
भारतातील महिलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजेच अशक्तपणाची समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, १५ ते १९ वयोगटातील तब्बल ६० टक्के मुली अशक्त आहेत. थकवा, डोके हलके होणे, चेहऱ्यावरील पांढरेपणा अशी अशक्तपणाची लक्षणे सुरुवातीला साधी वाटतात. मात्र त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. महिलांच्या दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या आणि कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. पौष्टिक आहाराची कमतरता, वेळेवर रक्त तपासणी न करणे, तसेच आयरनयुक्त अन्न न खाणे यामुळे रक्ताची कमतरता वाढायला सुरुवात होते.
आपल्या शरीरात लाल रक्तपेशींचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. या पेशी शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत असतात. मात्र जेव्हा लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होते तेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि रक्ताचे उत्पादनही कमी प्रमाणात होते. हाच अशक्तपणाचा मूळ आधार आहे. १५ ते ४९ वयोगटातील गर्भवती महिला तब्बल ५३ टक्के अशक्त आहेत. मासिक पाळीमुळे दर महिन्याला महिलांच्या शरीरातून विशिष्ट प्रमाणात रक्त बाहेर पडते. या काळात जर आहारात लोह आणि फॉलिक अॅसिडची कमतरता असेल, तर रक्तनिर्मिती कमी होते आणि गर्भधारणेदरम्यान ही समस्या अधिक तीव्र रूप घेते.
गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीराला न जन्मलेल्या बाळासाठी अतिरिक्त रक्त तयार करावे लागते. अशा वेळी योग्य पोषण न मिळाल्यास आई आणि बाळ दोघांनाही धोका निर्माण होतो. सतत थकवा जाणवणे, चेहऱ्याचा रंग फिकट पडणे, डोकेदुखी अशा समस्या वाढतात. म्हणूनच डॉक्टर गर्भवती महिलांना लोह आणि फॉलिक अॅसिडच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देतात.
पालक, बीट, टोफू, डाळिंब, बदाम, खजूर, सफरचंद, मनुका, आवळा, अंडी आणि गूळ हे लोहाचे उत्तम स्रोत मानले जातात. संत्री, लिंबू, पपई, स्ट्रॉबेरी, माल्टा, सिमला मिरची यासारखी फळे-भाज्या उपयुक्त ठरतात. महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिल्यास अशक्तपणाची समस्या कमी करता येऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.