Relationship Tips : लग्नानंतर पार्टनरला 'या' सिक्रेट गोष्टी कधीच सांगू नका; अन्यथा ५ दिवसांच्या आत मोडेल संसार

Wed Couple Relationship Tips : लग्न बंधनात अडकणार असाल आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीला गमवायचे नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्याने तुम्ही कायम पार्टनरसोबत सुखी राहाल.
Wed Couple Relationship Tips
Relationship TipsSaam TV
Published On

आजकाल घटस्फोट होण्याचं प्रमाण जास्त वाढलं आहे. अगदी लव्ह मॅरेज करणाऱ्या जोडप्यांमध्ये सुद्धा विविध कारणांमुळे भांडणे होतात आणि त्यांचा घटस्फोट होतो. लग्नानंतर पती-पत्नी यांनी एकमेकांसोबत छान आयुष्य जगायचे असते. सर्व व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही चुकांमुळे दोघांकडून एकमेकांचा अनादर होतो. त्यामुळे वाद होतात, हे वाद इतके विकोपाला जातात की दोघेही एकमेकांचा तिरस्कार करू लागतात.

Wed Couple Relationship Tips
Relationship Tips : जळणाऱ्या लोकांपासून सावधान! वाद न घालता स्वतः ला दूर कसं ठेवणार? जाणून घ्या

लग्नानंतर दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचे असते. मात्र इथे भांडणात अनेकदा अहंकार आणि इगो मध्ये येतो. आता तुम्ही देखील नुकतेच लग्न केले असेल किंवा तुम्ही लग्न बंधनात अडकणार असाल आणि तुम्हाला समोरच्या व्यक्तीला गमवायचे नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्याने तुम्ही कायम पार्टनरसोबत सुखी राहाल.

एकमेकांच्या आई-बाबांवर टीका

नात्यात कितीही वाद झाले, भांडणे झाली तरी एकमेकांच्या आई-वडिलांना दुखवू नका. दोघांनी एकमेकांच्या आई आणि बाबांचा आदर केला पाहिजे. अनेकदा सासू आणि सुनेची भांडणे जास्त होतात. भांडणांमध्ये मुली जास्त दुखावल्या जातात आणि आपल्या पतीकडे सासूबाईंची तक्रार करतात. मात्र असे करू नका. तुम्ही ससूला योग्य पद्धतीने उत्तर द्या. पतीला आईबद्दल वाईट बोललेले सहन होत नाही आणि भांडणे होतात. त्याऐवजी पतीला तुम्ही सासुबाईंमुळे किती दु:खी आहात हे दाखवून द्या. असे केल्याने पतीला आपल्या आईची चूक समजेल.

पास्ट बद्दल बोलू नका

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही पास्ट असतो. मात्र आयुष्यात पुढे जाताना जोडीदाराला तुमच्या पास्ट बद्दल काहीच सांगू नका. पती किंवा पत्नीसमोर पास्ट बद्दल बोलल्याने किंवा तो विषय काढल्याने एकमेकांच्या मनात संशय आणि भीती निर्माण होते. त्यामुळे भांडणे आणि वाद वाढतात. शेवटी विश्वास उडून जातो आणि नात्यातील प्रेम कमी होतं. त्यामुळे पास्ट बद्दल कधीच काही बोलू नका.

मित्रांबद्दल वाईट बोलणे

लग्नानंतर दोघांचेही वेगवेगळे मित्र विविध कार्यक्रमात एकत्र येतात. त्यावेळी दोघांनी आपल्या पार्टनरच्या मित्रांचा देखील आदर केला पाहिजे. पार्टनरच्या मित्रांना वाईट बोलणे बंद करा. प्रत्येक व्यक्तीची आवड, सवयी आणि मित्र परिवार वेगवेगळा असतो. तसेच चांगल्या मित्रांबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर असतो. त्यामुळे मित्रांबद्दल कधीही वाईट बोलूनये त्यामुळे पार्टनरचे मन दुखावले जाते.

अरे देवा मी लग्न का केलं? असं बोलू नका

लग्न करण्याचा निर्णय दोघांचा असतो. हा निर्णय कोणत्या एकट्या व्यक्तीचा नसतो. अनेकदा भांडणात व्यक्ती जेव्हा जास्त फ्रस्टेड होतात तेव्हा तोंडातून सहज ' अरे देवा मी हे लग्न का केलं?' असे शब्द निघतात. त्यामुळे वाद वाढतात. याचा थेट परिणाम आपल्या नाजूक नात्यावर सुद्धा होतो. त्यामुळे कधीही असे बोलू नका.

Wed Couple Relationship Tips
Relationship Tips : गर्लफ्रेंडचे मन जिंकायचंय? फॉलो करा ५ टिप्स, नातं आणखी बहरेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com