छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार असे वाटत होतं. मात्र तसं न होता तिढा वाढतच चालला आहे. आता या जागेवर भाजपने पुन्हा एकदा दावेदारी केली आहेच; परंतु अजित पवार गटानेदेखील दावेदारी कायम ठेवल्याने उमेदवाराबाबत निर्णय कधी होणार, असा प्रश्न आहे. दरम्यान, हेमंत गोडसेंची उमेदवारी फायनल होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी साम टीव्हीला बोलताना दिलीय.
दरम्यान गोडसे यांच्यासंदर्भात भाजप अनुकूल नसल्याचे सांगण्यात येते. नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत. मनपामध्येही भाजपची सत्ता होती. त्यामुळं भाजपला जागा देण्याची मागणी सातत्यानं होतेय. विद्यमान आमदारही निवडणूक लढण्यासाठी तयार झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नाशिक, ठाणे पैकी एक जागा भाजपला द्या, असा आग्रह धरला जातोय. तर दुसरीकडे अजित पवार गटही उमेदवारीवरुन ठाम आहे. भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर आता निवृत्ती अरिगळे आणि आमदार माणिकराव कोकाटे यांचीही निवडणूक लढण्याची तयारी सुरु झाली आहे.
नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी महिनादेखील राहिलेला नाही. भुजबळांनी दावा सोडून तीन दिवस होत आले आहेत. मात्र तरीही नाशिकचा उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे महायुतीतील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला हातातून जाणार की शिंदे सेना शेवटच्या क्षणी बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.