Maharashtra Live News Update : - जमिनीतून गुप्तधनाचा हंडा देतो असे सांगत भोंदू बाबाकडून 1 कोटी 87 लाखाची फसवणूक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५, राज्यात पावसाच्या हलक्या सरी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी; देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

Solapur : जमिनीतून गुप्तधनाचा हंडा देतो असे सांगत भोंदू बाबाकडून 1 कोटी 87 लाखाची फसवणूक

- फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद

- मोहम्मद कादर शेख असे फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव आहे

- सोलापुरात अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद कादर शेख याला कर्नाटकातील विजापूर येथून केली अटक

- सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या टीमने ही कामगिरी केलीय

Amol Mitkari : तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला राजकीय स्वरूप आलं- अमोल मिटकरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला राजकीय स्वरूप आलं- आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप

मौन श्रद्धांजली सोहळा यावर्षी कमी वेळात घेतला गेला कोणाच्या दबावाखाली घेतला -अमोल मिटकरी यांचा सवाल

सर्व धर्म समभावाच्या पाऊल खुना मोडल्या होत्या, मोझरी सर्व धर्म समभावाचं विचारपीठ आहे धर्मांध कडे झुकत का अशी भीती वाटते

लाखो भाविकांनी वाहिली तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली...

अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा आज 57 वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या भक्तीभावात गुरुकुंज मोझरी येथे संपन्न झाला... यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते...

Solapur : जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगत भोंदू बाबाकडून 1 कोटी 87 लाखाची फसवणूक

- जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगत भोंदू बाबा कडून 1 कोटी 87 लाखाची फसवणूक

- फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद

- मोहम्मद कादर शेख असे फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव आहे

- सोलापुरात अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद कादर शेख याला कर्नाटकातील विजापूर येथून केली अटक

Pune : पुण्यात भररस्त्यात भांडणं करून टेम्पोची तोडफोड करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

पुण्यात भर रस्त्यात भांडणं करून टेम्पोची तोडफोड करणाऱ्या गुंडाला हडपसर पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलीय...ज्या ठिकाणी या भाईने किरकोळ भांडणातून टेम्पोची काच फोडून दादागिरी केली होती तिथेच त्याला गुडग्यावर चालायला लावून पब्लिकची माफी मागायला लावली आणि वरून रिलही बनवले... आरोपी सुरज गणेश पाटील वय 32 चालक याला अटक करण्यात आली..अधिक तपास पोलिस करत आहे.. दमदाती करत टेम्पोची काच फोडण्यात आली..

रायगडमध्ये शेकाप सोबत राष्ट्रवादी युती नाही- सुनील तटकरे

रायगडमध्ये शेकाप सोबत राष्ट्रवादीची युती होणार नसल्याचे खा. सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. रायगडमध्ये पालक मंत्री आणि निवडणुकीदरम्यान झालेली फसवणुक या वरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शेकाप युती होणार अशी चर्चा सुरु आहे. शेकापने त्यांची भुमिका महाविकास आघाडीत स्पष्ट केले तर राष्ट्रवादीची भुमिका महायुतीत काम करण्याची आहे असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक शहरातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिस ऍक्शन मोडवर

- गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात गुन्हेगारीत अनैसर्गिक वाढ झाली होती, ती कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हला फ्री हॅन्ड दिला आहे

- नाशिककरांनी विश्वास दाखविला आहे, त्यानुसार आम्ही काम करत आहोत

- सर्वच राजकिय पक्षातील गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर काम करतोय

- एक ग्रुप स्थापन करणे, गँग तयार करणे, गरीब लोकांची पिळवणूक करणे, त्यांच्या जमिनी टपऱ्या हडप करणे, या संदर्भात कारवाई केली जात आहे

- कोणी आम्ही सरकार आहोत, बॉस आहोत अशी होर्डिंग लावत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे

- गुन्हेगारी टोळ्या चालवल्या जात आहेत, त्याची काय मोडस आहे, ते जाणून घेऊन आम्ही कारवाई करत आहोत

- अनधिकृत होर्डिंग लावणे, बॅनर लावणे लोकांच्या मनात भिती निर्माण करायची, असे बॅनर लावणे, यावर कारवाई केली जात आहे

भरत गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात तटकरेंच्या हस्ते राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये शह काटशहाची खेळी सुरु झाल्याचे दिसत आहे. तटकरेंचा बालेकिल्ला असलेल्या रोह्यात दोन दिवसा पूर्वी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्याला काटशह देत आज गोगावलेंचा बालेकिल्ला असलेल्या महाडमध्ये खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात अकोल्यात पोलीस तक्रार..

'दिवाळीची खरेदी फक्त हिंदूकडून करा' असं वादग्रस्त विधान अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी केलं होतं. यांनंतर आता अकोल्यात 'शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार जगताप यांच्या विरोधात पोलीस तक्रार केली.. जगताप यांचं विधान धार्मिक द्वेष पसरवणार होतंय.. त्यामुळं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीमधून केलीय. शरद पवार गटाचे प्रदेश संघटक सचिव जावेद जकारीया यांच्या नेतृत्वावात अकोल्यातल्या रामदास पेठ पोलीस ठाण्यात ही तक्रार दिलीय.

देवेंद्र फडणीस आणि संभाजी भिडे गुरुजी यांची भेट

संभाजी भिडे गुरुजी मुख्यमंत्री याना भेटण्यासाठी आले होते

पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहे पश्चिम महाराष्ट्राची विभागीय बैठक सुरू आहे

या ठिकाणी काही वेळापूर्वी भिडे गुरुजी दाखल

बंद दाराआड चर्चा

चंद्रशेखर बावनकुळे पाया पडून दर्शन घेतलं तर मुख्यमंत्री आणि भिडे गुरू जी यांची दाराआड चर्चा

शनिमांडळ गावात शिंदे गटाची बैठक; शेकडो ग्रामस्थांच्या पक्षप्रवेश....

निवडणुकीच्या काळात शिवसैनिकांनी एकमेकांना साथ देऊन आपापसातील विश्वास व्यक्त करीत कुठल्याही प्रलोभनांना ग्रामस्थांनी बळी पडू नये. पक्षाकडून ज्या उमेदवाराला निवडणुकीत तिकीट देण्यात त्यास सर्वांनी मदत करावी.राजकारण करीत असताना भाऊबंदकी कायम ठेवा असा सल्ला शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसैनिकांना दिला.दरम्यान,शनिमांडळ गावात झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत असंख्य ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश केला.

Marathwada: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आत्महतेपासून परावृत्त करण्यासाठी ज्ञानोबा-तुकोबा आधार दिंडी मधून प्रबोधन

बीड जिल्ह्यात ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेने पुढाकार घेतला आहे.आज बीडमध्ये दाखल झालेल्या ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी मध्ये हजारो महिला पुरुष वारकरी सहभागी झाले होते.या वारकऱ्यांना आत्महत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ देण्यात आली..

प्रसिद्धीसाठी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना काय उत्तर देणार?विखे पाटलांचे लक्ष्मण हाकेंना प्रतिउत्तर

लक्ष्मण हाकेंना काय टिका करायची करू द्या.. अशी वक्तव्य करणारे नेतृत्व पाहिजे का? याचा विचार समजा बांधवांनी केला पाहिजे.. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना काही लोक मुक्ताफळे उधळत असतील तर आपण काय उत्तर देणार?.. मात्र अशा टिका झाल्यावर वेदना होतात, अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या टीकेनंतर दिली आहे...

Shirur: शिरुर तालुक्यातील निर्वी गावात भावकीत तुंबळ हाणामारी

शिरुरमधील निर्वी गावात एका कुटुंबात तुंबळ हाणामारी

कुटुंबातील महिला पुरुष एकमेकांवर भिडले

कोयत्याने एकमेकांवर जिवघेणा हल्ला

जमीनीच्या वादातुन भावकीत हाणामारी

दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी चार दुचाकींचे नुकसान

Harshwardan Sapkal: राहुल गांधी लोकशाही वाचविण्याच्या भूमिकेतूनच बोलतात – हर्षवर्धन सपकाळ

उल्हासनगर येथे आले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.या वेळी त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यांना पाठिंबा दर्शविताना सांगितले की,राहुल गांधींनी यापूर्वी फोडलेले “बॉम्ब” हे पक्षीय नव्हे, तर लोकशाही वाचविण्याच्या भूमिकेतून आहेत.त्यांचा अभ्यास पुरेसा असून ते वेळोवेळी देशासमोरील वास्तव उघड करत असतात.सपकाळ म्हणाले की, माध्यमं, नागरिक आणि राजकीय पक्षांनी मिळून निवडणूक आयोगावर निपक्षपाती निवडणुकीसाठी दबाव आणावा.राज्य निवडणूक आयोगाची आतापर्यंत दहा वेळा भेट घेण्यात आली असून लवकरच पुन्हा भेट घेणार आहोत.मतदार याद्यांमधील त्रुटी आणि गलतन कारभार याविरोधात काँग्रेस आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Local Bodies Election: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अ‍ॅक्टिव मोडमध्ये

फडणवीसांकडून वही पेन कागद घेऊन प्रत्येक तालुक्यांचा घेतला जात आहे आढावा

पुण्यातील पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये तालुकानिहाय कार्यकर्त्यांना बोलावून स्वतः मुख्यमंत्री घेत आहेत आढावा.

जुन्या कार्यकर्त्यांना नव्याने मुख्य प्रवाहात घेऊन निवडणुकींना सामोरे जा

देवेंद्र फडणीस यांनी कार्यकर्त्यांना दिले आदेश

आता मी तुम्हाला ॲक्टिव्ह करतोय तुम्ही आता आपल्या भागामध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करा ,मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढाईच्या ? महायुती की स्वबळावर ?याची देखील विचारपूस कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री घेत आहेत

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली,सातारा, कोल्हापूर,सोलापूर आणि पुणे जिल्ह्याचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर आज पुण्यात घेतला जात आहे आढावा...

Amravati: अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये आज राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57 वा पुण्यतिथी महोत्सव

देश विदेशातुन आलेले लाखो गुरुदेव भक्त 4 वाजून 58 मिनिटांनी वाहणार तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली...

लाखो गुरुदेव भक्त मोझरी गुरुकुंज मध्ये हजारो पालख्या सह दाखल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही राहणार तुकडोजी महाराजांच्या मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित

मौन श्रद्धांजली नंतर होणार सर्व धर्माच्या प्रार्थना....

रंगीबिरंगी आकर्षक फुलांनी सजवली तुकडोजी महाराजांची महासमाधी

पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक ,सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्या महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

गेल्या 11 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील थाटेवडगाव येथे 3 वंजारी समाजाचे तरूण आमरण उपोषण करत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन होणार आहे. आणि उद्याच्या आंदोलनामध्ये वंजारी समाजाच्या आमदारांनी सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांनी आज बीडमध्ये पत्रकार परिषदेतुन केले आहे.

Solapur: सोलापुरात रस्त्यावर तलवार फिरवत बड्डे साजरा करणे तरुणांना भोवले

सोलापुरातील साठे वस्ती परिसरात 4 ऑक्टोबरच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मित्राच्या खांद्यावर बसून तलवार फिरवून केले कापणाऱ्यावर गुन्हा दाखल

सोलापुरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात विजय साठे या तरुणासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकारणी पोलीस शिपाई दीपक साळुंखे यांनी फिर्याद दिली असून पोलीस शोध घेत असल्याची कुणकुण लागताच आरोपी पोबारा झाले आहेत.

दरम्यान,रस्त्यावर वाढदिवस करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा आदेश सोलापूर शहर पोलिसांनी कांही महिन्यांपूर्वीच काढला होता.

शेतकऱ्यांनविरोधातील सहकार मंत्र्यांच्या वक्तव्याचा शिवसेना उबाठाने केला जोडे मारून निषेध

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगाव येथे एका अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यां बाबद बेजबाबदारपणे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेला मीठ चोळले असल्याचे म्हणत सहकार मंत्र्यांच्या पोस्टरला जोडे मारत त्याच्या विधानाचा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे,

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस आला असताना राज्य सरकारमधील असलेल्या मंत्र्याने शेतकऱ्यांबद्दल बेजबाबदारपणे वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे, म्हणून ठाकरे गटाच्या वतीने सहकार मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.

Nashik: नाशिकच्या रामकुंडावरील ३५ वर्षे जुन्या वस्त्रांतरगृहावर अखेर हातोडा

- वस्त्रांतरगृहाची मुख्य इमारत पाडण्यास सुरुवात

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसंच बहुचर्चित रामकाल पथ प्रकल्पाला अडथळा होत असल्यानं इमारतीच्या पाडकामाला सुरुवात

- पुरोहित संघाचा वस्त्रांतरगृह पाडण्यास होता विरोध

- मात्र पुरोहित संघाला पर्यायी जागा देण्याचं पालिका प्रशासनाचं आश्वासन

- पाडकाम करतांना भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी इमारतीच्या बाजूला मोठे पत्रे उभे करून पाडकामाला सुरुवात

Rohit Pawar: रोहित पवारांनी दाखवला देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ

देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत घेतला होत निलेश घायवळ याचं नाव

कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंचावर सचिन घायवळ होता

राम शिंदे यांच्या प्रचारार्थ ती सभा घेण्यात आली होती

आणि फडणवीस यांनी त्या सभेत सचिन घायवळ याचं नाव घेतलं होतं

३१ हजार कोटींचं पॅकेज, इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक- उद्धव ठाकरे

ज्यांच्यावर संकट आल् तो शेतकरी समाधानी आहे का ? हा प्रश्न आहे. मी स्वतः पाहणी केलीय, तुमच्या माध्यमातून देशाने पहिली. जमिनी खरडवून गेल्या आहेत, खालचे दगडगोटे वाहून गेलेत, आयुष्य वाहून गेलंय किमान ५० हजार हेक्टरी मदत मिळावी, ही शेतकऱ्याची मागणी आहे. बँक त्याला कर्ज देईल का ? जमीन पूर्ववत करणे आणि पूर्ण कर्ज माफी द्यावी. सरकारने पालकत्वाची भूमिका घ्यावी. पंतप्रधान आले, पण त्यांना कल्पना दिलीय की नाही माहित नाही, पण ते इथे येऊन काहीच बोलले नाही. ३१ हजार कोटी खूप झाले नाही. साडे सहा हजार कोटी फसवी पॅकेज ही घोषणा आहे. इतिहासातील सगळ्यात मोठी फसवणूक. मी आरश्यात पाहतो, पण तुम्ही शेकऱ्यांकडे पहा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. याचसोबत महिलांच्या खात्यात १०-१० हजार जमा करा, अशीही मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

सहकार मंत्र्यांच्या वक्तव्याचा अहमदपूर मध्ये महाविकास आघाडीकडून निषेध..

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी बद्दल केलेल्या विधानानंतर संतप्त भावना समोर यायला सुरुवात झाल्या आहेत. मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूर येथे आज महाविकास आघाडीकडून निषेध नोंदवण्यात आलाय. सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांची नाक घासून माफी मागावी,अशी मागणी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केली आहे

माझं नाव लिहून घे आणि पोलिसात जा! पुण्यात टेम्पो चालकावर स्कूल बस चालकाची मुजोरी आणि तोडफोड

पुण्यातील एका स्कूल बस चालकाने एका टेम्पो चालकाच्या टेम्पोची काच फोडून त्याला शिवीगाळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या दोघांचा आधी एक किरकोळ अपघात झाला असल्याची माहिती आहे. यावरून रागात स्कूल बस चालकाने थेट "माझं नाव लिहून घे आणि पोलिसात जा" असा दम या टेम्पो चालकाला भरला आणि थेट टेम्पो चालकाच्या टेम्पो ची काच फोडली. हा सगळा प्रकार पुण्यातील हडपसर भागातील मगरपट्टा परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. टेम्पो चालकाला शिवीगाळ करून त्याच्या टेम्पो चे नुकसान केलेल्या या स्कूल बस वर पोलिस काही कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे...

धुळे जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीनंतर जलसाठ्यांच्या पाणी पातळीत झाली झपाट्याने वाढ

धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर संपूर्ण जिल्हाभरातील जलसाठ्यांमधील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीसा मिटला आहे, प्रामुख्याने धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे, त्यामुळे धुळेकरांना मोठा दिलासा मानला जात आहे,

जिल्हाभरातील बारा लघु प्रकल्पांमध्ये 87% जलसाठा जिल्हाभरात उपलब्ध आहे, त्यामुळे धुळेकरांचा पाणी प्रश्न काहीसा मिटला असल्याचेच दिसून येत आहे, दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ढवळेकरांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागते परंतु यांना मात्र उन्हाळ्यात धुळेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

हिंजवडी आयटी पार्क परिसरात वारंवार घडणाऱ्या डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक अपघातानंतर वाहतूक पोलिसांना आली उशिरा जाग

हिंजवडी आयटी पार्क परिसरात डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक चाकाखाली वारंवार निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडल्यानंतर उशिरा का होईना पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलिसांना जाग आली आहे. काल हिंजवडी येथील पांडव नगर या ठिकाणी आरएमसी ट्रकच्या चाकाखाली एक तरुणी पुन्हा चिरडून मृत्युमुखी पडल्यानंतर आज पिंपरी चिंचवड शहर वाहतूक पोलिसांनी हिंजवडी आयटी पार्क कडे रहदारीच्या वेळेमध्ये जाणारे डंपर ट्रक तसेच आरएमसी ट्रक भूमकर चौक या ठिकाणी अडवून ठेवले आहेत. रहदारीच्या वेळी हिंजवडी आयटी पार्क कडे जाणाऱ्या डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक वर आता वाहतूक पोलीस नेमकी काय कायदेशीर कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

malegaon-शासकीय रुग्णालयात औषध तुटवडा,नागरिकांचे धरणे

नाशिकच्या मालेगाव मधील सामान्य शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून,रुग्णालयात सलाईन व ईतर  औषध उपलब्ध नसल्याने गरीब रुग्णाणचे हाल होत आहे,त्यातच महापालिकेचे दोन रुग्णालय बंद असल्याने शहरातील नागरिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येत आहे,मात्र येथे औषध उपलब्ध नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत,रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावरील पायऱ्यांवर बसून ठिय्या मांडत निषेध व्यक्त केला आहे,या रुग्णालयात केवळ मालेगाव शहरातीलच नव्हे तर तालुक्यतून रुग्ण येत असतात.दरम्यान शासनाने व लोकप्रतिनिधींनी तातडीने औषध पुरवठा करून सामान्य रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे

मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप, शिर्डी काँग्रेसचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

शिर्डी नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यात घोळ असल्याचा आरोप करत काँग्रेसने नगर परीषद निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय.. मतदार याद्यातील घोळ मिटेपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभाग न घेण्याचा इशारा देण्यात आलाय.

आयटी पार्क हिंजवडी मान आणि मारुंजी परिसरातील वारंवार होणाऱ्या अपघाती मृत्यू विरोधात आय टी अभियंते उतरले रस्त्यावर

यटी पार्क हिंजवडी परिसरामध्ये आर एम सी ट्रक खाली चिरडून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्यानंतर आज पुन्हा आय टी अभियंते पुणे जिल्हा प्रशासना आणि वाहतूक पोलीस विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

वोट चोरी विरोधात काँग्रेस पक्षाचा पिंपरी चिंचवड शहरात स्वाक्षरी मोहीम आंदोलन

वोट चोरी विरोधात पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाने स्वाक्षरी मोहीम आंदोलन केल आज. काळेवाडी येथे काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष सायली नडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी वोट चोर, गद्दी छोड अशा घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजप सरकार विरोधात देण्यात आल्या. तसेच यावेळी लावण्यात आलेल्या होर्डिंगवर नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून राहुल गांधी यांच्या वोट चोरी विरोधातील अभियानाला पाठिंबा देखील देण्यात आला.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून जगात अव्वल ठरलेल्या जालिंदरनगर शाळेची पाहणी

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या आती दुर्गम भागात असणारी जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा जगात अव्वल ठरली असून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे या शाळेची पाहणी करण्यासाठी जालिंदरनगर शाळेत पोहोचले असून या शाळेच्या प्रगतीचे शिल्पकार मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शिक्षण मंत्र्यांना शाळा व शाळेतील उपक्रमांची माहिती दिलीय. शिक्षण मंत्री दादा भुसे पुढील तीन तास या शाळेत थांबणार असून शाळेतील शिक्षकांचा व शाळा विकासात योगदान देणाऱ्यांचा सत्कार करून उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

अल्पवयीन मुलांनच्या मदतीने दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राज उर्फ ढेकऱ्या संतोष बापर्डेकर 22 वर्ष असं दुचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीचं मोहरक्याच नाव आहे राज बापर्डेकर यांच्या ताब्यातून पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे क्रमांक एक पोलीस पथकाने तीन दुचाकी वाहन जप्त केले असून पिंपरी चिंचवड शहरातील चार वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. राज बापर्डेकर आपल्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात दुचाकी वाहन चोरी करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आला आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांच्या मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा निषेध

विखे पाटलांवर खालच्या पातळीचे वक्तव्य केल्याने विखे समर्थकांमध्ये संताप...

लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारत आणि कुत्राच्या गळ्यात हाके यांचा फोटो लटकावून निषेध..

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सावळीविहीर येथे विखे समर्थकांनी केला हाके यांचा निषेध...

लक्ष्मण हाके यांच्या निषेधार्थ विखे समर्थकांची तीव्र घोषणाबाजी....

nashik-manmad-येवल्यात अतिक्रम मोहिमेला सुरुवात

नाशिकच्या येवला शहरातील विंचूर चौफुली येथे वारंवार होणारे अपघात,वाहतुकीची कोंडी या विरोधात काल भ्रष्टाचार निर्मुलन समितीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला,याची दखल घेत येवला नगर पालिका प्रशासन अलर्ट मोडवर येत त्याने त्यांनी महामार्गावरील अतिक्रम काढण्यास सुरवात केली आहे,त्यामुळे छत्रपती संभाजी नगर-नाशिक,इंदोर-पुणे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे

कारंजा येथे मनोरंजन क्लब वर पोलिसांची धाड....37 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाशिमच्या कारंजा शहरातील कारंजा मित्र मंडळ मनोरंजन क्लब मध्ये नियमांचं उल्लंघन करून पत्त्यांचा जुगार खेळला जात असताना वाशिमचे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई मोठी कारवाई केली आहे. या धाडीत 49 जणांवर कारवाई करत तब्बल 37 लाख 89 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे मात्र अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

१८ हजार ५०० केळीचे वाटप करुण शेतक-यांचे आंदोलन

अतिवृष्टी,पुरग्रस्त शेतक-यांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत व प्रत्यक्षात मिळणारी मदत यामध्ये मोठी तफावत असल्याचे सांगत शासनाने शेतक-यांच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचे काम केले असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ येथील वाशी येथील छञपती शिवाजी महाराज चौकात घ्या केळ आंदोलव करुण शासनाचा निषेध करण्यात आला.व शेतक-यांना तात्काळ सरसकट कर्जमाफी,हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तसेच हक्काचा १०० टक्के पिकविमा वाटप करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थीत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक

भाजप पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यात येणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काय तयारी केली याची माहिती पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार

पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे भाजप पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत असलेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही उपस्थित राहणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था कशा निवडणूका लढवायच्या आणि जिंकायच्या यांची रणनीती ठरणार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक भाजप स्वभावाला लढणार की युतीमध्ये यांबाबत चर्चा होणार

मुख्यमंत्री दुपारी एक वाजता पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील...

स्वर्गीय गणपतराव‌ देशमुख यांच्या निवासस्थाचे शुद्धीकरण

भाजप रॅली दरम्यान स्वर्गीय गणपतराव‌ देशमुख यांच्या घरावरती दारूच्या बाटल्या आणि दगडफेक झाली होती. या घटने नंतर आज शेकापच्या कार्यकर्त्यांनी गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी दहि दुध आणि पाण्याने शुद्धीकरण केले. या वेळी स्वर्गीय गणपतराव‌ देशमुख अमर है अशा घोषणा ही देण्यात आल्या.

अजित पवारांचा रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल

सगळे काचेच्या घरात राहतात. आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं, आपल्यातलं कुणी काही भाषण केलंय का, आपण कुणाचं कौतुक केलंय का आपल्या घरातल्या महिलेने केलंय का, आपल्या आईने केलाय का माहिती घेऊन बोललो तर जरा जास्त बर होईल... काहीजण उत्साहाच्या बराच स्टेटमेंट करून मोकळे होतात... तो उत्साह कधी कधी अडचणीचा ठरतो....
अजित पवार, उपमुख्यमंत्री

पंढरपूर - सांगोल्यात कडकडीत बंद

शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या घरावरती काल भाजपच्या रॅली दरम्यान हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी दारूच्या बाटल्या आणि दगडफेक केल्याची घटना घडली होती त्याच्या निषेधार्थ आज सांगोल्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आज सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात निषेध मोर्चा देखील करण्यात येणार आहे या निमित्ताने सांगोल्यातील सर्व बाजारपेठा दुकान ठप्प झालेली आहेत

मेहकर व लोणार तालुक्यांचा अतिवृष्टीग्र ग्रस्तांच्या यादीत समावेश करा,अन्यथा तीव्र आंदोलन— रविकांत तुपकर

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून मेहकर व लोणार तालुक्यांचा मदतीच्या पॅकेजमध्ये समावेश करावा अशी ठाम मागणी केली अन्यथा आक्रमक आंदोलन करू असा इशारा दिला.

तुपकर यांनी पुढे इशारा दिला की,“जर मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश तात्काळ अतिवृष्टी ग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये करण्यात आला नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन छेडेल. सरकारने या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.”

संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांना विनंती, काय म्हणाले

निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता आहे, तरीही लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवायला हवा. १४ ऑक्टोबर १२.३० वाजता राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. राज्याचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हावे अशी विनंती केली आहे, हे राजकारण नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे!
संजय राऊत
सचिन घायवळ क्राईम सिंडिकेट चा सदस्य असल्याचा निष्पन्न झालंय..सचिन घायवळ मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. संतोष धुमाळणे खंडणी मागितली होती, संतोष धुमाळ हा निलेश गावाचा नंबरकारी त्यांच्यावर देखील मोका कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात एकूण 17 आरोपी असून, क्राईम ब्रँच कडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
डीसीपी संभाजी कदम

नाशिक मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड

- नाशिक महानगरपालिकेने सानुग्रह अनुदानाला दिली मंजुरी

- Level S-17 आणि त्यापेक्षा कमी वेतन गटातील अधिकारी-कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी यांना 23,500 रुपये अनुदान मिळणार

- शासन अनुदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 14,100 रुपये इतके अनुदान देण्यात येणार

- मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी घेतला निर्णय

- महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नांदेडमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दोन्ही मुली एमबीबीएससाठी ठरल्या पात्र

शेतात काबाड कष्ट करून एका शेतकरी दांम्पत्याने आपल्या दोन्ही मुलींना शिकवले. आपल्या आई वडिलाच्या या कष्टाचं सोनं करत दोन्ही मुली एमबीबीएससाठी पात्र ठरल्या. ही यशोगाथा आहेनांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील किन्हाळा येथील साक्षी आणि दिव्याची. कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर दोन्ही बहिणीने यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

आमदार नरेंद्र मेहता व प्रताप सरनाईक यांच्यात मंदिरावरून वाद

मीरा-भाईंदर मध्ये हनुमान मंदिरावरून पुन्हा एकदा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं पहायला मिळत आहे.

भाईंदर पूर्वेच्या श्याम भवन बिल्डिंगचे रीडेव्हलपमेंट चे काम होणार आहे. या बिल्डिंगला लागून असलेले हनुमान मंदिरावरून हा वाद सुरू झाला आहे. सरनाईकांच्या या कृतीवर नरेंद्र मेहता यांनी आक्षेप् घेत सरनाईक हे नुसते धर्मावरून राजकारण करत आहे.

धाराशिव नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ, मतदारांची फेरफार केल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

देशभरात मत चोरीचा आरोप होत असताना धाराशिव मध्ये आता मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात येतोय. नगरपालिकेची प्रभागातील मतदार सोयीनुसार कमी जास्त केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. ज्या ठिकाणी लोक वास्तव्याला आहे तिथून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर मतदान असल्याचं महाविकास आघाडीचे म्हणणं आहे. मतदार यादी बाबत आक्षेप नोंदवायला कमी कालावधी असल्याचही महाविकास आघाडीचे म्हणणं आहे. दरम्यान भाजपनेही यावर पलटवार केलाय विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली त्यामुळे आरोप केले जात आहेत आम्हीही याबाबत आक्षेप नोंदवले असल्यास भाजपच्या वतीने सांगितलं. मतदार यादीतील फेरपरीक्षा मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने. मतदार यादी मध्ये आक्षेप घेण्यास मुदत देण्यात आली आहे विहित कालावधीत विहित नमुन्यात आक्षेप दाखल झाल्यानंतर त्याबाबत सुनावणी घेऊन दुरुस्ती करू अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

- पहिल्या वर्गापासून हिंदी अयोग्य, मातृभाषेलाच प्राधान्य देण्याची गरज

* त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॅा. नरेंद्र जाधव यांनी काल जाणून घेतली नागपूरातील तज्ज्ञांची मतं

- पाचवीनंतर तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश करावी विविध क्षेत्रातील मान्यवर नोंदवली मते

- *विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून जाणून घेतली हिंदी सक्तीबाबत मतं

- जास्तीत लोकांच्या सहभागातून हा अहवाल भविष्यदर्शी तयार करण्याचे त्रिभाषा धोरण समितीचे उद्दीष्ट

- यावेळी माजी आमदार नागो गाणार, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, समितीचे सदस्य वामन केंद्रे, डॉ. अपर्णा मॉरिस बैठकीत सहभागी

- यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचे उपसंचालक संजय डोरलीकर, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ . माधुरी सावरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दुरुस्तीच्या कामांमुळे आज जळगाव शहराचा पाणीपुरवठा बंद

जळगाव शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जात असून, वाघूर पंपिंग स्टेशन ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रादरम्यानच्या मुख्य जलवाहिनीत एअर व्हाल बदलण्याचे तसेच उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचे काम शनिवारी केले जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. वाघूर पंपिंग स्टेशन ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान वीजपुरवठा करणाऱ्या ३३ के. व्ही. उच्चदाब विद्युत वाहिनीवर वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे वाघूर उच्चदाब वीज वाहिनीची देखभाल व दुरुस्ती, तसेच झाडांच्या फांद्याच्या छाटणीचे देखील काम 'महावितरण'चे कर्मचारी करणार आहेत. या कामांमुळे शनिवारचा नियमित पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून, तो रविवारी होईल तर रविवारचा पाणीपुरवठा हा समवारी तर सोमवारचा पाणीपुरवठा हा मंगळवार होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

गुन्हेगारी प्रकरणात डी.के. राव, अनिल सिंग आणि मिमित भुता अटक

डीसीबी सीआयडीकडून गुन्हा क्रमांक 596/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(4), 61(2) आणि 3(5) अन्वये प्रसिद्ध गुन्हेगार डी.के. राव, अनिल सिंग आणि मिमित भुता यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, मिमित भुताकडे गुंतवलेले 1.25 कोटी रुपये परत मागितल्यावर डी.के. राव आणि त्याचे साथीदार अनिल परेराव यांनी फिर्यादीला गंभीर परिणामांची धमकी दिली.

या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Monsoon Withdraws from Mumbai : मुंबईतून मान्सूनचा काढता पाय घेतला आहे. पुढील तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रातूनही माघारी परतेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर येथे आज तुरळक पावसाची शक्यता आहे.

धाराशिवमध्ये कलाकेंद्र विरोधात धडक कारवाई,  पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द

धाराशिव तालुक्यातील आळणी येथील पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे.कला केंद्राला घालु दिलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार परवाना तत्काळ रद्द करण्यात आला आहे.या कलानाट्य केंद्राच्या संचालकाने परवाना मिळालेल्या अटींचे पालन न करता बेकायदेशीर कृत्ये केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासणीत आढळून आले. त्यामुळे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला होता.या अहवालाच्या आधारे परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला.

चिंचाळा ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात गावाकऱ्यांनी सुरु केले आमरण उपोषण

नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चिंचाळा ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केल आहे. चिंचाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आल आहे. चिंचाळा गावात 15 वित्त आयोग योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामे बोगस असून सरपंच आणि ग्रामसेविकेनी हा निधी परस्पर लाटल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. गावातील अनेक कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सरपंच आणि ग्रामसेविकेने केला असल्याचा आरोप देखील यावेळी उपोषणकर्त्यांनी केला आहे.या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण पथकाची रात्रीच्या सुमारास कारवाई

सांगली महापालिके कडून सांगली शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे.विशेष म्हणजे मध्य रात्रीच्या सुमारास पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.दिवाळीच्या निमित्ताने शहरातल्या बाजारपेठ मधील असणाऱ्या विक्रेत्यांकडुन दुकानांच्या पुढे मंडप टाकण्यात आले आहेत,मात्र यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत, असल्याने महापालिकेकडुन ऐन रात्रीत बुलडोझर लावून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मंडपाचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले आहेत,यावेळी काही विक्रेत्यांकडून कारवाईला विरोध करत रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाई बद्दल संताप व्यक्त करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून दौरा सुरु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून दौरा सुरु

पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची अजित पवार पाहणी करणार

वारजेतील चौधरी चौकापासून पाहणीला सुरुवात करणार

वाहतूक कोंडी आणि रस्त्यांचा अजित पवार यांच्याकडून पाहणी

महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गुटखा साठा केलेल्या मोठ्या गोडाऊनवर पोलीसांचा झापा

यवत पोलीस स्टेशन हद्दीत बोरीऐंदी येथील झुरंगे मळा या ठिकाणी सुत्रांच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार, हा साठा नियमांबाहेर बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात येणार होता. स्थानिक पोलीसांनी त्वरित कारवाई करून साठा ताब्यात घेतला. Psi विजय कोल्हे यांनी ही कारवाई केली.

संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला नसुन रात्री उशिरा पर्यंत अवैध गुटखाचा पंचनामा चालू होता.

OBC कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर प्रकाश आंबेडकर, अंजलीताई आंबेडकरांची कुटुंबीयांना भेट... तर मंत्री छगन भुजबळांनी साधला फोनवरून संवाद

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी अकोल्यात सुसाईड नोट आणि व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत ओबीसी कार्यकर्त्याने आत्महत्या केली होती. विजय बोचरे असे या आत्महत्या केलेल्या ओबीसी कार्यकर्त्याचं नाव होतं. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या आलेगाव या ठिकाणी बस थांबा येथे मध्यरात्री त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपलं होतं. दरम्यान, आज बोचरे कुटुंबांयांची प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर सात्वन भेट घेतली. विजय बोचरे हे शेतकरी व ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते होते. तर छगन भुजबळ यांचे खंद्दे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्यानंतर जिल्हाभरात संतापाची लाट होती. आज सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी आलेगाव येथे बोचरे यांच्या घरी जात कुटुंबाचे सांत्वन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com