्यानंतर नागपूरकरांनी जल्लोष केला

नवी मुंबईत झालेल्या वर्ल्ड कपच्या रोमांचक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकाचा धुव्वा उडवला आणि विजयाचा झेंडा फडकावला. या ऐतिहासिक विजयाची आनंदलहरी नागपूरात ही पोहोचल्या आणि पावसाचे वातावरण असताना ही नागपूरच्या धरमपेठ परिसरातील लक्ष्मीभुवन चौकात तरुणाई ने जल्लोषात फटाके फोडले, तिरंगा लहरवला आणि "भारत माता की जय" तसेच "वंदे मातरम"च्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला.....

PUNE | नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी

जांबूत, पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी

डॉ अमोल कोल्हे यांचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र

पिंपरखेड येथे रोहन विलास बोंबे या १० वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वनविभागाचे वाहन आणि कार्यालय पेटविले

या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यासाठी एलिमिनेशन ऑर्डर काढण्यासाठी  चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, राज्य सरकार तसेच संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी केली

NAGPUR | निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता 

- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ८ डिसेंबरपासून होणारं अधिवेशन तारीख पुढे ढकलण्याची शक्यता

- अनौपचारिक चर्चेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती 

- निवडणूकांमुळे मनुष्यबळाचा कमतरता जाणवू शकते, म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता 

- ठेकेदारांच्या कामबंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनाची तयारीही झाली ठप्प.....

NAGPUR | उपराजधानी नागपुरात महिला अत्याचाऱ्याच्या दररोज 4 घटनांची नोंद

उपराजधानी नागपुरात महिला अत्याचाऱ्याच्या दररोज 4 घटनांची नोंद होत असल्याची, माहिती अधिकारातून आली माहिती समोर 

धक्कादायक म्हणजे स्त्री अत्याचाराशी निगडीत दाखल गुन्ह्याची संख्या 2022 च्या तुलनेत सातत्याने वाढत चालली आहे..

2022 मध्ये शहराच्या हद्दीत महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या 1259 घटनांची नोंद करण्यात आली आहे..

2023 मध्ये ही संख्या 1556 झाली, तर 2024 मध्ये दुपटीहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले..

चालू वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत महिला अत्याचाराच्या 1132 घटनांची नोंद झाली आहे..

मागील दहा महिन्यात पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा होत नसलेल्या शहरातील 34 पोलिस ठाण्यातून आलेल्या प्रस्तावाची दखल घेत 74 गुंडांना तडीपार केल्याची माहिती... 

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारातून प्राप्त झालीय.

DHARASHIV | रस्त्यासाठी अनोखे आंदोलन,खड्डयात फुले टाकुन केले गांधीगिरी पध्दतीने आंदोलन

धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील लोहगाव-नळदुर्ग मार्गावरील रस्त्याचे काम गेली चार वर्षांपासून रखडल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये फुले टाकून पूजन करून गांधीगिरी आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलय.याबाबत संबंधित बांधकाम विभागाकडे नागरिकांकडून वारंवार लेखी तक्रार करूनही संबंधित बांधकाम विभाग व प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. चार वर्षांपूर्वी रस्त्यास मंजुरी मिळाली असून आजवर रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे  रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ झाली आहे.तरी याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com