

नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का बसला. शिवसेनेने हा धक्का दिला असून शरद पवारांच्या पक्षाकडून भंडारा येथील प्रभाग क्रमांक 17 साठी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या अतुल वैरागडकर याने आज शेवटच्या दिवशी AB फॉर्मसह उमेदवारी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्याने थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळं आता राजकीय वर्तुळात चांगलीचं चर्चा रंगली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सध्या बिबट्याची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आला आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बिबट्यांचे मनुष्यावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या असून यावर बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले गुजरात परिसरामध्ये सोडलेले बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर आणून सोडले आहे. गुजरात महाराष्ट्र सीमारेषेवर असलेल्या सापुतारा भागात हे बिबटे सोडले जातात.. या भागातून ते महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतात.
कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अपघातात तीन जणांचा मृत्यू,तीन जण गंभीर जखमी
मुंबईच्या चारकोपमध्ये बिल्डरच्या सहयोगीवर झालेल्या दिवसा ढवळ्या गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मुंबई क्राईम ब्रँचनं नाट्यमय पद्धतीने पुण्यातून अटक केली आहे. आरोपी पुणे येथील एका शेतात लपून बसले होते. क्राईम ब्रँचची टीम जवळ पोहोचताच हे सर्व आरोपी जंगलाच्या दिशेने पळाले. मात्र, जवळपास चार पाच किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पथकाने सर्वांना ताब्यात घेतले.
आमच्या सर्वांचा प्रयत्न होता की सर्व ठिकाणी महायुती म्हणून लढावं. परंतु मधल्या कालावधीत निवडणुका न झाल्याने प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते इच्छुक होते. विधानसभेला आम्ही सर्वांनी एकता दाखवली. नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही खूप ठिकाणी परस्पर विरोधी लढत आहोत.. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. परंतु आमच्यात कटुता येणार नाही याची खबरदारी आम्ही घेणार आहोत.
राहुल गांधी यांच्याविरुद्ध सावरकर यांची बदनामी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी नाशिक येथील दंडाधिकारी न्यायालयाने फौजदारी खटला सुरू करण्याचे आदेश दिले होते, परंतु राहुल गांधी यांच्या वतीने दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणी केली. न्यायालयाने नमूद केले की, दंडाधिकारी न्यायालयाने खटला सुरू करतांना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही आणि पुराव्यांचा तपास न करता निर्णय घेतला.
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर संतापाची लाट उसळली होती यावेळी आक्रमक झालेल्या माजी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण कार्यालयात धडक देत कार्यालयाची तोडफोड केली होती. या तोडफोड प्रकरणी कुडाळ न्यायालयाने वैभव नाईक यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. 26 ऑगस्ट 2024 ला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला घेरावा घालून तोडफोड करण्यात आली होती.
बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीच्या तावरे गटाने एकत्र येत स्थानिक आघाडी केली आहे.
माळेगाव नगरपंचायत साठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि जनमत आघाडी कडून सुयोग शामराव सातपुते यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आलेली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माळेगाव येथील भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय.
भंडाऱ्याच्या तुमसरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजपसमोर पक्षाच्या बंडखोरांचं आवाहन....राष्ट्रवादीचे सागर गभणे आणि भाजपच्या आशिष कुकडेंची अपक्ष उमेदवारी...
मालेगाव डोंगराळे बालिका अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर संतप्त जमावाने थेट कोर्टच्या आवारात घुसून दोन गेट तोडत तुफान राडा घातला होता मात्र आता कोर्ट परिसरासह शहरात शांतता आहे.. राड्या नंतर कोर्ट परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..
पॉकलँन वाहतुक करणारा कंटेनर थेट दुभाजक तोडुन विरुद्ध दिशेनेला आल्याने भिषण अपघात झाला एकाकडे या मार्गावर वाहतुककोंडीचे भिषण संकट असताना दुस-याबाजुला अपघातांची मालिक सुरु असल्याने प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु असुन या अपघातात सुदैवाने कुठलीही दुदैवी घटना घडली नाही मात्र अपघाताची भिषणता पहाता मोठी दुर्घटना टळली आहे
मुंढवा जमीन प्रकरणाचे मूळ मालक पुणे पोलीस आयुक्तालयात
या मूळ मालकांचा पुणे पोलीस आज नोंदवणार जबाब
काल शितल तेजवानी यांचा जबाब घेतल्यानंतर आज या जमिनीच्या मूळ मालकांना पुणे पोलिसांनी जबाब नोंदणीसाठी बोलावलं
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने 2008 पासून कार्यरत असलेल्या एका दिव्यांग बांधवाच्या स्टॉलवर कारवाई केल्याने आज वातावरण तापले. या कारवाईविरोधात अपंग विकास महासंघ आणि परिसरातील अनेक दिव्यांग बांधवांनी केडीएमसी मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन पुकारले आहे.
आजरा नगरपंचायतीसाठी तिरंगी लढत होणार आहे. भाजपचे नेते अशोक चराटी यांच्या सत्ताधारी ताराराणी आघाडी या पक्षाच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी व आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती , जुना भाजपचा गट या दोन आकड्या रिंगणात उतरणार आहेत. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार ही नगराध्यक्ष सह काही प्रभागात नशीब आजमावणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहे.
बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या आठ जागा बिनविरोध,,,,,,, शहराध्यक्ष जय पाटील यांची माहिती ,,,,,,,, कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण फटाक्याची बाजी
सोलापूर -
- अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे
- अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली
- अनगर मधील 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अखेर बिनविरोध झाले
- राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले होते
- त्यानंतर आज अखेर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आज अर्ज मागे घेतला
- त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अनगर नगरपरिषद बिनविरोध झालीय
- मात्र असं असलं तरी उज्वला थिटे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेय
मालेगाव -
डोंगराळे चिमुरडी हत्या प्रकरणानंतर मालेगावात वाढला तणाव
आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर आरोपीला तात्काळ एन्काऊंटर करा अशी मागणीसाठी नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक
नातेवाईकांनी रस्त्यावर न्यायालयासमोरच मांडला ठिय्या
जोपर्यंत मागण्या मान्य होत
अमरावती -
अमरावतीमध्ये कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य कृषी मेळावा
भाषण आमदार संजय खोडके
यशोमती ठाकूर यांनी खोडके यांना एवढ्या शिव्या घातल्या आहे लोकांना माहित आहे.
आग लगी है तो धुवा निकलेगा आमदार संजय खोडके यांची यशोमती ठाकूर यांच्या वर टीका.
नांदेड -
उमेदवारी अर्ज घेण्याच्या कारणावरून हिमायतनगरमध्ये अजित दादा यांच्या राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेत राडा.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हिमायतनगर मध्ये गोंधळ.
राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहम्मद जावीद आणि ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात झटापट.
राष्ट्रवादीच्या वार्ड क्रमांक 9 च्या उमेदवार सुनीता पंचमासे यांनी अर्ज मागे घेतल्याने वाद.
मालेगावात घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरमधील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला
तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या भयंकर अत्याचार आणि खुनाच्या घटनेने राज्यभर संताप उसळला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
निष्पाप चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
जनतेतही प्रचंड असंतोष व्यक्त होत असून न्यायासाठीचा संघर्ष अधिक तीव्र होत आहे.
मालेगाव -
- आरोपीला कोर्टात आणलं, अशी अफवा पसरल्याने मोर्चातील जमाव आक्रमक झाला
- जमावाने कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला
- पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणात आणलीय
- सध्या मालेगावात शांतता आहे
जालन्यातील भोकरदन नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर भोकरदन शहरामध्ये राजकारण चांगलंच तापलंय.भाजपचे आमदार संतोष दानवे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापणाला लागली आहे.मागील वीस वर्षापासून भोकरदन नगरपालिकेवरती काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख यांचे एकहाती वर्चस्व राहिलेला आहे या निवडणुकीत राजाभाऊ देशमुख वर्चस्व कायम ठेवतात की दानवे बाजी मारतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील चौकात स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन
साखर कारखान्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप सुरू करून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप
साखर कारखान्यांनी ऊसाला पहीली उचल 3500 रुपये द्यावी तर गुळपावडर कारखान्यांनी किमान 3 हजार रुपये दर देण्याची मागणी
स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनामुळे ढोकी - लातुर - धाराशिव कळंब महामार्गावर वाहनांच्या लागल्या होत्या मोठ्या रांगा
उसदर जाहीर करावा अन्यथा कारखान्यांचा गाळप बंद पाडण्याचा कार्यकर्त्यांचा थेट इशारा
Byte:रविंद्र इंगळे,जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना
- सलील देशमुख यांच्या जाण्याने काय परिणाम होणार? यावर विचारमंथन
- सलील देशमुख यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु
- “सलील देशमुख यांचा राजीनामा वरिष्ठ स्तरावर नामंजूर करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहेय”
- “सलील देशमुख लवकरात परत येतील, त्यांची समजूत काढण्यात आम्हाला काही प्रमाणात यश आलंय
- सलील देशमुख अजीत पवारांकडे जाणार नाही असाही दावा जिल्हाध्यक्ष कुंटे पाटील यांनी केला...
- शरद पवारांच्या राष्ट्रवादी नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रविण कुंटे पाटील यांचं वक्तव्य
अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात गेल्या पंचवीस दिवसापासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत लागतोय.. सत्ताधारी तसेच प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने मनसे आणि ग्रामस्थांनी पुणतांबा ग्रामपंचायत समोर मटकाफोड आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केलाय... लवकरात लवकर ग्रामस्थांना नियमित पिण्याचे पाणी दिले जावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय...
मुंढवा जमीन प्रकरणाचे मूळ मालक पुणे पोलीस आयुक्तालयात
या मूळ मालकांचा पुणे पोलीस आज नोंदवणार जबाब
काल शितल तेजवानी यांचा जबाब घेतल्यानंतर आज या जमिनीच्या मूळ मालकांना पुणे पोलिसांनी जबाब नोंदणीसाठी बोलावलं
कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी...
कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लावले अमरावती शहरामध्ये बॅनर..
बॅनर च्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी, सरकारची धोरणे, सरकारी आश्वासन यावर ओढले ताशेरे.
शेतकरी मरत आहे, सत्ता मजेत हेच का तुमचे विकासाचे मॉडेल?महायुती च्या धोरणानि उध्वस्त शेती,किमान आधारभाव हवा पक्का, महायुती सरकार करतंय फक्त ढोंग असे आशयाचे लागले बॅनर.
आंदेकर टोळीतील प्रमुख गुंड कृष्णा, अभिषेक आणि शिवराज आंदेकरची पोलिसांनी काढली धिंड
घरझडतीच्या निमित्ताने नाना पेठ, गणेश पेठेत फिरविले
पुण्यात आंदेकर टोळीने गेले काही महिन्यात शहरात धुमाकूळ घातला आहे
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर बांदेकर टोळीने जवळपास तीन खून केले आहेत
आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या ह्या आरोपी शिक्षा भोगत आहेत
नांदेडच्या किनवट नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि ठाकरे सेनेची थेट लढत होत आहे. ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि भाजपाचे आमदार भीमराव केराम यांच्यासाठी किनवट नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणापासून किनवट हे शहर जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. मागच्या वेळेस किनवट नगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता होती. भाजपाच्या कार्यकाळात किनवट शहराचा विकास झाल्याचा दावा करण्यात आला.परंतु प्रशासक राज आल्याने किनवट शहराचा विकास खुंटला असा किनवटकरांचा आरोप आहे. दरम्यान भाजपाच्या कार्यकाळात किनवट शहरात कुठलाच विकास झाला नसून नगरपालिकेच्या अनेक कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काहींनी केला आहे.
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना होतोय.. या निवडणुकीत काळे आणि कोल्हे या पारंपारिक राजकीय विरोधक असलेल्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. राष्ट्रवादीने राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवले असून असून आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जात आहे.. आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार असून समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकणार आहे असा विश्वास आमदार काळे यांनी व्यक्त केलाय..
- मालेगावच्या डोंगराळे येथे लहान मुलीवर अत्याचार करून ठार करण्यात आल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा
- काळया फिती लाऊन मूक मोर्चा काढत करण्यात आला निषेध व्यक्त
- संशयित आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी मोर्चेकरांची मागणी
- अखिल भारतीय सोनार समाज यांनी एकत्र येऊन काढला मोर्चा
- सराफ बाजारापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलाय मोर्चा
- संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करणार मागणी
दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेवर मंत्री जयकुमार रावल यांचा करिष्मा कायम
दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेसाठी यापूर्वीच 9 उमेदवारांनी घेतली होती माघारी, आता दिवसाच्या सुरुवातीलाच आणखी दोन उमेदवारांनी माघारी घेतल्याने 26 पैकी 11 नगरसेवक भाजपचे झाले बिनविरोध
आज माघारीची शेवटची मुदत असताना मुदत संपेपर्यंत आणखी किती भाजपचे नगरसेवक बिनविरोध होणार आणि किती विरोधक माघारी घेणार हे बघणं ठरणार औचित्याच
मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री यांची नगराध्यक्ष म्हणून यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्यानंतर मंत्री रावल यांनी संपूर्ण निवडणूक बिनविरोध करणार असे केले होते जाहीर, त्याप्रमाणे मंत्री जयकुमार रावल यांनी बोलून दाखवल्याप्रमाणे खरंच दोंडाईचा नगरपरिषद बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून...
शंकर गणपती निर्मळे यांना मारहाण
शेतीच्या वादातून भाऊबंधांनीच केली मारहाण
8 एकर शेतीचा वाद
पुरुषांसह महिलांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप
मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज वायरल
कागल पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली शहरात तीन वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. डंपर आणि खाजगी ट्रॅव्हल्स एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील एक जण जखमी झाला आहे.
चिखलदरा नगरपरिषदेत नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध निवड...
फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोतींची पहिली प्रतिक्रिया
चिखलदरा विकासासाठी जनता फडणवीस यांच्यावर विश्वास.
विरोधकांनी सामूहिक निर्णय घेत फॉर्म मागे घेतले
हिंगोलीच्या वसमत नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने चक्क नगराध्यक्ष पदाच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म चे वाटप केल्याने गोंधळ उडाला आहे, सविता मारुती क्यातमवार व सुषमा शिवदास बोडेवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून एबी फॉर्म लावत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत दरम्यान आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दोन उमेदवारांपैकी नेमका कोणाचा पत्ता करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहेत तर दुसरीकडे वसमत नगर परिषदेमध्ये आमदार चंद्रकांत नवघरे यांनी खेळी करत शिवसेनेला उमेदवार मिळू दिला नसल्याने वसमत पालिकेत राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तर महाविकास आघाडीने मात्र एकत्र येत काँग्रेस कडून सीमा अब्दुल हाफिज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
माणगाव निजामपूर मार्गावर रात्री माणगावकडे येत असतात व्हॅगनार कारला क्रांती नगर परिसरात अपघात झाला आहे. हि वॅगन कार रस्ता लगत असलेल्या काळव्यात कोसळली आहे. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अज्ञात गाडी ने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
लातूर शहरातील गायत्री हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरला 50 हजाराची खंडणी मागणाऱ्या आरोपींनी विरोधात लातूरच्या एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान खंडणी मागणाऱ्यांपैकी तीन आरोपी हे सध्या एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहेत , यात एका महिलेसह इतर दोघांचा सहभाग आहे. भागवत मडके अभिषेक गिरी आणि राधिका पाटील उर्फ नगीता खरोसे यांना अटक करण्यात आली आहे . रुग्णालयातील कर्मचारी यांच्या पगार देण्याच्या कारणावरून या आरोपींनी वाद घातला आणि डॉक्टरांकडून मारहाण करत पैशाची मागणी केली अशी तक्रार डॉक्टर भराटे यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली आहे . तर या तक्रारीवरून एकूण सात जणांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी महिला पोलिसांना आरेरावी करत उद्धट बोलतानाचा व्हिडिओ द सध्या तुफान वायरल होतो आहे
निफाड तालुक्यात सध्या थंडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, ज्यामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. विशेषतः गोळेगाव, गोंदेगाव, मरळगोई, दहेगाव आणि वाहेगाव या परिसरांत थंडीची तीव्रता जास्त जाणवत आहे. या वाढलेल्या थंडीमुळे येथील गोई नदीवरील बंधाऱ्यातील पाण्याची वाफ होत असल्याचं एक अद्भूत आणि विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. सकाळच्या वेळी नदीच्या पृष्ठभागावरून धुक्याप्रमाणे पाण्याची वाफ वर जाताना दिसत आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर एका सुंदर निसर्गरम दृश्याने न्हाऊन गेला आहे. या विहंगम दृश्याची नोंद छायाचित्रकार पंडित मुदगुल यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या ड्रोनच्या साह्याने हे दुर्मिळ दृश्य चित्रित केले असून, या परिसरातील वाढलेल्या थंडीचा आणि निसर्गाच्या चमत्काराचा अनुभव कॅमेऱ्यात कैद केला आहे.
पवना नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी तसेच मैला मिश्रित सांड पाणी थेट सोडल्याने पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. चिंचवड येथील केजुबाई बंधाऱ्यावर पवना नदी पात्रात पांढरा फेस मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे पवना नदी पात्रातील जलचर जीवन आणि पिंपरी चिंचवड करांचा आरोग्य देखील धोक्यात आल आहे. पिंपरी चिंचवडकर पवना नदी पात्रातून वाहत येणारा पाणी पीत असतात, त्यामुळे एकूणच त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आल आहे. पवना नदी पात्रात रसायन मिश्रित आणि मैला मिश्रित सांड पाणी सोडणाऱ्या उद्योगधंद्यावर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता पर्यावरण प्रेमी करत आहेत.
पवना धरण परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम जलसंपदा विभागामार्फत सुरू असून परिसरातील आठ बंगले जमीनदोस्त करण्यात आले आहेत. धरण क्षेत्रातील सुरक्षा आणि जलस्तोत्राचे संरक्षण लक्षात घेऊन ही मोहीम करण्यात आली आहे. धरण क्षेत्रातील अतिक्रमणामुळे जलसाठा पाण्याची शुद्धता आणि आपत्ती व्यवस्थापन यावर धोका निर्माण होत असल्याने जलसंपदा विभागाने कठोर पावले उचलली आहे. धरण परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे या मोहिमेमुळे स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसातही ही मोहीम सुरूच राहणार असून उर्वरित अतिक्रमण लवकरच हटवली जाणार आहे..... दरम्यान या अतिक्रमण कारवाई विरोधाला पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता..
तांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्याने महिलांचे दीड हजार रुपये बंद.
बालविकास विभागाने अपात्र ठरलेल्या महिलांची नावे जाहीर केली.
आर्थिक स्तर, आरोग्य, पोषण यांसह विविध कारणांनी पात्रता नाकारली
बँक खात्यातील व्यवहार व जोडलेली कागदपत्रे तफावत दाखवताहेत
जिल्ह्यात तब्बल ९ हजार महिलांच्या कागदपत्रांची तपासनी सुरूच.
31 डिसेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे निर्देश.
कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या २० प्रभागांच्या प्रारुप मतदार यादीत ३२ हजार २५० मतदारांची नावे दुबार असल्याची बाब समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगानेच मतदार यादीत दुबार असलेल्या नावांपुढे 'स्टार' चिन्ह टाकून याद्या दिल्या आहेत. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाकडील सहायक आयुक्त व उपशहर अभियंता प्रारुप मतदार याद्यांवर प्राप्त होणाऱ्या हरकतींवर सुनावणी घेणार आहेत, तशी दुबार मतदारांच्या नावांची खात्री करून घेतील. एकाच नावाचे दोन, कुठे तीन तर कुठे चार नावे आहेत. हे मतदार वेगवेगळे आहेत की एकच आहे याची शहनिशा केल्यानंतर त्यांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रारुप मतदार याद्या प्रति पान दोन रुपये प्रमाणे उपलब्ध करुन दिल्या जातील. त्यावर मतदारांची छायाचित्रे असतील, तर वेबसाईटवर जी यादी प्रसिद्ध केली गेली आहे ती मतदारांच्या छायाचित्रासह आहे. त्यामुळे दुबार मतदाराच्या नावावर उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना हरकती घेण्याची मुभा दिली आहे. त्यांना मतदान करायला द्यायचे की नाही याबाबतचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले
विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरमधील राजकीय गणिते बदलली असून पालिका निवडणुकीत काँग्रेसचे पंजा चिन्ह गायब झाले आहे.. संगमनेर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला मानला जायचा मात्र संगमनेरमध्येच पंजा चिन्ह गायब झालंय.. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने स्थानिक आघाडी बनवून पालिका निवडणूक लढवली जात आहे.. भाजप महायुतीला शह देण्यासाठी एकाच चिन्हावर निवडणूक लढवली जावी असा उद्देश असल्याची सारवासारव बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.. तर तुम्ही स्वतःला काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून मिरवता मात्र पालिका निवडणुकीत पंजा चिन्ह गायब होणे हा थोरातांचा पराभव आहे.. बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय अंताला सुरुवात झाली असल्याचा टोला विधानसभेत थोरातांचा पराभव करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी लगावला आहे...
सलील देशमुख यांची मध्यंतरी प्रकृती खराब असताना रुग्णालयात अजितदादा पवार यांनी स्वतःहून त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता प्रकृतीचे कारण देत मुंबईला गेलेले सलील देशमुख हे अजित दादा पवार यांना भेटणार तर नाही ना अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसंच दुपारी 11 वाजता आक्रोश मोर्चा काढत करणार निषेध व्यक्त केला जाणार आहे. मालेगावच्या रामसेतू पुल ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा आक्रोश मोर्चा असेल. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात असेल...
जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार जालना शहरामध्ये 2 लाख 45 हजार 913 मतदार असल्याच समोर आल आहे. तर जालना शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये सर्वाधिक कमी मतदार असून प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्वाधिक मतदार असल्याच देखील समोर आल आहे.दरम्यान 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार असून हकरतींवर सुनावणी झाल्यानंतर पाच डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
धाराशिवमध्ये ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले आहे.माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला सोबतच जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्या सह उबाठा शिक्षकसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही भाजपमध्ये प्रवेश केला.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून हे प्रवेश म्हणजे घर वापसी असल्याचं राणाजगजीतसिंह पाटील यांनी म्हटलंय.
नगर पालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच रायगडच्या तीन नगरपालिकांमध्ये नगर सेवक पदाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अलिबागमध्ये शेकापचे प्रशांत नाईक बिनविरोध निवडून आले आहेत तर पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा पाटील यांच्या विरोधात अर्जच न आल्याने त्या विजयी झाल्या आहेत. पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाली असून त्यांनी एकमेकांविरोधातील उमेदवार मागे घेतले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक गुरव आणि सुशीला ठाकूर हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. तर प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपाचे अभिराज कडू बिनविरोध विजयी झालेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे रोह्यात राष्ट्रवादत काँग्रेसचे राजेंद्र जैन बिनविरोध निवडून आलेत.
- गेल्या आठ वर्षात नागपूर शहरात वाढले 3 लाख 89 हजार नवे मतदार, महापालिकेची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर
- मनपा निवडणुकीसाठी गुरुवारी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली
- त्यानुसार नागपूर शहरातील मतदारांची संख्या 24 लाख 82 हजार 475 एवढी झाली आहे
- 2017 मध्ये नागपूर शहरात 20 लाख 93 हजार 392 मतदार होते
- पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे
- या वाढलेल्या मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहणार यावर मनपा निवडणुकीचा कौल राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे
अतुल देशमुखांनी नुकताच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेना पुर्ण ताकदीने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली असुन भाजप,राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार, शिवसेना उबाठा,आणि शिंदे गटाची शिवसेना असे चारही पक्षांची चौरंगी लढत होत असतानाही अतुल देशमुख यांनी मोठा डावपेच टाकत विचारावर चालणारी लोक कमी आहेत पण जी विचारावर चालतात ती घडतात असं म्हणत राजगुरुनगर नगरपरिषदेची पहिली जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले यावेळी आनंदोत्सवातही भावना क्षण अनुभवायला मिळाला
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मावळात अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दोन्ही पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला शरद पवार गटाने पाठिंबा दिल्यामुळे आमची ताकद मोठ्या प्रमाणात लोणावळा आणि वडगाव मध्ये वाढणार आहे असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.
मारुती आबा बनकर हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ उमेदवार असून त्यांनी यापूर्वी दोन वेळेला सांगोल्याचे नगराध्यक्ष पद भूषवले आहे. मारुती आबा बनकर यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल करताना त्यांचा नातू ज्योतिरादित्य बनकर यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. विशेष म्हणजे मारुती आबा बनकर हे सर्वात जास्त वयाचे उमेदवार असून त्यांचा नातू ज्योतिरादित्य हा सर्वात कमी वयाचा उमेदवार आहे. आता सांगोला नगरपालिका निवडणुकीत 73 वर्षांचे आजोबा मारुती आबा बनकर नगराध्यक्षपदासाठी तर त्यांचा 21 वर्षाचा नातू ज्योतिरादित्य हा नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.