Maharashtra Election 2024: शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Shivajirao Adhalarao Patil Enterd in Congress: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर अजित पवार हे शिरुरची उमेदवारी जाहीर करतील अशी शक्यता आहे.
Shivajirao Adhalrao Patil Joins Ajit Pawar's Group
Shivajirao Adhalrao Patil Joins Ajit Pawar's GroupSaam Tv News

Shivajirao Adhalarao Patil Joins NCP

शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याच्यांसह २०० पदाधिकारींनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.(Latest News)

पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर अजित पवार हे शिरुरची उमेदवारी जाहीर करणार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. यामुळे अमोल कोल्हेंविरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत होणार आहे. ही लढत जुनीच असली तरी राजकिय फासे मात्र उलटे पडलेत.

राष्ट्रावादीत का केला प्रवेश?

मागच्या वेळी आढळराव पाटलांचा पराभव हा अजित पवारांसाठी प्रतिष्ठेचा झाला होता, आता ५ वर्षानंतर आढळराव पाटलांच्या साथीने अजित पवारांनी अमोल कोल्हेंच्या पराभवासाठी आखाणी केलीय. दरम्यान शिरुर मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल याची घोषणा अद्याप झालेली नाहीये. परंतु गेल्या काही दिवसांपासून माजी खासदeर पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवतील, असं म्हटलं जातंय.

अजित पवार यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आढळराव पाटील यांच्या नावाला विरोध दर्शविला होता. सध्याचं राजकारण बदलले असून राजकारणामधील समीकरणे बदलली असल्याचं आढळराव पाटील यावेळी म्हणालेत. माझी पार्श्वभूमी सर्वांनाच माहितीये. मी हाडाचा राजकारणी नाहीये.आपल्याला कोणत्याच प्रकराची राजकीय पार्श्वभूमी नव्हती.

भिमाशंकर साखर कारखान्यापासून माझ्या राजकीय करिअरला सुरुवात झाल्याचं आढळराव पाटील म्हणाले. राजकारणात महत्त्वाकांक्षा आणि मतभेद होत असतात, त्यामुळे साखर कारखान्यापासून आणि दिलीपवळसे पाटील याच्यापासून वेगळे झाल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

महायुतीत शिरूर मतदारसंघावरून वाद निर्माण झाला होता. शिवाजी आढळराव पाटील यांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवायची होती, तर ही जागा आपल्याला मिळावी असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात होता. यासर्व वादावरून शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे महायुती आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान शिरुर जागेवरून खूप चर्चेअंती महायुतीने तोडगा काढला.

Shivajirao Adhalrao Patil Joins Ajit Pawar's Group
Maharashtra Lok Sabha Election : येत्या २४ तासात उत्तर द्या; शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस

शिवाजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून ही जागा लढवण्यात यावी असा निर्णय महायुतीने घेतला. त्यावरून अमोल कोल्हेंनी पाटील यांच्यावर टीका केली होती. आढळराव पाटील यांची ही बेडूक उडी असल्याची टीका केली होती. अमोल कोल्हे यांच्या टीकेला आढळराव पाटील यांनी उत्तर दिलंय. मी शिवसेनेशी २० प्रामाणिक राहिलो. तर मी महायुतीच्या उमेदवार आहे, महायुतीमध्ये विचार करून आपला राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला. त्यामुळे राष्ट्रावादीचा उमेदवार आहे. पण अमोल कोल्हे यांनी मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष अशा उड्या मारल्याचं शिवाजी आढळराव पाटील म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com